शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण? यंत्रणा निवडणूक कार्यात, माफिया मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 06:19 IST

वसई विरार महानगरपालिकेच्या कृपादृष्टिमुळे आणि निष्क्रिय कारभारामुळे महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात अनधिकृत बांधकामे कोणालाही न घाबरता, राजकीय आशीर्वाद यामुळे बिनधास्त सुरु आहेत.

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेच्या कृपादृष्टिमुळे आणि निष्क्रिय कारभारामुळे महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात अनधिकृत बांधकामे कोणालाही न घाबरता, राजकीय आशीर्वाद यामुळे बिनधास्त सुरु आहेत. इतकेच नाही तर सरकारी जागेवर, आदिवासींच्या जागेवर, वनविभागाच्या जागेवर कब्जा करून भूमाफिया बिनधास्त इमारतीची कामें करत आहे. या सर्व अनधिकृत बांधकामावर अंकुश लावण्यात वसई विरार महानगरपालिका अपयशी ठरले आहेत. तसेच प्रभागाप्रमाणे असलेले सह आयुक्त ही या बांधकामांवर अंकुश लावण्यात अपयशी ठरले आहेत. मुंबई हायकोर्टाने वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील विरार परिसरातील २० अनधिकृत इमारतीबाबत निर्णय राखून ठेवला आहे जर या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले तर ८८० परिवार रस्त्यावर येतील. असे असताना सुद्धा संपूर्ण वसई तालुक्यात अनिधकृत बांधकामे जोरदार सुरु आहेत.

नालासोपारा, विरार आणि वसई पूर्वेकडील विभागात आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गावांमध्येही अनेक अनधिकृत इमारतींची बांधकाम जोरदार सुरु असून या प्रभागात मोजता येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारतीचे पेव फुटले आहे. तर दुसरीकडे संतोष भुवन, बिलालपाडा, धानिवबाग, फुलपाडा, श्रीराम नगर अशा अनेक ठिकाणी भूमाफिया अनधिकृत इमारती बिनधास्त उभारत आहेत. याकामाबाबत स्थानिक लोक, सामाजिक संघटना आपल्या तक्रारी प्रभागातील वसई विरार मनपाच्या कार्यालयात करतात. त्या तक्र ारदाराना आश्वासन देऊन त्या कारवाईसाठी अतिक्रमण विभागात पाठवून देतात. या विभागातील अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबध आणि भूमाफियांशी असलेले साटेलोटे यामुळे ते कारवाई करीत नाहीत. जर जास्तच दबाव आला तर थातुरमातूर कारवाई करतात. पण या अनधिकृत बांधकामावर वेळीच कारवाई केली नाही तर यांना थोपावणे वसई विरार महानगरपालिकेला फार त्रासदायक ठरेल. या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असते. यामुळे यात राहणाऱ्या लोकांना आपल्या जीवावर उदार होवून राहावे लागते. जर कोणतीही जीवितहानी अथवा कोणताही अनुचित प्रकार घडला तर याला कोण जबाबदार असणार हा प्रश्न लोकांना पडला आहे.

या अनधिकृत इमारतींवर काही वेळा अनधिकृत विभाग कारवाई करण्यासाठी जातात पण तोडक कारवाई न करता परत येतात. पोलिस बंदोबस्त नाही मिळाला, दबाव आला अशी अनेक कारणे दिली जातात. जेव्हा रक्षकच भक्षक बनतो तेव्हा रक्षण तरी कोण करणार? हा प्रश्न लोकांना पडला आहे. स्थानिक आणि काही सामाजिक संघटना जे आरोप करतात तर ते खरे आहेत का? आणि जर खरे नसेल तर मनपा आणि अनधिकृत विभाग या इमारतींवर कारवाई करणार का?

पालघर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरार मनपाच्या हद्दीत आचारसंहिता जारी झाल्याने अनधिकृत बांधकामांना वेग आला असून निवडणुकीच्या कामात मनपा अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्यामुळे अनधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा धीम्यागतीने सुरू असून नाममात्र कारवाई केली जात आहे. काही बांधकामांना राजकीय पाठींबा असल्याने त्यांची राखण होते.

टॅग्स :palgharपालघरElectionनिवडणूक