शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

कोणतीही बाजू ऐकून न घेता आदिवासींच्या घरावर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:20 IST

जिल्हाधिकाऱ्यांना साकडे : पावसाळ्याच्या तोंडावर कुटुंब उघडयावर

जव्हार : जव्हार वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडील वनक्षेत्र परिमंडळ जुनी जव्हार येथील आदिवासी समाजातील यशवंत बाळू घाटाळ याच्या घरावर मंगळवारी वनविभागाने हतोडा टाकला. पंचवीस ते तीस वर्षांपासून तेथे राहणारे घाटाळ कुटुंब या कारवाई मुळे रस्त्यावर आले असून त्यांना शेजारच्या झाला खाली आसरा घेतला आहे.

गावं सर्वे नंबर ३९ मध्ये जुनीजव्हार येथे यशवंत बाळू घाटाळ यांनी वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता विट मातीचे घर बांधले होते. त्यामुळे ही तोड कारवाई केल्याचे वनविभागाने सांगितले आहे. दरम्यान, यशवंत घाटाळ यांच्या म्हण्यानुसार आम्ही गेल्या २५ ते ३० वर्षांपासून या आमच्या वन प्लॉटमध्ये राहत असून, या वनप्लॉटची फाईल प्रांत कार्यालयात प्रलंबित आहे. तसेच या तोडलेल्या घराची घरपट्टी देखील चालू आहे. मात्र वन विभागाने आम्हला चुकीची नोटीस बजावून आणि आम्ही कुठलाही गुन्हा कबूल न करताही जेसीबी लावून आमचे घर तोडले आहे.

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आम्हला वन विभागाने बेघर केले आहे. वन विभागाच्या नोटीसमध्ये गुन्हा कबूल केल्याचे लिहले आहे. ते सर्व चुकीचे लिहले गेले असून, आमच्या अशिक्षितपणाचा वन विभागाने फायदाघेत कोºया कागदावर सह्या, अंगठे घेवून आम्हला बेघर केले आहे. त्यामुळे आमची मोठी नुकसान झाले असल्याची व्यथा त्यांने मांडली. जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

जुनी जव्हार गावं सर्वे नंबर ३९ मध्ये ज्या ठिकाणी आमचे घर होते. तो वनप्लॉट आमच्या नावावर करण्यासाठी आमचा वनप्लॉटसाठी केलेला दावा प्रांत कार्यालयात प्रलंबित आहे. तसेच, आम्ही येथील आदिवासी असताना ही कारवाई अन्यायकारक असल्याचे ते म्हणाले. आमचा वनप्लॉटचा दावा प्रलंबित असल्याने आमच्यावर कोणतीही कारवाई करू नये. यासाठी आम्ही वन विभागाने दिलेल्या नोटिसाला आम्ही उत्तर दिले आहे. मात्र, तरीही वन विभागाने कोणतीही सुनावणी न घेता आमच्यावर अन्याय केला असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.वनविभागाने आमचा अशिक्षतिपणाचा फायदा घेत आमच्या कोºया कागदावर सही, अंगठा घेवून आमची फसवणूक केली आहे. आम्ही कुठलाही गुन्हा कबूल केलेला नाही. आमचे घर तोडल्याने आम्ही बेघर झालो आहे.जयवंती यशवंत घाटाळ, - घर मालकीणशासनाच्या जीआरप्रमाणे त्या वनप्लॉट धारकाला त्याच्या वनप्लॉट क्षेत्रात घर बांधण्याचा जीआर आहे. तरीही वन विभागाने या कुटुंबावर केलेली कारवाई चुकीची आहे. त्यामुळे आम्ही याविषयी शासनाच्या निर्णयानुसार दाद मागणार आहोत.रतन बुधर,जि. प. सदस्य