शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 05:43 IST

तक्रार देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे मुलीने आपले जीवन संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला

नालासोपारा : लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीरसंबंध ठेवले, मात्र नंतर प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने येथील एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तक्रार देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे मुलीने आपले जीवन संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.आरोपी सुनील माने (२८) याने नालासोपाऱ्यात राहणाºया तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला, मात्र नंतर त्याने लग्नास नकार दिला. याविरोधात तरुणीने तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. उलट, यामध्ये त्या तरुणीचीच चूक असल्याचे पोलिसांनी तिला सांगितल्यामुळे ती नैराश्यात गेली आणि तिने आपले जीवन संपवले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरकर यांनी तरुणीच्या आईशीही अपमानजनक वर्तन केल्याचा आरोप होत असून नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मात्र, डीसीपी विजयकांत सागर यांनी केलेल्या विनंतीनंतर मृतदेह ताब्यात घेऊन शनिवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. नालासोपारा येथील अन्सारी नगरात राहणारा आरोपी सुनील माने याला अटक करण्यात आली आहे. तिच्या घरात दोन सुसाईड नोट सापडल्या असून त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. तरुणीची आई पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल करायला गेली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरकर यांनी तिला अपमानजनक प्रश्न विचारल्याचा आरोप तरुणीच्या आईने केला आहे. तरुणीच्या आईने डीसीपी विजयकांत सागर यांच्याकडेही तक्रार केली असून डीवायएसपी अश्विनी पाटील या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गिरकर यांची चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्या