शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

एलईडी लाईट व पर्ससीन जाळ्याने होणाऱ्या मासेमारीवर कायदेशीर कारवाई होणार ? मुख्यमंत्र्यांचे आश्वासन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 22:03 IST

समुद्रातील एलईडी लाईट व  पर्ससीन जाळ्याने  संपूर्ण मच्छीमारांचे संसार उद्ध्वस्त झालेले असून सोबत आज मासेमारी धंदा ही उध्वस्त झालेला आहे. 

-आशिष राणे

वसई -  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिलेच राज्य हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये सुरू आहे, या पार्श्वभूमीवर बुधवार दि.18 डिसेंबर रोजी दुपारी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे एक  शिष्टमंडळ मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले, या शिष्टमंडळा मध्ये कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो ,वसईतील मच्छीमार नेते तथा समितीचे सरचिटणीस संजय कोळी, उपाध्यक्ष ऍड कमलाकर कांदेकर ,युवाध्यक्ष पुनित तांडेल आदीं प्रतिनिधी उपस्थित होते.

समुद्रातील एलईडी लाईट व  पर्ससीन जाळ्याने  संपूर्ण मच्छीमारांचे संसार उद्ध्वस्त झालेले असून सोबत आज मासेमारी धंदा ही उध्वस्त झालेला आहे.  त्यामुळे आपली आर्जव घेऊन या  संदर्भात कृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृती समितीची वास्तव व्यथा ही मान्य करीत राज्य शासनाने यापूर्वी काढलेले दोन  जीआर त्याची अंमलबजावणी होत नाही, हे माझ्याही निदर्शनांस आलेलं असल्याचे स्वतः मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान राज्य सरकारने देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना दि.5 फेब्रुवारी 2016 ला पर्ससीन मासेमारी करण्यास बंदी आहे.असा कायदा आला, त्या कायद्यामध्ये 495 मासेमारीला दिलेले परवाने त्वरित रद्द करावेत व  फक्त  500 मीटरची तीसुद्धा कोकणामध्ये 500 मीटरच्या जाळीचे मासेमारी 182 फिगर करण्यात आली होती,

आणि डहाणू पासून ते मुरुड जंजिरा पर्यंत 12 ही  महिने बंदी असताना ससून डॉक बंदरांमध्ये 700 बोटी, मिरकरवाडा बंदरांत 400 व सागर आक्षी अलिबाग 300 बोटी असं दीड ते दोन हजार बोटी बेकायदेशीर परवानगी नसताना मासेमारी करत होत्या, आणि यांस  माजी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचा वरदहस्त होता तर सध्याचे प्रधान सचिव अनुपकुमार ( मत्स्यव्यवसाय) आणि सहआयुक्त (सागरी ) राजेंद्र जाधव यांच्या कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे  मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनांस यावेळी तांडेल यांनी आणून दिले, परिणामी मुख्यमंत्री ठाकरे यांनी समितीचे म्हणणं ऐकून घेतल्यावर या सर्वांवर योग्य ती कारवाई करावी व या दोन हजार भांडवलदारांच्या अनधिकृत  ट्रॉलर चालू आहेत त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल.

तसेच एक बोट ही किनारपट्टीवर बेकायदेशीर चालू असेल त्यांच्यावर फौजदारी दावे दाखल करणे, त्या बोटी जप्त करणे व यापुढे विना परवाना मासेमारी होऊ नये, याकरिता कठोर पावले उचलण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती कृती समितीचे दामोदर तांडेल यांनी लोकमत ला दिली.

 

टॅग्स :fishermanमच्छीमारVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र