शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

वाशिम तालुक्यात १२ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:45 IST

--------- कारंजा शहरात आणखी पाच बाधित वाशिम : आरोग्य विभागाकडून शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार कारंजा तालुक्यातील आणखी पाच व्यक्तींना कोरोना ...

---------

कारंजा शहरात आणखी पाच बाधित

वाशिम : आरोग्य विभागाकडून शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार कारंजा तालुक्यातील आणखी पाच व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यात कारंजा शहरातील पाच व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. या सर्वांवर कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, तालुका आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणीची मोहीम राबविली जात आहे.

----------

वीजपुरवठा खंडित; कामकाज प्रभावित

कामरगाव : गत काही दिवसांपासून विद्युतपुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. गुरुवारीदेखील दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडल्याने कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले. ग्रामपंचायत कार्यालय, बँकांमधील कामांवर त्याचा परिणाम झाला.

------

जलस्रोतांमध्ये घट; पाणीटंचाईचे संकेत

जऊळका रेल्वे : रब्बी पिकांच्या सिंचनासाठी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने जऊळका परिसरातील जलस्रोतांमध्ये घट होत आहे. त्यामुळे पुढील काळात उपशावर नियंत्रण न मिळविल्यास पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची भीती निर्माण झाली असून, प्रशासनाने उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

----

६५ जणांची आरोग्य तपासणी

रिठद : रिसोड तालुक्यात कोरोना विषाणूंंचा संसर्ग नियंत्रणात येत असला तरी, दरदिवशी विविध ठिकाणी कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य विभागाने कोरोना चाचणीला वेग दिला असून, ग्रामस्थांची आरोग्य तपासणीही सुरू केली आहे. रिठद येथे गुरुवारी ६५ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

--------

खरिपासाठी बीज प्रक्रिया प्रशिक्षण

उंबर्डा : कृषी विभागाकडून पुढील हंगामासाठी शेतक-यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने बियाणे उगवण शक्ती तपासणे व बीजप्रक्रियेसंबंधीचा प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात येत आहे. या अंतर्गत परिसरातील शेतकरी समूह सहायता बचत गटास प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक व शेतकरी उपस्थित होते.

--------

गावात स्वच्छता अभियान

धनज बु.: कारंजा तालुक्यातील धनज बु. येथे रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे. या पृष्ठभूमीवर सरपंचांच्या मार्गदर्शनात ग्रामसचिवांनी सभा घेऊन स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन केले, तसेच गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानातून घाण-कच-याची विल्हेवाट लावण्यात आली.

----------