शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

११ गावांना पाणीटंचाईच्या झळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:45 IST

नंदलाल पवार मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील ११ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, चार ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले ...

नंदलाल पवार

मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील ११ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, चार ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले तर अद्याप टँकरसाठी एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही.

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मंगरूळपीर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी बºयापैकी पाऊस झाल्याने तसेच त्यानंतरही परतीच्या पावसामुळे प्रकल्पात बºयापैकी जलसाठा होता. जलपातळीतही फारशी घट नाही. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची तिव्रतादेखील कमी असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी २० पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली होती. जवळपास १५ ठिकाणी विहीर अधिग्रहण केले होते तर चार ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा टँकरसाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला नाही. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुक्यातील शेंदूरजना मोरे, धानोरा खु, मजलापूर, गोलवाडी, लही कुंभी, कोठारी १, कोठारी २, जनुना बु, शिवणी रोड, जांब प्लॉट, आजगाव या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. याशिवाय सायखेडा, निंबी येथे शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर आहे. परंतू, त्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे टँकर, नळ दुरूस्ती, विहिर अधिग्रहण आदीबाबत फारसे प्रस्ताव नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. आतापर्यंत केवळ चार ठिकाणचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार विहीर अधिग्रहणाचे आदेशही झाले आहेत.

०००

बॉक्स

चार ठिकाणी विहीर अधिग्रहण

तालुक्यातील मजलापूर, शेंदूरजना मोरे, कोठारी, गोलवाडी या गावात विहीर अधिग्रहणाचे आदेश झाले असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळत असल्याचे दिसून येते.

०००

गेल्यावर्षी १६ गावात विहीर अधिग्रहण

गेल्यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता अधिक होती. गतवर्षी तालुक्यात १३ मे पर्यंत १६ गावांत विहीर अधिग्रहण तर ४ पेक्षा अधिक गावांत टँकर सुरू होते. त्या तुलनेत यंदा केवळ चार विहीर अधिग्रहण असल्याचे दिसून येते. विहीर अधिग्रहणाची खरोखरच आवश्यकता नाही की प्रशासकीय दिरंगाई होत आहे? याबाबत नागरिकही संभ्रमात असल्याचे दिसून येते.

०००००००००

कोट बॉक्स

मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी १५ ते १६ गावात पाणी टंचाई होती. तसेच याठिकाणी विहिरी अधिग्रहण किंवा टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा सुरु होता. यावर्षी मात्र अकरा पैकी चार गावांत विहीिर अधिग्रहणाचे आदेश झाले असून सध्या तालुक्यात कोणत्याही गावात टँकर सुरु नाही. हरिणारायन परिहार

गटविकास अधिकारी, पं स मंगरुळपीर