शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नवघर पूर्वेतील मिठागर वस्त्यांचे पुनर्वसन होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:37 IST

वसई पूर्वेकडील नवघर मिठागरांमधील वस्त्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते.

वसई : वसई पूर्वेकडील नवघर मिठागरांमधील वस्त्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे येथील नागरी वसाहतीचा इतर सर्व यंत्रणा तसेच शहरांतील नागरिकांशी पावसाळ्यात दरवर्षी संपर्क तुटतो.दरवर्षीच्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना म्हणून या मिठागर वस्त्यांचे पुनर्वसन करता येईल का, तसेच त्या वस्त्यांसाठी अन्य पर्यायांद्वारे काही उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी नुकत्याच (नमक) मीठ विभागाला दिल्या आहेत.वसई पूर्वेकडील मिठागरांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावरपाणी साचते. पावसात पूर येऊन संपूर्ण वसाहत पाण्याखाली जाऊन मिठागर वस्तीत पूरपरिस्थिती निर्माण होते तर बरेच दिवस त्यांचा संपर्कही होत नाही.या मिठागर नागरी वसाहतीत साधारण २५० लोकांची वस्ती आहे. या ठिकाणी गुडघाभर किंवा त्यापेक्षा अधिक पटीने पावसाचे पाणी भरल्यानंतर येथील नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. यंदा देखील येथे पाणी साचून संपूर्ण वसाहत पाण्याखाली गेली होती. प्रत्येक वेळी ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी या वस्तीमधील नागरिकांसाठी आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत.वसई - नवघर येथील मिठागरे ही सखल भागांत उभी असून हा परिसर सीआरझेड आरक्षित भाग नकाशावर दिसतो आहे.याठिकाणी समुद्रवजा खाडीचे पाणी अडवून त्याद्वारे मिठाचे उत्पादन घेण्यात येते. त्यामुळे येथे पावसाळ्यात पाणी येणे ही नैसर्गिक प्रक्रि याअसून त्याला आपण बाधा आणू शकत नाही. त्यासाठी येथील वस्तीतील नागरिकांचे पुनर्वसन करता येईल का, यावर पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मीठ विभागाशी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत चर्चा केली. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी या नागरिकांसाठी उपाययोजना करण्यात याव्या, अशा सूचना दिल्या.>पुनर्वसन हाच उपाय !या नवघर पूर्वेस राहणारे नागरी वसाहतीतील सगळीच लोकं काही मिठागराचे उत्पादन घेत नसून पूर्वीपासून करत आलेले काही थोडे फार नागरिक हे उत्पादन घेतात. त्यातील अनेक जण मीठ उत्पादन कमी घेतात व अन्य वेगळा जोडधंदा करतात. यासाठी त्यांच्या पुनर्वसनाचा पर्याय महसूल विभागाने पुढे रेटणे आवश्यक आहे.>महसूल खात्याची अडचणमिठागरे हा ना विकास क्षेत्र भाग म्हणून घोषित आहे. या ठिकाणी विकास कामे करता येणार नाहीत. यासाठी महसूल विभागाला मीठ विभागाच्या आयुक्तांशी चर्चा करून तसा कृती आराखडा तयार करायला लागेल. जागोजागी पाणथळ प्रदेश आहेत. त्यामुळे खूप मोठी कायद्याची अडचण असल्याने महसूल विभागाचे हात कायद्यानेच बांधले आहेत.