शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

गुन्हा दाखल न करताच रेतीचे ट्रक सोडल्याने संताप ; केली दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:16 IST

रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल न करताच दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने महसूल खात्याचे अधिकारी रेती चोरांना अभय देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

- शशी करपेवसई : रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल न करताच दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने महसूल खात्याचे अधिकारी रेती चोरांना अभय देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक नायब तहसिलदार हरिश्चंद्र जाधव यांनी पकडले होते. पकडलेले ट्रक मनवेलपाडा पोलीस चौकीत नेण्यात आले होते. दोन दिवस ट्रक पोलीस चौकीजवळ ठेवण्यात आले होते. मात्र, संबंधितांवर दोन दिवसात गुन्हा दाखल करण्याची कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.याप्रकरणी नायब तहसिलदार जाधव यांनी ट्रक पकडण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दंडात्मक रक्कम भरल्याने कारवाई करण्याचा प्रश्नच उरत नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढील कारवाई तहसिलदार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसिलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता दंडात्मक कारवाई केल्यावर दंडाची रक्कम भरल्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.वसई विरार परिसरात सध्या चोरटे रेती उत्खनन आणि चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. पोलीस, महसूल विभागाचा वरदहस्त असल्याने सुट्टीच्या दिवशी आणि रात्रभर मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर चोरटी रेती वाहतूक केली जाते. त्यात पकडलेल्या ट्र्कवर फौजदारी कारवाई न करता फक्त दंडात्मक कारवाई करूनसोडून दिले जात आहे. त्यामुळे चोरटी रेती वाहतूकीला महसूल खात्याकडूनच पाठिंबा दिला जात असल्याचाआरोप केला जातो. त्यातच रेतीवाले ब-याचदा महसुल अधिकाºयांवरहल्ले करण्याचे प्रकारही सुरु असल्याने कर्मचारी हतबल होतत असे चित्र आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार