शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

तातडीच्या १० हजार रुपये कर्जास बँकांची ‘नकारघंटा’!

By admin | Updated: June 17, 2017 00:59 IST

शासनाच्या सूचना नसल्याचे दिले जातेय लेखी : शेतकरी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफी प्रक्रियेस वेळ लागणार असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करण्याकरिता १० हजार रुपयांचे कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने १४ जून रोजी आदेश काढला; परंतु यासंदर्भातील कुठलेच निर्देश अद्याप प्राप्त नसल्याचे बँकांकडून शेतकरी दाखल करीत असलेल्या शपथपत्रांवर लेखी स्वरूपात लिहून दिले जात आहे. परिणामी, कर्ज घेण्याकरिता बँकांमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांना आल्या पावली खाली हात परतावे लागत आहे. कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून संप पुकारला. सात दिवस चाललेल्या या संपाची दखल घेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समिती स्थापन करून ११ जून रोजी या समितीची बैठक पार पडली. त्यात ठरल्यानुसार थकीत कर्जदार शेतकऱ्यांसोबतच अन्य शेतकऱ्यांकडे असलेले पीक कर्ज माफ करण्याबाबत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. मात्र, कर्जमाफीसाठी पात्रता व इतर अटी निश्चित करण्यासाठी वेळ लागणार असल्याने कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते खरेदीकरिता १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेश देण्यात आला. यासाठी ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज देण्यासंदर्भात जिल्हा बँका व व्यापारी बँकांना आदेश जारी करण्यात आला आहे; परंतु यासंदर्भात वाशिम जिल्ह्यातील एकाही बँकेला १६ जूनपर्यंत कुठलेच निर्देश प्राप्त झालेले नाहीत. परिणामी, शपथपत्र घेऊन बँकेत जाणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पावली खाली हात परतावे लागत आहे. यामुळे शासनाचा तकलादूपणा उघड होत असून, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील शेतकऱ्यांमध्ये या धोरणाप्रती संताप व्यक्त होत आहे. चलन तुटवड्याचा प्रश्न अद्याप कायम; बँकांकडून कर्जपुरवठा होणार तरी कसा?स्वत:ची गरज भागवून जिल्ह्यातील इतर बँकांना चलन पुरविणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाला रिझर्व्ह बँकेकडून पुरेशा प्रमाणात चलन मिळणे दुरापास्त झाले आहे. त्याचा थेट परिणाम खरीप पीक कर्ज वितरणावरही झाला आहे. ११५० कोटी रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत गुरुवारपर्यंत केवळ २२ टक्के कर्ज वाटप झाले असून, ज्या शेतकऱ्यांना कर्ज मंजूर झाले, त्यांची रक्कम बँकेत अडकून आहे. अशा स्थितीत नव्याने कर्जमाफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीच्या कर्जवाटप योजनेंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपये कर्ज पुरवठा करणार तरी कसा, असा प्रश्न बँकांना भेडसावत आहे. त्यामुळे शासनाने जरी तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असले, तरी ते मिळेलच, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तातडीचे कर्ज देण्यास बँक व्यवस्थापकांचा ‘लेखी’ नकार!पंचाळा (ता. वाशिम) येथील नारायण श्रीरंग विभूते आणि चतुराबाई श्रीरंग विभूते या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी नियमानुसार शपथपत्र भरून १६ जून रोजी बँक आॅफ इंडियाकडे तातडीच्या १० हजार रुपये कर्जाची मागणी केली. मात्र, यावेळी बँकेच्या व्यवस्थापकांनी वरिष्ठ पातळीवरून यासंदर्भात कुठलेच स्पष्ट निर्देश नसल्याने कर्ज देण्यास नकार दर्शविला. जिल्ह्यातील वाशिमसह इतर तालुक्यांमधील असंख्य शेतकऱ्यांनाही असाच अनुभव येत आहे. स्टेट बँकेलाही तातडीचे १० हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात अद्याप निर्देश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.