शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदरविरोधी लढ्यात शिवसेना गप्प का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:56 IST

स्थानिकांचा संतप्त सवाल : शिवसेनेचे पदाधिकारी, प्रभारी सरपंचाला नागरिकांनी दाखवला बाहेरचा रस्ता

- हितेन नाईकn  लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : वाढवणवासीयांच्या सोबतीला आता जिल्ह्यातील किनारपट्टीवरील अनेक लोक पुढे येऊ लागले असून वाढवणविरोधातील संघर्षाची धार तेज होऊ लागली आहे. अशा वेळी बुधवारी रात्री स्थानिकांची मते जाणून घेण्यासाठी आलेले शिवसेनेचे पदाधिकारी तथा एनजीओच्या अध्यक्षांना लोकांनी संतप्त होत गावाबाहेरचा रस्ता दाखवला.

वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असेल, तर बंदरविरोधातील लढ्यात शिवसेना त्यांच्या सोबतीला असेल, असे जाहीर वक्तव्य आणि विश्वास शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हावासीयांना दिला होता. असे असताना त्यांच्याच पक्षाचे पालघरमधील युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव परीक्षित पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी निर्माण केलेल्या ‘अभिनव जनसेवा असोसिएशन’ या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाशी संबंधित संस्थेचे पदाधिकारी वाढवण गावात आले. या वेळी आम्ही आमच्या संस्थेकडून सर्वेक्षण करून इथल्या ग्रामस्थांचे वाढवण बंदराबाबत असलेले मत, सोयी-सुविधा, सामाजिक परिस्थिती, कोणत्या समाजाचे वास्तव्य आहे, व्यवसाय, त्यावरील दुष्परिणाम आदींबाबत सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पाठविणार असल्याचे एनजीओचे अध्यक्ष पाटील यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी आपण स्वतः शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असताना आणि मागील अनेक वर्षांपासून वाढवण बंदराला स्थानिकांसह जिल्ह्यात विरोध होत असल्याचे सर्वश्रुत असताना लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी येण्याची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित करून स्थानिकांनी संस्थेचे अध्यक्ष परीक्षित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना गावाबाहेरचा रस्ता दाखवला.

शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय त्यांचे स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी एवढे मोठे पाऊल उचलण्याची हिंमत करू शकत नसल्याने सेनेच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात असून शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करीत नसल्याने स्थानिकांच्या संशयाला बळकटी मिळत आहे.दरम्यान, ठाण्यातील काही मातब्बर शिलेदारांनी वाढवणच्या आसपासच्या भागातील जमिनी अन्य काही लोकांच्या नावावर खरेदी केल्या असल्याचा सुगावा स्थानिकांना लागला असून या जमिनीचे खरे मालक कोण, याचा शोध घेतला जात आहे. यावरून तर्कवितर्क लढले जात आहेत.

बेइमानी कराल तर... ‘स्थानिकांशी बेइमानी कराल तर खबरदार!’ असा सज्जड दम सोशल मीडियावरून दिला जात आहे. 

बंदराला शेवटपर्यंत आमचा विरोध राहणार असून सर्वेक्षण किंवा अन्य बाबीसाठी आता आलात म्हणून आम्ही शांत आहोत. परंतु पुढच्या वेळी शांत राहू असे कोणी गृहीत धरू नये.- विनिता राऊत, प्रभारी सरपंच.