शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

युवकांनी उमेदवारांची योग्यता पाहून मतदान करावे

By admin | Updated: January 26, 2017 02:46 IST

आज आपल्या देशात सुदृढ, सशक्त लोकशाही ही युवाशक्ती मुळे बनली असली तरी आजही धर्म, भाषा, वंशाच्या आधारे निवडणुकीत मतदान

पालघर : आज आपल्या देशात सुदृढ, सशक्त लोकशाही ही युवाशक्ती मुळे बनली असली तरी आजही धर्म, भाषा, वंशाच्या आधारे निवडणुकीत मतदान केले जात असून युवा नी अशा बाबी विचारात न घेता योग्यतेच्या आधारे प्रतिनिधी निवडून द्यावा असे आवाहन जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांनी युवकांना केले.भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ७ व्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजित बांगर, तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, प्रियांका मीना, उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, उमेश बिरारी, तहसीलदार महेश सागर, उपप्राचार्य डॉ.किरण सावे ई. उपस्थित होते.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६८ वर्षाच्या काळात आपण काय मिळवले असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मात्र युवांच्या सहाय्याने बनलेल्या सुदृढ लोकशाहीमुळे आज आपण निष्पक्षपणे निवडणूक प्रक्रि या पार पाडू शकतो, असे सांगताना आजही शेजारच्या देशात लोकशाही सक्षम होऊ शकलेले नसल्याचे आपण पाहत असल्याचे मुख्यधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी उल्लू (घुबड) आणि हंस ह्याची गोष्ट सांगून जाती धर्माच्या आधारे होणारी लोकप्रतिनिधीं निवडीची पद्धत बदलून योग्य, सक्षम, अभ्यासू लोकप्रतिनिधी निवडून देण्याची ताकद युवाशक्तीत असल्याने त्यांनी ती पार पाडावी असे आवाहन केले.तर भारत देशात इतक्या जाती, धर्म, भाषा असताना सर्व नागरिक एकजुटीने राहत आहेत, असे त्या म्हणाल्या. (वार्ताहर)