शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ऊन-पावसात करून काम, रोहयो मजुरांना मिळेना दाम, आदिवासींमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 11:56 IST

जिल्ह्यातील  ६०  हजारांहून अधिक मजुरांची सुमारे  ३५  कोटी रुपये मजुरी थकली आहे.

मोखाडा : आदिवासी लोकवस्ती असलेल्या पालघर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी आणि रोजगार हमी योजनेद्वारे आदिवासी मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे; मात्र या योजनेंतर्गत काम केल्यानंतर  १५  दिवसांत मजुरी मिळत नाही. तरीही येथील आदिवासी मजूर पोटाला चिमटा देत घाम गाळत आहेत.  

जिल्ह्यातील  ६०  हजारांहून अधिक मजुरांची सुमारे  ३५  कोटी रुपये मजुरी थकली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये कारखाने अथवा औद्योगिक वसाहती नाहीत. शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व रोजगार हमी योजना यांच्यावर मजुरांना रोजगारासाठी अवलंबून रहावे लागते आहे.

या धोरणानुसार मजुरांनी कामाची मागणी केल्यानंतर काम देणे व काम संपल्यानंतर  १५  दिवसांत मजुरी देणे अनिवार्य आहे; मात्र आदिवासींची मजुरी थकवली जात आहे.

५५,९८२ जणांना कामपालघर जिल्ह्यात वनविभागाने  ४५  कामांच्या माध्यमातून ३४९० मजुरांना, वनविकास महामंडळाने ५८ कामांवर २३७ मजुरांना तर सामाजिक वनीकरणने ८६ कामांच्या माध्यमातून ३८९ मजुरांना, सार्वजनिक बांधकाम विभागाने १०२ कामे काढून १३,८८० मजुरांना तर रेशीम उद्योगाने ६ कामांच्या माध्यमातून ३७ मजुरांना तर ग्रामपंचायत स्तरावर ७४६  कामांच्या माध्यमातून २१,००९ मजुरांना ग्रामपंचायत स्तर व इतर यंत्रणा मिळून रोहयोच्या  अहवालानुसार १,४२४ कामांच्या माध्यमातून ५५,९८२ मजुरांच्या हाताला काम देण्यात आले आहे.

टॅग्स :palgharपालघर