शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षक पुरस्काराला नियमांचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 00:01 IST

शिक्षक नाराज : घोषणा होऊनही शासनाच्या तरतुदीअभावी शिक्षक वंचित

अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी : प्राथमिकप्रमाणेच माध्यमिक शिक्षकांना पुरस्कार देण्याची घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी गतवर्षीच्या जिल्हा आदर्श पुरस्कार सोहळ्यात केली होती. त्याचे स्वागतही झाले होते. मात्र यंदा प्रत्यक्षात त्याची कार्यवाही न झाल्याने माध्यमिक शिक्षकांमध्ये नाराजी आहे. व्यासपीठावरील घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी हा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येक तालुक्यातून एक अशा एकूण आठ प्राथमिक शिक्षकांना शिक्षक दिनी पालघर जिल्हा परिषदेकडून जिल्हा आदर्श पुरस्काराने दरवर्षी गौरविण्यात येते. गतवर्षी या सोहळ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांनी प्राथमिकच्या धर्तीवर माध्यमिक शिक्षकांनाही सन्मानित करण्याची घोषणा केली होती.

प्रत्यक्षात मात्र यंदा माध्यमिक शिक्षक या पुरस्कारापासून वंचित राहिल्याने टीकेचे मोहोळ उठले. याबाबत खरपडे यांना विचारले असता ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी तरतूद आहे. त्याच धर्तीवर माध्यमिक शिक्षकांना हा सन्मान मिळावा म्हणून शासनाकडून मार्गदर्शन मागवले होते. परंतु तशी तरतूद माध्यमिकसाठी नसल्याचे उत्तर त्यांच्याकडून कळविण्यात आले. त्यामुळे इच्छा असूनही या शिक्षक मित्रांना पुरस्कार देता येत नसल्याची खंत आहे.

दरम्यान, राज्य शिक्षक पुरस्काराची रक्कम १ लक्ष १० हजार रुपये असताना प्राथमिक शिक्षक पुरस्काराची रक्कम अवघे ५०० रुपये आहे. ही रक्कम वाढवण्याची मागणी केली जाते. ही रक्कम फारच तुटपुंजी असून दोघांमध्ये मोठी तफावत असल्याची टीकाही होते. या सोहळ्यासाठी मिळालेल्या निधीचा मेळ बसवताना त्यामध्ये वाढ करता येणे शक्य नसल्याचे खरपडे म्हणाले. या पुढेही जिल्हा आदर्श पुरस्कारापासून माध्यमिक शिक्षकांना वंचित रहावे लागणार असून प्राथमिक शिक्षकांना अल्प पुरस्कार निधीत समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे यासाठी खा. राजेंद्र गावित आणि सहा विधानसभा मतदार संघाच्या आमदारांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराचे दरवाजे बंदराज्य शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याची पद्धत काही वर्षांपूर्वी शासनाने बंद केली आहे. यासाठी राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार समकक्षेत आणल्याची सबब पुढे केली आहे. यामुळे राज्य शासनाने राष्ट्रीय पुरस्काराचे दरवाजे बंद केल्याची खंत अशा शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी अनुक्र मे एक, दोन आणि तीन प्रमाणे वेतनश्रेणी दिली जात होती. ती पद्धतही बंद करून आता रोख रक्कम दिली जाते. त्याचा आर्थिक फटका त्यांना बसत असून त्यामुळे सेवा काळात लाखो रुपयांवर पाणी सोडावे लागत असल्याची खंत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTeachers Dayशिक्षक दिन