शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

११ गावांना पाणीटंचाईच्या झळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:45 IST

नंदलाल पवार मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील ११ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, चार ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले ...

नंदलाल पवार

मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील ११ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, चार ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले तर अद्याप टँकरसाठी एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही.

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मंगरूळपीर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी बºयापैकी पाऊस झाल्याने तसेच त्यानंतरही परतीच्या पावसामुळे प्रकल्पात बºयापैकी जलसाठा होता. जलपातळीतही फारशी घट नाही. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची तिव्रतादेखील कमी असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी २० पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली होती. जवळपास १५ ठिकाणी विहीर अधिग्रहण केले होते तर चार ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा टँकरसाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला नाही. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुक्यातील शेंदूरजना मोरे, धानोरा खु, मजलापूर, गोलवाडी, लही कुंभी, कोठारी १, कोठारी २, जनुना बु, शिवणी रोड, जांब प्लॉट, आजगाव या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. याशिवाय सायखेडा, निंबी येथे शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर आहे. परंतू, त्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे टँकर, नळ दुरूस्ती, विहिर अधिग्रहण आदीबाबत फारसे प्रस्ताव नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. आतापर्यंत केवळ चार ठिकाणचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार विहीर अधिग्रहणाचे आदेशही झाले आहेत.

०००

बॉक्स

चार ठिकाणी विहीर अधिग्रहण

तालुक्यातील मजलापूर, शेंदूरजना मोरे, कोठारी, गोलवाडी या गावात विहीर अधिग्रहणाचे आदेश झाले असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळत असल्याचे दिसून येते.

०००

गेल्यावर्षी १६ गावात विहीर अधिग्रहण

गेल्यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता अधिक होती. गतवर्षी तालुक्यात १३ मे पर्यंत १६ गावांत विहीर अधिग्रहण तर ४ पेक्षा अधिक गावांत टँकर सुरू होते. त्या तुलनेत यंदा केवळ चार विहीर अधिग्रहण असल्याचे दिसून येते. विहीर अधिग्रहणाची खरोखरच आवश्यकता नाही की प्रशासकीय दिरंगाई होत आहे? याबाबत नागरिकही संभ्रमात असल्याचे दिसून येते.

०००००००००

कोट बॉक्स

मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी १५ ते १६ गावात पाणी टंचाई होती. तसेच याठिकाणी विहिरी अधिग्रहण किंवा टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा सुरु होता. यावर्षी मात्र अकरा पैकी चार गावांत विहीिर अधिग्रहणाचे आदेश झाले असून सध्या तालुक्यात कोणत्याही गावात टँकर सुरु नाही. हरिणारायन परिहार

गटविकास अधिकारी, पं स मंगरुळपीर