शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

१,२३,३०२ शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

वाशिम : पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २२ जुलैपर्यंत ...

वाशिम : पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २२ जुलैपर्यंत जिल्ह्यातील १,२३,३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. २३ जुलै अंतिम मुदत आहे.

नैसर्गिक आपत्ती, किडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. नुकसानभरपाई मिळावी याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांना संरक्षण देण्यात येते. मात्र, जाचक अटी असल्याचे कारण समोर करून अनेक शेतकरी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवित असल्याचे यंदा दिसून येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग लाभावा याकरिता जनजागृती करण्यात आली. तथापि, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून येते. कर्जदार शेतकऱ्यांची संख्या तर नगण्य आहे. २२ जुलैपर्यंत ५,८५८ कर्जदार आणि १,१७,४४४ बिगर कर्जदार अशा एकूण १,२३,३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. विमा उतरविण्यासाठी २३ जुलै अंतिम मुदत असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

00000

बॉक्स

कर्जदार शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

गेल्यावर्षी ८८ हजार ८५५ कर्जदार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यंदा मात्र अंतिम मुदत एका दिवसावर आलेली असतानाही केवळ ५,८५८ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. पीक विम्याचा लाभ मिळविताना होणारा त्रास आणि जाचक अटी यामुळे कर्जदार शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा उतरविण्याकडे पाठ फिरविल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

०००००००००००

शेतकऱ्यांची विमा रक्कम ८.३१

राज्य सरकारची विमा रक्कम २२.८६

केंद्र सरकारची विमा रक्कम २२.८६

0000

एकूण खातेदार संख्या २,७७,२४२

कर्जदार शेतकरी ५,८५८

बिगर कर्जदार शेतकरी १,१७,४४४

विमा संरक्षित क्षेत्र ९४,९६४ हेक्टर

00000000000