शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोणता झेंडा घेऊ हाती...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:46 IST

मतदारांची लागणार कसोटी : गावित अनुभवी, वनगांना सहानुभूती तर जाधवांकडे शहरी मतदार

पालघर : लोकसभा पोट निवडणुकीतील विजयी उमेदवाराला जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळणार असल्याने कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास आपल्या समस्या सुटू शकतील याबाबतीत मतदारांमध्ये संभ्रम आहे. पालघर पोट निवडणुकीत भाजपकडून राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामू शिंगडा तर बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव या प्रमुख पक्षासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून भाजप-शिवसेना-बविआ या तीन पक्षांमध्ये विजयासाठी चढाओढ सुरु आहे. एवढे होऊनही निवडूण येणाऱ्या उमेदवाराला अवघा एक वर्षाचा कार्यकाळ मिळणार असल्याने आपली किती कामे होतील असा जनतेचा प्रश्न असल्याने ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी काहीशी अवस्था त्यांची आहे.केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, तारापूर औद्ययोगिक मंडळातील सीईटीपी, घनकचरा प्रश्न, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, रेल्वे प्रश्न, विना अनुदानित शाळांचा प्रश्न, किनारपट्टीवरील तुटलेले धूप प्रतिबंधक बंधारे, डिझेलचा परतावा, वसई-उत्तन व पालघर-डहाणू दरम्यान मच्छिमारांचा हद्दीचा वाद, दलालांकडून मच्छिमारांची होणारी लूट,अद्यायावत रु ग्णालयाची कमतरता आदी प्रश्न महत्वाचे असल्याने अनुभवी आणि सत्ता पक्षात असणारा व्यक्ती या प्रश्नांना न्याय देईल की नवखा व्यक्ती असा प्रश्नही चर्चेचा बनला आहे.राजेंद्र गावित सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असून बविआचे उमेदवार बळीराम जाधव याना केंद्रातील कामकाजाचा अनुभव असला तरी बविआ पक्षाला आपल्या मर्यादा असल्याने वरील प्रश्नांवर उपाययोजना आखण्याबाबत वर्षभराचा कालावधी त्यांना अपुरा पडू शकतो. दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना केंद्रातील कामकाजाचा तसूभरही अनुभव नसल्याने त्यांना हे कामकाज शिकून घेण्यातच मोठा कालावधी निघून जाणार असे चित्र आहे. त्यामुळे आपले प्रलंबित असलेले या प्रश्नांवर वर्षाभरात त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारा उमेदवार निवडून द्यावा असा कल मतदारांत वाढत आहे.ही आहे जमेची बाजूगावितांची काम करण्याची क्षमता तसेच त्यांनी जिल्ह्यात केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहेच. त्याचबरोबरीने समाजाशी त्यांची असलेली नाळ खूप मोठी असून त्याचा फायदा मतदारांकडून त्याना होऊ शकतो. तर दिवंगत चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळू शकतो. तसेच बविवाचे उमेदवार अनुभवि असून त्यांना शहरी भागातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018