शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

यादव म्हात्रे खून खटला, पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध होणार अ‍ॅट्रॉसिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 05:47 IST

तिघांना गोवले : अनुसूचित जमाती आयोगाचे आदेश

वसई : गेली ३० वर्षे गाजत असलेल्या वसई पूर्व पट्टीतील कामण गावातील यादव म्हात्रे खून खटला अंतीम टप्प्यात आला असून, या प्रकरणी दोषी पोलीस अधिकाºयांवरच आता अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती या खून खटला प्रकरणाचे प्रत्यक्ष साक्षिदार तथा तक्र ारदार गंगाधर म्हात्रे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, दिल्ली यांच्या निर्देशावरून दिली, वसई पुर्व पट्टीतील कामण येथीस सामाजिक कार्यकर्ते यादव म्हात्रे यांची २९ जुन १९८७ ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

या गुन्ह्यात म्हात्रे यांचे बंधु गंगाधर म्हात्रे हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांच्या साक्षेवरून सुरवातीला खºया मारेकºयांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले होते. या विभागाचे पोलीस निरिक्षक सुदर्शन एरागुंठाराव आणि एस. एम. पिंपळकर यांनी खºया आरोपींना वाचवण्यासाठी गणपत तुंबडा, त्याची मुले अशोक आणि दिलीप या आदिवासींना या प्रकरणात गोवले. दरम्यान, या तिघांनी हा गुन्हा आपल्या नावावर घ्यावा यासाठी त्यांना पोलीस कोठडीत त्यावेळी अमानुष मारहाण ही करण्यात आली होती. त्यानंतर जामीनावर सुटल्यावर गणपत तुंबडा आणि अशोकचा मृत्यू झाला, तर दिलीपला कायमचे अपंगत्व आले. मात्र, गंगाधर म्हात्रे यांची साक्ष आणि त्यांनी सादर केलेल्या पुराव्यामुळे तिन्ही आदिवासींची २९ वर्षानंतर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.एकूणच पोलीसांनी खºया आरोपींना वाचवण्यासाठी या तिघांना गोवून त्यांच्या कुटुंबांचे आयुष्य उध्वस्त केले. त्यामुळे संबंधीत दोषी पोलीस अधिकाºयांवर अ‍ॅट्रॉसिटी अन्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, आणि आदिवासी कुटुंबाला भरपाई मिळावी अशी मागणी गंगाधर म्हात्रे, भूमी सेनेचे नेते काळुराम धोदडे, राजु पांढरा यांनी केली होती.भरपाई व कार्यवाहीची मागणीत्यावर या आयोगाने सुनावणी घेताना संबंधीत दोषी पोलीस अधिकाºयांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली कारवाई करण्यात यावी. तर नाहक गोवल्या गेलेल्या आदिवासींच्या कुटुंबांना पुरेशी भरपाई देण्यात यावी. स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आदिवासींना स्वत:ची मालमत्ता विकावी लागल्यामुळे पालघर जिल्हाधिकाºयांनी त्यांना पाच एकर जमीन द्यावी. अशा शिफारसी या आयोगाच्या सदस्या माया इनवटे यांनी शासनाकडे केल्या असून या सुनावणीच्या वेळी कोकणविभागिय पोलीस अधिक्षक के. व्ही. निजाई, वसईचे तहसिलदार वाय. सी. पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. परिणामी या निकालामुळे वसईमध्ये खळबळ उडाली असून आयोगाच्या शिफारशीनुसार आता संबंधित दोषी पोलीस अधिकाºयांवर त्वरित अत्याचार प्रतिबंधक कायदाखाली चौकशी अंती गुन्हे दाखल होणार हे निश्चित झाले असून पुन्हा मागासवर्गीय अधिकाºयाकडूनच या प्रकरणाचा तपास करून ३० दिवसात अहवाल सादर करावा असे ही आयोगाने म्हंटले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार