शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्षपदी खरपडे, उपाध्यक्ष गंधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:05 IST

जिल्हा परिषदेच्या उर्वरित अडीच वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपचे विजय सु. खरपडे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे निलेश गंधे ह्यांची बिनविरोध निवड झाली.

हितेन नाईक ।पालघर: जिल्हा परिषदेच्या उर्वरित अडीच वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपचे विजय सु. खरपडे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे निलेश गंधे ह्यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी प्रारंभी सेनेने प्रकाश निकम यांचे नाव निश्चित केले होते. परंतु भाजप ने विरोध केल्याने ऐनवेळी त्यांना रिंगणातून बाहेर पडावे लागले व गंधेंची लॉटरी लागली.पालघर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांची पहिल्या अडीच वर्षाची कारकीर्द संपुष्टात आल्या नंतर पुढील अडीच वर्षासाठी आज निवडणूक झाली. जिल्हा परिषदेत भाजप चे २१, शिवसेनेचे १५ , बहुजन विकास आघाडीचे १०,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ५, राष्ट्रवादी ४, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे एकूण ५७ सदस्य निवडून आले होते. राज्यात भाजप-शिवसेने मध्ये युती असली तरी त्यांच्यातील अंतर्गत वाद जगजाहीर होता.शिवसेना सत्तेच्या हव्यासापोटी भाजपसोबत फरफटत जात असल्याचा आरोप विरोधी पक्षा कडून केला जात असल्याच्या पाशर््वभूमीवर पालघर मध्येही ह्याचे पडसाद उमटत होते. दुसºया अडीच वर्षाच्या कारकिर्दीत उपाध्यक्षपदासाठी प्रकाश निकम यांच्या नावाचे पत्र मातोश्री वरून आले असतांना एन वेळी पालकमंत्र्यांनी केलेल्या विरोधामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याची चर्चा होती. त्यामुळे दोघांमधून विस्तवही जात नसल्याचे निदर्शनास येत होते.भाजपने अध्यक्षपदासाठी विजय खरपडे यांचे नाव घोषित केले होते. तर उपाध्यक्षपदा साठी सेनेतून गटनेते निलेश गंधे, प्रकाश निकम आणि घनश्याम मोरे ह्यांची नावे मातोश्रीवर पाठविण्यात आली होती. वाडा विधानसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार म्हणून प्रकाश निकम यांच्याकडे पाहिले जात असल्याने त्यांना उपाध्यक्षपद मिळाल्यास सेनेची ताकद वाढून ते पालकमंत्र्यांना डोईजड ठरू शकतात. ह्या कारणाने भाजप मधून त्यांना मोठा विरोध होता. निकम यांच्या नावाचा आग्रह धरल्यास बिनशर्त पाठिंबा दिलेल्या बविआशी भाजप जवळीक साधेल व सेनेला सत्तेतून बाहेर काढेल, अशी भीती सेनेला होती. त्यामुळे युती तोडायची नाही असे ठरवून उपाध्यक्ष पद व एक सभापती पद पदरी पाडून निकम यांना माघार घेण्यास सांगितले.उपाध्यक्षपदा साठी राष्ट्रवादीचे दामोदर पाटील ह्यांनीही अर्ज भरला होता,तो त्यांनी मागे घेतल्याने गंधे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.