शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

यावर्षीही ११ वी प्रवेशाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:04 AM

तालुक्याचा दहावीचा ८९.०४ टक्के निकाल लागला असून, १ हजार ८७७ विद्यार्थी पास झाले आहेत. मात्र तालुक्यात ११ वी प्रवेशाच्या जागा अवघ्या ५५० आहेत

हुसेन मेमन जव्हार : तालुक्याचा दहावीचा ८९.०४ टक्के निकाल लागला असून, १ हजार ८७७ विद्यार्थी पास झाले आहेत. मात्र तालुक्यात ११ वी प्रवेशाच्या जागा अवघ्या ५५० आहेत. त्यामुळे यावर्षीही अकरावी प्रवेशाच्या जागा कमी असल्याने कमी टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला अथवा इतर ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. परणामी ११ वी प्रवेशाची समस्या यावर्षीही उद्भवणार आहे. त्यामुळे तेराशे विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येणार कि काय? अशी भीती पालक व विद्यार्थ्यांना भेडसावते आहे.जव्हार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणा-या आश्रम शाळा आणि अनुदानित आश्रम शाळा यातून २ हजार एकशे आठ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील १ हजार ८७७ विद्यार्थी परीक्षा पास झाले आहेत. तसेच यामध्ये भारती विद्यापीठ हायस्कूल, वडोली हायस्कूल, श्रीजयेश्वर विद्यालय डेंगाचीमेट, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जव्हार, अशा चार शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्याच बरोबर १० आश्रम शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. त्यामुळे ११ वीत प्रवेश मिळेल कि नाही अशी चिंता पालकांना वाटायला लागली आहे.दरम्यान जव्हार शहरात अवघे दोन कॉलेज आहेत तर ११ वी साठी शासकीय आश्रम शाळा विनवळ, देहेरा, दाभोसा, न्याहाळा, अशा ठिकाणी बारावी पर्यंत वर्ग आहेत. तसेच यापैकी काही विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश मिळू शकतो. उर्वरीत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची समस्या यावर्षीही गंभीर आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला असून, पालकवर्ग चिंताक्रांत झाला आहे.