शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कोणता झेंडा घेऊ हाती...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:46 IST

मतदारांची लागणार कसोटी : गावित अनुभवी, वनगांना सहानुभूती तर जाधवांकडे शहरी मतदार

पालघर : लोकसभा पोट निवडणुकीतील विजयी उमेदवाराला जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळणार असल्याने कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास आपल्या समस्या सुटू शकतील याबाबतीत मतदारांमध्ये संभ्रम आहे. पालघर पोट निवडणुकीत भाजपकडून राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामू शिंगडा तर बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव या प्रमुख पक्षासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून भाजप-शिवसेना-बविआ या तीन पक्षांमध्ये विजयासाठी चढाओढ सुरु आहे. एवढे होऊनही निवडूण येणाऱ्या उमेदवाराला अवघा एक वर्षाचा कार्यकाळ मिळणार असल्याने आपली किती कामे होतील असा जनतेचा प्रश्न असल्याने ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी काहीशी अवस्था त्यांची आहे.केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, तारापूर औद्ययोगिक मंडळातील सीईटीपी, घनकचरा प्रश्न, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, रेल्वे प्रश्न, विना अनुदानित शाळांचा प्रश्न, किनारपट्टीवरील तुटलेले धूप प्रतिबंधक बंधारे, डिझेलचा परतावा, वसई-उत्तन व पालघर-डहाणू दरम्यान मच्छिमारांचा हद्दीचा वाद, दलालांकडून मच्छिमारांची होणारी लूट,अद्यायावत रु ग्णालयाची कमतरता आदी प्रश्न महत्वाचे असल्याने अनुभवी आणि सत्ता पक्षात असणारा व्यक्ती या प्रश्नांना न्याय देईल की नवखा व्यक्ती असा प्रश्नही चर्चेचा बनला आहे.राजेंद्र गावित सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असून बविआचे उमेदवार बळीराम जाधव याना केंद्रातील कामकाजाचा अनुभव असला तरी बविआ पक्षाला आपल्या मर्यादा असल्याने वरील प्रश्नांवर उपाययोजना आखण्याबाबत वर्षभराचा कालावधी त्यांना अपुरा पडू शकतो. दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना केंद्रातील कामकाजाचा तसूभरही अनुभव नसल्याने त्यांना हे कामकाज शिकून घेण्यातच मोठा कालावधी निघून जाणार असे चित्र आहे. त्यामुळे आपले प्रलंबित असलेले या प्रश्नांवर वर्षाभरात त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारा उमेदवार निवडून द्यावा असा कल मतदारांत वाढत आहे.ही आहे जमेची बाजूगावितांची काम करण्याची क्षमता तसेच त्यांनी जिल्ह्यात केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहेच. त्याचबरोबरीने समाजाशी त्यांची असलेली नाळ खूप मोठी असून त्याचा फायदा मतदारांकडून त्याना होऊ शकतो. तर दिवंगत चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळू शकतो. तसेच बविवाचे उमेदवार अनुभवि असून त्यांना शहरी भागातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018