शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदरविरोधी लढ्यात शिवसेना गप्प का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:56 IST

स्थानिकांचा संतप्त सवाल : शिवसेनेचे पदाधिकारी, प्रभारी सरपंचाला नागरिकांनी दाखवला बाहेरचा रस्ता

- हितेन नाईकn  लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : वाढवणवासीयांच्या सोबतीला आता जिल्ह्यातील किनारपट्टीवरील अनेक लोक पुढे येऊ लागले असून वाढवणविरोधातील संघर्षाची धार तेज होऊ लागली आहे. अशा वेळी बुधवारी रात्री स्थानिकांची मते जाणून घेण्यासाठी आलेले शिवसेनेचे पदाधिकारी तथा एनजीओच्या अध्यक्षांना लोकांनी संतप्त होत गावाबाहेरचा रस्ता दाखवला.

वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असेल, तर बंदरविरोधातील लढ्यात शिवसेना त्यांच्या सोबतीला असेल, असे जाहीर वक्तव्य आणि विश्वास शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हावासीयांना दिला होता. असे असताना त्यांच्याच पक्षाचे पालघरमधील युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव परीक्षित पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी निर्माण केलेल्या ‘अभिनव जनसेवा असोसिएशन’ या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाशी संबंधित संस्थेचे पदाधिकारी वाढवण गावात आले. या वेळी आम्ही आमच्या संस्थेकडून सर्वेक्षण करून इथल्या ग्रामस्थांचे वाढवण बंदराबाबत असलेले मत, सोयी-सुविधा, सामाजिक परिस्थिती, कोणत्या समाजाचे वास्तव्य आहे, व्यवसाय, त्यावरील दुष्परिणाम आदींबाबत सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पाठविणार असल्याचे एनजीओचे अध्यक्ष पाटील यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी आपण स्वतः शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असताना आणि मागील अनेक वर्षांपासून वाढवण बंदराला स्थानिकांसह जिल्ह्यात विरोध होत असल्याचे सर्वश्रुत असताना लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी येण्याची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित करून स्थानिकांनी संस्थेचे अध्यक्ष परीक्षित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना गावाबाहेरचा रस्ता दाखवला.

शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय त्यांचे स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी एवढे मोठे पाऊल उचलण्याची हिंमत करू शकत नसल्याने सेनेच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात असून शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करीत नसल्याने स्थानिकांच्या संशयाला बळकटी मिळत आहे.दरम्यान, ठाण्यातील काही मातब्बर शिलेदारांनी वाढवणच्या आसपासच्या भागातील जमिनी अन्य काही लोकांच्या नावावर खरेदी केल्या असल्याचा सुगावा स्थानिकांना लागला असून या जमिनीचे खरे मालक कोण, याचा शोध घेतला जात आहे. यावरून तर्कवितर्क लढले जात आहेत.

बेइमानी कराल तर... ‘स्थानिकांशी बेइमानी कराल तर खबरदार!’ असा सज्जड दम सोशल मीडियावरून दिला जात आहे. 

बंदराला शेवटपर्यंत आमचा विरोध राहणार असून सर्वेक्षण किंवा अन्य बाबीसाठी आता आलात म्हणून आम्ही शांत आहोत. परंतु पुढच्या वेळी शांत राहू असे कोणी गृहीत धरू नये.- विनिता राऊत, प्रभारी सरपंच.