शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

युवकांनी उमेदवारांची योग्यता पाहून मतदान करावे

By admin | Updated: January 26, 2017 02:46 IST

आज आपल्या देशात सुदृढ, सशक्त लोकशाही ही युवाशक्ती मुळे बनली असली तरी आजही धर्म, भाषा, वंशाच्या आधारे निवडणुकीत मतदान

पालघर : आज आपल्या देशात सुदृढ, सशक्त लोकशाही ही युवाशक्ती मुळे बनली असली तरी आजही धर्म, भाषा, वंशाच्या आधारे निवडणुकीत मतदान केले जात असून युवा नी अशा बाबी विचारात न घेता योग्यतेच्या आधारे प्रतिनिधी निवडून द्यावा असे आवाहन जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांनी युवकांना केले.भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ७ व्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजित बांगर, तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, प्रियांका मीना, उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, उमेश बिरारी, तहसीलदार महेश सागर, उपप्राचार्य डॉ.किरण सावे ई. उपस्थित होते.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६८ वर्षाच्या काळात आपण काय मिळवले असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मात्र युवांच्या सहाय्याने बनलेल्या सुदृढ लोकशाहीमुळे आज आपण निष्पक्षपणे निवडणूक प्रक्रि या पार पाडू शकतो, असे सांगताना आजही शेजारच्या देशात लोकशाही सक्षम होऊ शकलेले नसल्याचे आपण पाहत असल्याचे मुख्यधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी उल्लू (घुबड) आणि हंस ह्याची गोष्ट सांगून जाती धर्माच्या आधारे होणारी लोकप्रतिनिधीं निवडीची पद्धत बदलून योग्य, सक्षम, अभ्यासू लोकप्रतिनिधी निवडून देण्याची ताकद युवाशक्तीत असल्याने त्यांनी ती पार पाडावी असे आवाहन केले.तर भारत देशात इतक्या जाती, धर्म, भाषा असताना सर्व नागरिक एकजुटीने राहत आहेत, असे त्या म्हणाल्या. (वार्ताहर)