शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

तातडीच्या १० हजार रुपये कर्जास बँकांची ‘नकारघंटा’!

By admin | Updated: June 17, 2017 00:59 IST

शासनाच्या सूचना नसल्याचे दिले जातेय लेखी : शेतकरी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफी प्रक्रियेस वेळ लागणार असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करण्याकरिता १० हजार रुपयांचे कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने १४ जून रोजी आदेश काढला; परंतु यासंदर्भातील कुठलेच निर्देश अद्याप प्राप्त नसल्याचे बँकांकडून शेतकरी दाखल करीत असलेल्या शपथपत्रांवर लेखी स्वरूपात लिहून दिले जात आहे. परिणामी, कर्ज घेण्याकरिता बँकांमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांना आल्या पावली खाली हात परतावे लागत आहे. कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून संप पुकारला. सात दिवस चाललेल्या या संपाची दखल घेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समिती स्थापन करून ११ जून रोजी या समितीची बैठक पार पडली. त्यात ठरल्यानुसार थकीत कर्जदार शेतकऱ्यांसोबतच अन्य शेतकऱ्यांकडे असलेले पीक कर्ज माफ करण्याबाबत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. मात्र, कर्जमाफीसाठी पात्रता व इतर अटी निश्चित करण्यासाठी वेळ लागणार असल्याने कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते खरेदीकरिता १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेश देण्यात आला. यासाठी ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज देण्यासंदर्भात जिल्हा बँका व व्यापारी बँकांना आदेश जारी करण्यात आला आहे; परंतु यासंदर्भात वाशिम जिल्ह्यातील एकाही बँकेला १६ जूनपर्यंत कुठलेच निर्देश प्राप्त झालेले नाहीत. परिणामी, शपथपत्र घेऊन बँकेत जाणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पावली खाली हात परतावे लागत आहे. यामुळे शासनाचा तकलादूपणा उघड होत असून, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील शेतकऱ्यांमध्ये या धोरणाप्रती संताप व्यक्त होत आहे. चलन तुटवड्याचा प्रश्न अद्याप कायम; बँकांकडून कर्जपुरवठा होणार तरी कसा?स्वत:ची गरज भागवून जिल्ह्यातील इतर बँकांना चलन पुरविणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाला रिझर्व्ह बँकेकडून पुरेशा प्रमाणात चलन मिळणे दुरापास्त झाले आहे. त्याचा थेट परिणाम खरीप पीक कर्ज वितरणावरही झाला आहे. ११५० कोटी रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत गुरुवारपर्यंत केवळ २२ टक्के कर्ज वाटप झाले असून, ज्या शेतकऱ्यांना कर्ज मंजूर झाले, त्यांची रक्कम बँकेत अडकून आहे. अशा स्थितीत नव्याने कर्जमाफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीच्या कर्जवाटप योजनेंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपये कर्ज पुरवठा करणार तरी कसा, असा प्रश्न बँकांना भेडसावत आहे. त्यामुळे शासनाने जरी तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असले, तरी ते मिळेलच, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तातडीचे कर्ज देण्यास बँक व्यवस्थापकांचा ‘लेखी’ नकार!पंचाळा (ता. वाशिम) येथील नारायण श्रीरंग विभूते आणि चतुराबाई श्रीरंग विभूते या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी नियमानुसार शपथपत्र भरून १६ जून रोजी बँक आॅफ इंडियाकडे तातडीच्या १० हजार रुपये कर्जाची मागणी केली. मात्र, यावेळी बँकेच्या व्यवस्थापकांनी वरिष्ठ पातळीवरून यासंदर्भात कुठलेच स्पष्ट निर्देश नसल्याने कर्ज देण्यास नकार दर्शविला. जिल्ह्यातील वाशिमसह इतर तालुक्यांमधील असंख्य शेतकऱ्यांनाही असाच अनुभव येत आहे. स्टेट बँकेलाही तातडीचे १० हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात अद्याप निर्देश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.