शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाशिम जिल्ह्यात कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी १०९ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:51 IST

109 proposals for Corona Free Village Award in Washim District : निकषांमुळे प्रस्ताव दाखल करण्यास ग्रामपंचायती उदासीन असल्याचे चित्र आहे.

- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा राबविण्याची घोषणा ग्रामविकास मंत्र्यांनी केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातून २३ जुलैपर्यंत केवळ १०९ प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर दाखल झाले आहेत. योजनेच्या निकषांमुळे प्रस्ताव दाखल करण्यास ग्रामपंचायती उदासीन असल्याचे चित्र आहे.कोरोनामुक्तीच्या उपक्रमास  चालना देण्यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार असून, राज्यातील ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षिसे दिली जाणार आहेत. या शिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशीर्ष पंचवीस पंधरा (२५-१५) व तीस चौपन्न (३०-५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींसाठी  विकास कामे मंजूर केली जाणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील ४९१ पैकी केवळ १२१ ग्रामपंचायतींनी या स्पर्धेंतर्गत प्रस्ताव दाखल केले आहेत  दरम्यान, जिल्हयातील निम्यावर ग्रामपंचायती काेराेनामुक्त झालेल्या आहेत. ही बाब पाहता ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची अपेक्षा आहे.गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकनकोरोनामुक्त गाव पुरस्कार स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. हे गुणांकन ५० गुणांचे राहणार असून, १ जून २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ग्रामपंचायतींनी केलेले काम विचारात घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायती सद्यस्थितीत कोरोनामुक्त असताना त्यांच्या कामगिरीत सातत्य राखले जावे आणि त्यांच्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी स्पर्धेसाठी प्रस्ताव सादर करणे अपेक्षीत असताना जिल्ह्यात केवळ १२१ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. 

ग्रामपंचायत स्तरावर ५ पथकांची स्थापना कोरोनामुक्त गाव स्पर्धेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर ५ पथकांची स्थापना करुन त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवायचे आहेत. यामध्ये ग्रामपंचायत प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन करुन त्यासाठी कार्यवाही करणारे पथक, कोरोना तपासणीसाठी व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाचे पथक, कोविड हेल्पलाईन पथक आणि लसीकरण पथक या पथकांचा समावेश असेल. 

कारंजा, रिसाेड तालुका निरंकग्रामविकास मंत्रालयाने गाव स्पर्धा राबविण्याची घाेषणा केल्यानंतर जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील चार तालुक्यातून प्रस्ताव प्राप्त झाले असले तरी कारंजा, रिसाेड तालुक्यातून मात्र अद्याप एकही प्रस्ताव पं. स.ला प्राप्त झाला नाही. उर्वरित चार तालुक्यातून पंचायत समितीच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :washimवाशिमCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या