शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

एलईडी लाईट व पर्ससीन जाळ्याने होणाऱ्या मासेमारीवर कायदेशीर कारवाई होणार ? मुख्यमंत्र्यांचे आश्वासन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 22:03 IST

समुद्रातील एलईडी लाईट व  पर्ससीन जाळ्याने  संपूर्ण मच्छीमारांचे संसार उद्ध्वस्त झालेले असून सोबत आज मासेमारी धंदा ही उध्वस्त झालेला आहे. 

-आशिष राणे

वसई -  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिलेच राज्य हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये सुरू आहे, या पार्श्वभूमीवर बुधवार दि.18 डिसेंबर रोजी दुपारी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे एक  शिष्टमंडळ मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले, या शिष्टमंडळा मध्ये कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो ,वसईतील मच्छीमार नेते तथा समितीचे सरचिटणीस संजय कोळी, उपाध्यक्ष ऍड कमलाकर कांदेकर ,युवाध्यक्ष पुनित तांडेल आदीं प्रतिनिधी उपस्थित होते.

समुद्रातील एलईडी लाईट व  पर्ससीन जाळ्याने  संपूर्ण मच्छीमारांचे संसार उद्ध्वस्त झालेले असून सोबत आज मासेमारी धंदा ही उध्वस्त झालेला आहे.  त्यामुळे आपली आर्जव घेऊन या  संदर्भात कृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृती समितीची वास्तव व्यथा ही मान्य करीत राज्य शासनाने यापूर्वी काढलेले दोन  जीआर त्याची अंमलबजावणी होत नाही, हे माझ्याही निदर्शनांस आलेलं असल्याचे स्वतः मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान राज्य सरकारने देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना दि.5 फेब्रुवारी 2016 ला पर्ससीन मासेमारी करण्यास बंदी आहे.असा कायदा आला, त्या कायद्यामध्ये 495 मासेमारीला दिलेले परवाने त्वरित रद्द करावेत व  फक्त  500 मीटरची तीसुद्धा कोकणामध्ये 500 मीटरच्या जाळीचे मासेमारी 182 फिगर करण्यात आली होती,

आणि डहाणू पासून ते मुरुड जंजिरा पर्यंत 12 ही  महिने बंदी असताना ससून डॉक बंदरांमध्ये 700 बोटी, मिरकरवाडा बंदरांत 400 व सागर आक्षी अलिबाग 300 बोटी असं दीड ते दोन हजार बोटी बेकायदेशीर परवानगी नसताना मासेमारी करत होत्या, आणि यांस  माजी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचा वरदहस्त होता तर सध्याचे प्रधान सचिव अनुपकुमार ( मत्स्यव्यवसाय) आणि सहआयुक्त (सागरी ) राजेंद्र जाधव यांच्या कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे  मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनांस यावेळी तांडेल यांनी आणून दिले, परिणामी मुख्यमंत्री ठाकरे यांनी समितीचे म्हणणं ऐकून घेतल्यावर या सर्वांवर योग्य ती कारवाई करावी व या दोन हजार भांडवलदारांच्या अनधिकृत  ट्रॉलर चालू आहेत त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल.

तसेच एक बोट ही किनारपट्टीवर बेकायदेशीर चालू असेल त्यांच्यावर फौजदारी दावे दाखल करणे, त्या बोटी जप्त करणे व यापुढे विना परवाना मासेमारी होऊ नये, याकरिता कठोर पावले उचलण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती कृती समितीचे दामोदर तांडेल यांनी लोकमत ला दिली.

 

टॅग्स :fishermanमच्छीमारVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र