शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

शिक्षकांविनाच सुरू होणार ग्रामीण परिसरातील शाळा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 00:46 IST

मानधनावरील शिक्षकांच्या नेमणुका नाहीत : जि.प. शिक्षण विभाग सुस्त

सुरेश काटे

तलासरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असून मुलांचे ऑनलाइन शिक्षण चालू आहे, पण या ऑनलाइन शिक्षणाचा तलासरी तालुक्यात बट्ट्याबोळ उडाला असतानाच आता शासनाच्या निर्णयानुसार तलासरीत सोमवारपासून शाळा सुरू होणार  आहेत. मात्र मानधनावरील शिक्षकांच्या अद्याप नेमणुकाच झालेल्या नसल्यामुळे शिक्षकांविनाच शाळा  सुरू होणार असल्याने आश्चर्य व्यक्त  होत आहे.

तलासरीत माध्यमिकच्या एकूण ४८ शाळा असून त्यापैकी ११ माध्यमिक शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता जिल्हा परिषदेने ११ माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, पण या माध्यमिकसाठी शिक्षक भरतीच करण्यात आली नाही. त्यामुळे माध्यमिकसाठी गणित, इंग्रजी, सायन्ससाठी मानधन तत्त्वावर दरवर्षी शिक्षक घेतले जातात, तर उर्वरित विषय हे प्राथमिकचे शिक्षक घेतात. जिल्हा परिषदेच्या ११ शाळांत इयत्ता ९ वीचे ८८२ विद्यार्थी आहेत, तर इयत्ता १० वीचे ५५१ विद्यार्थी आहेत. यासाठी ३३ पदे मंजूर करण्यात आली असून गेल्या शैक्षणिक वर्षात ३३ पदांपैकी २७ पदे भरण्यात आली होती, तर ६ पदे  रिक्त होती.

माध्यमिक शाळांसाठी मंजूर असलेली ३३ पदे भरणे किंवा गेल्या वर्षीच्या मानधनावरील शिक्षकांना पुन्हा नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेने काढणे आवश्यक असताना ते न काढल्याने संबंधित शिक्षकांना आदेशाशिवाय शिकवायला जायचे कसे, हा प्रश्न पडला आहे, तर प्राथमिकच्या शिक्षकांना ५० टक्क्यांनुसार हजेरी आवश्यक असल्याचे सांगितले, तर माध्यमिकला शिकविण्यासाठी प्राथमिकच्या शिक्षकांना स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणारी माध्यमिकची शाळा शिक्षकांविनाच सुरू होणार आहे.

माध्यमिकच्या शाळा सुरू करण्याचे आदेश मिळताच खासगी शाळांनी आपल्या शिक्षकांच्या कोरोना  चाचण्या करून घेतल्या असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी  स्पष्ट केले, तर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यासाठी ना शिक्षकांच्या नेमणुका ना कोरोना चाचण्या. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार