शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

पालघरमधील ग्रामसेवकांचा मुद्दा विधान परिषदेत गाजणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:21 IST

महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव यांनी २४ नोव्हेंबरला पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून आ. मेटे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व सविस्तर माहिती मागवली आहे

पंकज राऊतबोईसर : ग्रामविकास विभागाच्या शासन परिपत्रकानुसार पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये कारभार चालतो का? ग्रामपंचायतींच्या मासिक सभा व ग्रामसभेचे इतिवृत्त गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी वेळेत पाठवितात का? तसेच ते वेळेत सादर न करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली? इत्यादी मुद्दे विधान परिषदेत गाजण्याची शक्यता आहे. आ. विनायक मेटे यांनी याची दखल घेतली असून तारांकित प्रश्नाद्वारे विधान परिषदेत प्रश्न विचारले आहेत. परिणामी ग्रामपंचायतींच्या कारभाराचे वास्तव समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव यांनी २४ नोव्हेंबरला पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून आ. मेटे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व सविस्तर माहिती मागवली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी २५ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांकडून उपरोक्त प्रश्नांची भागवार उत्तरे, पूरक टिप्पणीसह मेलद्वारे कार्यालयास पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.ग्रामपंचायतीची मासिक सभा व ग्रामसभेचे इतिवृत्त ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे वेळेत जमा करणे आवश्यक आहे. पालघर जिल्ह्यात इतिवृत्त वेळेत सादर केले जात नसल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय? सादर न करणाऱ्या ग्रामसेवकावर काय? या प्रश्नांची उत्तरे ११ डिसेंबरला विधान परिषदेत ग्रामविकास विभागाकडून मिळणार आहेत.

टॅग्स :palgharपालघर