शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

जिल्ह्यातील १२२ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:42 IST

वाशिम : शासनाने पटसंख्या वाढीसाठी जि. प. शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या व विज्ञान केंद्राची सोय केली; परंतु, शाळांना पुरेशी पटसंख्या ...

वाशिम : शासनाने पटसंख्या वाढीसाठी जि. प. शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या व विज्ञान केंद्राची सोय केली; परंतु, शाळांना पुरेशी पटसंख्या मिळू शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळांचे तीन किमी अंतरावरील शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश दिले आहेत. वाशिम जिल्ह्यात अशा १२२ शाळा असल्या तरी तांत्रिक अडचणींमुळे या शाळांचे समायोजन करणे अशक्य आहे. त्यामुळे या शाळा सुरूच राहणार असल्याने या ग्रामीण भागातील पालकांना दिलासा मिळाला आहे.

शासन निर्णयानुसार प्राथमिकच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे तीन किमीच्या आत अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश शासनाकडून ३ वर्षांपूर्वी पारित करण्यात आले आहेत. दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महिना वाहतूक प्रवास भत्ताही मिळणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याची शक्यता वाढली होती. वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या ७७५ शाळा आहेत. त्यापैकी १२२ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी असल्याने या शाळा शासन निर्णयानुसार बंद होण्याची शक्यता होती; परंतु पालकांचा विरोध, पर्यायासाठी ३ किलोमीटर अंतरात दुसरी शाळा नसतानाच विद्यार्थ्यांच्या प्रवासासह इतर तांत्रिक अडचणींमुळे या शाळा बंद करण्याची किंवा त्यांचे इतर शाळांत समायोजन करण्याची कार्यवाही शिक्षण विभागाकडून झालेली नाही.

---------

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन

नियमानुसार पटसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यातील १२२ शाळा बंद करण्यात आल्या नसल्या आणि त्यांचे समायोजन होणार नसले तरी या शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, अतिरिक्त शिक्षकांचे मात्र इतर शाळांत समायोजन करण्यात आले आहे.

------------

विद्यार्थ्यांच्या पालकांना तूर्तास दिलासा

शासन निर्णयानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद कराव्या लागणार आहेत. शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार किमान ४०० ते ५०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आता तयार होणार आहेत; परंतु जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या १२२ शाळा अद्याप सुरू असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

------

कोट :

शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार जि. प. शाळांची संख्या ४०० ते ५०० पर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जाणार आहेत. जिल्ह्यात या प्रक्रियेला दोन वर्षांचा कालावधी लागेल. सद्य:स्थितीत मात्र कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची कोणतीही तयारी नाही.

-अंबादास मानकर,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जि. प. वाशिम