शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

जिल्ह्यातील १२२ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:42 IST

वाशिम : शासनाने पटसंख्या वाढीसाठी जि. प. शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या व विज्ञान केंद्राची सोय केली; परंतु, शाळांना पुरेशी पटसंख्या ...

वाशिम : शासनाने पटसंख्या वाढीसाठी जि. प. शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या व विज्ञान केंद्राची सोय केली; परंतु, शाळांना पुरेशी पटसंख्या मिळू शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळांचे तीन किमी अंतरावरील शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश दिले आहेत. वाशिम जिल्ह्यात अशा १२२ शाळा असल्या तरी तांत्रिक अडचणींमुळे या शाळांचे समायोजन करणे अशक्य आहे. त्यामुळे या शाळा सुरूच राहणार असल्याने या ग्रामीण भागातील पालकांना दिलासा मिळाला आहे.

शासन निर्णयानुसार प्राथमिकच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे तीन किमीच्या आत अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश शासनाकडून ३ वर्षांपूर्वी पारित करण्यात आले आहेत. दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महिना वाहतूक प्रवास भत्ताही मिळणार आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याची शक्यता वाढली होती. वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या ७७५ शाळा आहेत. त्यापैकी १२२ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी असल्याने या शाळा शासन निर्णयानुसार बंद होण्याची शक्यता होती; परंतु पालकांचा विरोध, पर्यायासाठी ३ किलोमीटर अंतरात दुसरी शाळा नसतानाच विद्यार्थ्यांच्या प्रवासासह इतर तांत्रिक अडचणींमुळे या शाळा बंद करण्याची किंवा त्यांचे इतर शाळांत समायोजन करण्याची कार्यवाही शिक्षण विभागाकडून झालेली नाही.

---------

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन

नियमानुसार पटसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यातील १२२ शाळा बंद करण्यात आल्या नसल्या आणि त्यांचे समायोजन होणार नसले तरी या शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, अतिरिक्त शिक्षकांचे मात्र इतर शाळांत समायोजन करण्यात आले आहे.

------------

विद्यार्थ्यांच्या पालकांना तूर्तास दिलासा

शासन निर्णयानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद कराव्या लागणार आहेत. शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार किमान ४०० ते ५०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आता तयार होणार आहेत; परंतु जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या १२२ शाळा अद्याप सुरू असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

------

कोट :

शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार जि. प. शाळांची संख्या ४०० ते ५०० पर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जाणार आहेत. जिल्ह्यात या प्रक्रियेला दोन वर्षांचा कालावधी लागेल. सद्य:स्थितीत मात्र कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची कोणतीही तयारी नाही.

-अंबादास मानकर,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जि. प. वाशिम