शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

सफेद जांबूला फळगळतीचा धोका; बागायतदार व विक्रेते हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:45 IST

बदलत्या हवामानामुळे सफेद जांबूला फळ्गळतीचा धोका आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या चाहुलीने बागायतदार आणि विक्रेतेही हवालिदल झाले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओखी वादळाच्या तडाख्याने तर मागच्या आठवड्यापासून वाढलेली उष्णता आणि रविवारच्या मध्यरात्री झालेल्या पावसाने उत्पादनात घट होणार आहे.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी : बदलत्या हवामानामुळे सफेद जांबूला फळ्गळतीचा धोका आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या चाहुलीने बागायतदार आणि विक्रेतेही हवालिदल झाले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओखी वादळाच्या तडाख्याने तर मागच्या आठवड्यापासून वाढलेली उष्णता आणि रविवारच्या मध्यरात्री झालेल्या पावसाने उत्पादनात घट होणार आहे.विसाव्या शतकाच्या प्रारंभी घोलवड येथील पारसी कुटुंबियांनी सफेद जांबू या परदेशी फळझाडाची प्रायोगीकतत्वावर लागवड त्यांच्या बागायतीत केली. येथील मध्यम प्रतीची, उत्तम निचरा होणारी काळी सुपीक जमीन आणि दमट हवामान या पिकासाठी पोषक आहे. विशेषत: किनाऱ्यालगत या झाडाची वाढ जोमाने होऊन लागवडी पासून चौथ्या वर्षी फलधारणा होते. पूर्वी केवळ सफेद रंगात उपलब्ध असणारे हे फळ आज लाल, फिके व गडद गुलाबी या रंगात उपलब्ध आहेत. कमी उत्पादन खर्चात भरघोस पीक हे या पिकाचे खास वैशिष्ठ आहे.दोन झाडांमध्ये दहा फुटांच्या अंतरातही पीक चांगले येत असल्याने कमी जागेत जास्त झाडे लावून अधिक उत्पादन घेता येते. तालुक्यात या झाडाची लागवड दीडशे हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर झाली आहे. डिसेंबर महिन्यापासून सुरू होणारा बहारतीन वेळा येतो. साधारणत: फेब्रुवारी ते मोसमी पावसाचा प्रारंभ हा फळाचा हंगाम आहे. हंगामाच्या प्रारंभीच संकट ओढवल्याने बागायतदार हवालिदल झाला बनला आहे.उन्हाळ्यात सर्वाधिक मागणीया फळात सुमारे नव्वद टक्के पाण्याचा अंश असल्याने उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी आहे. प्रारंभी काळात स्थानिक आठवडे बाजारात आणि डहाणू, घोलवड या रेल्वे स्थानक परिसरात त्याची विक्र ी केली जात होती. मात्र, स्थानिक भाजीपाला रेल्वेच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरातील वसाहतीत विकणाºया येथील महिलांनी या फळाची विक्र ी सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळून शहरी बाजारात या फळाने भाव खाल्ला आणि मुंबईच्या बाजारात मक्तेदारी निर्माण केली. या फळाच्या विक्र ीतुन नफा मिळत असून तेथे हे फळ जाम या नावाने परिचित आहे.फळझाडाचा प्रचार-प्रसारघोलवड, बोर्डी आणि पंचक्रोशीतील माहेरवाशिनी हे फळझाड सासरी घेऊन गेल्याने त्याचा प्रसार पालघर जिल्ह्यात विविध भागात मोठ्या प्रमाणावर झाला. त्या मध्ये केळवे, माहीम, विरार, वसईचा समावेश आहे. शिवाय कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात भेट देणाºया राज्यातील विविध ठिकाणाहून आलेल्यांनी आपापल्या जिल्ह्यात त्याची लागवड करून पहिली मात्र त्या ठिकाणी ते यशस्वी झालेले नाही. गुटी कलमापासून नवीन रोपांची निर्मिती करता येत. शिवाय अगदी स्वस्तात कलम उप्लब्ध होते. त्यामुळे घरोघरी परसबागेत ते पाहायला मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थेने वृक्षारोपण योजनेतून त्याचे वाटप स्थानिकांना केल्यास रोजगारासह हिरवापट्टा वाढेल.वाढती उष्णता आणि पावसानंतर बदललेल्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फळगळतीचा धोका असतो. शिवाय कीटकांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता प्लेनोफिक्स कीटकनाशकाची फवारणी आवश्यक आहे.उत्तम सहाणे,शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद, कोसबाड

टॅग्स :Vasai Virarवसई विरार