शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

११ गावांना पाणीटंचाईच्या झळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:45 IST

नंदलाल पवार मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील ११ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, चार ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले ...

नंदलाल पवार

मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील ११ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, चार ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले तर अद्याप टँकरसाठी एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही.

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मंगरूळपीर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी बºयापैकी पाऊस झाल्याने तसेच त्यानंतरही परतीच्या पावसामुळे प्रकल्पात बºयापैकी जलसाठा होता. जलपातळीतही फारशी घट नाही. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची तिव्रतादेखील कमी असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी २० पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली होती. जवळपास १५ ठिकाणी विहीर अधिग्रहण केले होते तर चार ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा टँकरसाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला नाही. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुक्यातील शेंदूरजना मोरे, धानोरा खु, मजलापूर, गोलवाडी, लही कुंभी, कोठारी १, कोठारी २, जनुना बु, शिवणी रोड, जांब प्लॉट, आजगाव या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. याशिवाय सायखेडा, निंबी येथे शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर आहे. परंतू, त्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे टँकर, नळ दुरूस्ती, विहिर अधिग्रहण आदीबाबत फारसे प्रस्ताव नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. आतापर्यंत केवळ चार ठिकाणचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार विहीर अधिग्रहणाचे आदेशही झाले आहेत.

०००

बॉक्स

चार ठिकाणी विहीर अधिग्रहण

तालुक्यातील मजलापूर, शेंदूरजना मोरे, कोठारी, गोलवाडी या गावात विहीर अधिग्रहणाचे आदेश झाले असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळत असल्याचे दिसून येते.

०००

गेल्यावर्षी १६ गावात विहीर अधिग्रहण

गेल्यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता अधिक होती. गतवर्षी तालुक्यात १३ मे पर्यंत १६ गावांत विहीर अधिग्रहण तर ४ पेक्षा अधिक गावांत टँकर सुरू होते. त्या तुलनेत यंदा केवळ चार विहीर अधिग्रहण असल्याचे दिसून येते. विहीर अधिग्रहणाची खरोखरच आवश्यकता नाही की प्रशासकीय दिरंगाई होत आहे? याबाबत नागरिकही संभ्रमात असल्याचे दिसून येते.

०००००००००

कोट बॉक्स

मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी १५ ते १६ गावात पाणी टंचाई होती. तसेच याठिकाणी विहिरी अधिग्रहण किंवा टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा सुरु होता. यावर्षी मात्र अकरा पैकी चार गावांत विहीिर अधिग्रहणाचे आदेश झाले असून सध्या तालुक्यात कोणत्याही गावात टँकर सुरु नाही. हरिणारायन परिहार

गटविकास अधिकारी, पं स मंगरुळपीर