शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण? यंत्रणा निवडणूक कार्यात, माफिया मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 06:19 IST

वसई विरार महानगरपालिकेच्या कृपादृष्टिमुळे आणि निष्क्रिय कारभारामुळे महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात अनधिकृत बांधकामे कोणालाही न घाबरता, राजकीय आशीर्वाद यामुळे बिनधास्त सुरु आहेत.

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेच्या कृपादृष्टिमुळे आणि निष्क्रिय कारभारामुळे महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात अनधिकृत बांधकामे कोणालाही न घाबरता, राजकीय आशीर्वाद यामुळे बिनधास्त सुरु आहेत. इतकेच नाही तर सरकारी जागेवर, आदिवासींच्या जागेवर, वनविभागाच्या जागेवर कब्जा करून भूमाफिया बिनधास्त इमारतीची कामें करत आहे. या सर्व अनधिकृत बांधकामावर अंकुश लावण्यात वसई विरार महानगरपालिका अपयशी ठरले आहेत. तसेच प्रभागाप्रमाणे असलेले सह आयुक्त ही या बांधकामांवर अंकुश लावण्यात अपयशी ठरले आहेत. मुंबई हायकोर्टाने वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील विरार परिसरातील २० अनधिकृत इमारतीबाबत निर्णय राखून ठेवला आहे जर या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले तर ८८० परिवार रस्त्यावर येतील. असे असताना सुद्धा संपूर्ण वसई तालुक्यात अनिधकृत बांधकामे जोरदार सुरु आहेत.

नालासोपारा, विरार आणि वसई पूर्वेकडील विभागात आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गावांमध्येही अनेक अनधिकृत इमारतींची बांधकाम जोरदार सुरु असून या प्रभागात मोजता येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारतीचे पेव फुटले आहे. तर दुसरीकडे संतोष भुवन, बिलालपाडा, धानिवबाग, फुलपाडा, श्रीराम नगर अशा अनेक ठिकाणी भूमाफिया अनधिकृत इमारती बिनधास्त उभारत आहेत. याकामाबाबत स्थानिक लोक, सामाजिक संघटना आपल्या तक्रारी प्रभागातील वसई विरार मनपाच्या कार्यालयात करतात. त्या तक्र ारदाराना आश्वासन देऊन त्या कारवाईसाठी अतिक्रमण विभागात पाठवून देतात. या विभागातील अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबध आणि भूमाफियांशी असलेले साटेलोटे यामुळे ते कारवाई करीत नाहीत. जर जास्तच दबाव आला तर थातुरमातूर कारवाई करतात. पण या अनधिकृत बांधकामावर वेळीच कारवाई केली नाही तर यांना थोपावणे वसई विरार महानगरपालिकेला फार त्रासदायक ठरेल. या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असते. यामुळे यात राहणाऱ्या लोकांना आपल्या जीवावर उदार होवून राहावे लागते. जर कोणतीही जीवितहानी अथवा कोणताही अनुचित प्रकार घडला तर याला कोण जबाबदार असणार हा प्रश्न लोकांना पडला आहे.

या अनधिकृत इमारतींवर काही वेळा अनधिकृत विभाग कारवाई करण्यासाठी जातात पण तोडक कारवाई न करता परत येतात. पोलिस बंदोबस्त नाही मिळाला, दबाव आला अशी अनेक कारणे दिली जातात. जेव्हा रक्षकच भक्षक बनतो तेव्हा रक्षण तरी कोण करणार? हा प्रश्न लोकांना पडला आहे. स्थानिक आणि काही सामाजिक संघटना जे आरोप करतात तर ते खरे आहेत का? आणि जर खरे नसेल तर मनपा आणि अनधिकृत विभाग या इमारतींवर कारवाई करणार का?

पालघर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरार मनपाच्या हद्दीत आचारसंहिता जारी झाल्याने अनधिकृत बांधकामांना वेग आला असून निवडणुकीच्या कामात मनपा अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्यामुळे अनधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा धीम्यागतीने सुरू असून नाममात्र कारवाई केली जात आहे. काही बांधकामांना राजकीय पाठींबा असल्याने त्यांची राखण होते.

टॅग्स :palgharपालघरElectionनिवडणूक