शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

तातडीच्या १० हजार रुपये कर्जास बँकांची ‘नकारघंटा’!

By admin | Updated: June 17, 2017 00:59 IST

शासनाच्या सूचना नसल्याचे दिले जातेय लेखी : शेतकरी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफी प्रक्रियेस वेळ लागणार असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करण्याकरिता १० हजार रुपयांचे कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने १४ जून रोजी आदेश काढला; परंतु यासंदर्भातील कुठलेच निर्देश अद्याप प्राप्त नसल्याचे बँकांकडून शेतकरी दाखल करीत असलेल्या शपथपत्रांवर लेखी स्वरूपात लिहून दिले जात आहे. परिणामी, कर्ज घेण्याकरिता बँकांमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांना आल्या पावली खाली हात परतावे लागत आहे. कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून संप पुकारला. सात दिवस चाललेल्या या संपाची दखल घेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समिती स्थापन करून ११ जून रोजी या समितीची बैठक पार पडली. त्यात ठरल्यानुसार थकीत कर्जदार शेतकऱ्यांसोबतच अन्य शेतकऱ्यांकडे असलेले पीक कर्ज माफ करण्याबाबत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. मात्र, कर्जमाफीसाठी पात्रता व इतर अटी निश्चित करण्यासाठी वेळ लागणार असल्याने कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते खरेदीकरिता १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेश देण्यात आला. यासाठी ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज देण्यासंदर्भात जिल्हा बँका व व्यापारी बँकांना आदेश जारी करण्यात आला आहे; परंतु यासंदर्भात वाशिम जिल्ह्यातील एकाही बँकेला १६ जूनपर्यंत कुठलेच निर्देश प्राप्त झालेले नाहीत. परिणामी, शपथपत्र घेऊन बँकेत जाणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पावली खाली हात परतावे लागत आहे. यामुळे शासनाचा तकलादूपणा उघड होत असून, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील शेतकऱ्यांमध्ये या धोरणाप्रती संताप व्यक्त होत आहे. चलन तुटवड्याचा प्रश्न अद्याप कायम; बँकांकडून कर्जपुरवठा होणार तरी कसा?स्वत:ची गरज भागवून जिल्ह्यातील इतर बँकांना चलन पुरविणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाला रिझर्व्ह बँकेकडून पुरेशा प्रमाणात चलन मिळणे दुरापास्त झाले आहे. त्याचा थेट परिणाम खरीप पीक कर्ज वितरणावरही झाला आहे. ११५० कोटी रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत गुरुवारपर्यंत केवळ २२ टक्के कर्ज वाटप झाले असून, ज्या शेतकऱ्यांना कर्ज मंजूर झाले, त्यांची रक्कम बँकेत अडकून आहे. अशा स्थितीत नव्याने कर्जमाफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीच्या कर्जवाटप योजनेंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपये कर्ज पुरवठा करणार तरी कसा, असा प्रश्न बँकांना भेडसावत आहे. त्यामुळे शासनाने जरी तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असले, तरी ते मिळेलच, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तातडीचे कर्ज देण्यास बँक व्यवस्थापकांचा ‘लेखी’ नकार!पंचाळा (ता. वाशिम) येथील नारायण श्रीरंग विभूते आणि चतुराबाई श्रीरंग विभूते या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी नियमानुसार शपथपत्र भरून १६ जून रोजी बँक आॅफ इंडियाकडे तातडीच्या १० हजार रुपये कर्जाची मागणी केली. मात्र, यावेळी बँकेच्या व्यवस्थापकांनी वरिष्ठ पातळीवरून यासंदर्भात कुठलेच स्पष्ट निर्देश नसल्याने कर्ज देण्यास नकार दर्शविला. जिल्ह्यातील वाशिमसह इतर तालुक्यांमधील असंख्य शेतकऱ्यांनाही असाच अनुभव येत आहे. स्टेट बँकेलाही तातडीचे १० हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात अद्याप निर्देश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.