शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

छाप्यानंतर वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आहेत कुठे? १ कोटी २० लाखांची रोकड सापडली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:01 IST

आयुक्त पवार यांचा सोमवारी वसई-विरार पालिका मुख्यालयात समारोप आणि सत्काराचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांच्या घरी ईडीची धाड पडली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: साडेतीन वर्षांच्या कार्यकाळानंतर वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांची ठाणे येथे ‘मुंबई महानगर प्रदेश विकास झोपडपट्टी प्राधिकरणा’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर बदली झाली. ईडीच्या कारवाईनंतर माजी आयुक्त पवार कोणासमोर आलेले नाही. त्यामुळे ते कुठे आहेत, याबद्दल उत्सुकता आहे.  अनिलकुमार पवार यांनी वसई-विरार पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे साडेतीन वर्षे सांभाळली. मात्र, त्यांची प्रशासकीय कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यांच्या काळात विकास खुंटल्याचा आरोप केला जात आहे. त्यांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रकल्प राबवले. पवार यांच्या प्रशासकीय राजवटीत अवैध बांधकामे बोकाळली, असे म्हटले जाते. 

अनियंत्रित फेरीवाले आणि वाढत्या चाळवस्त्यांमुळे फुगलेली लोकसंख्या यामुळे वसई-विरारचे विद्रुपीकरण झाले, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळी अधिवेशनात वसईच्या आ. स्नेहा दुबे पंडित आणि नालासोपाऱ्याचे आ. राजन नाईक यांनी वसईतील दुरवस्था आणि प्रशासकीय अनास्थेकडे लक्ष वेधले होते. अधिवेशनात वसई-विरारच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर आणि आयुक्त पवार यांच्या मंत्रालय वाऱ्या वाढल्याने त्यांच्या बदलीचे संकेत मिळाले होते.

पवारांवरील छाप्यांत एक कोटीचे घबाड?

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामप्रकरणी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी केलेल्या छापेमारीदरम्यान नाशिक येथे १ कोटी २० लाखांची रोकड सापडल्याचे समजते. तसेच काही मालमत्तांची कागदपत्रे देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी ईडीने या प्रकरणी अन्य काही अधिकाऱ्यांवर केलेल्या छापेमारीदरम्यान नऊ कोटींची रोकड, २३ कोटींचे दागिने, चांदी तसेच मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली आहेत. 

आयुक्त पवार यांचा सोमवारी वसई-विरार पालिका मुख्यालयात समारोप आणि सत्काराचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांच्या घरी ईडीची धाड पडली. वसई-विरार परिसरात मलनिस्सारण आणि डम्पिंग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या ६० एकर भूखंडावर ४१ अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या होत्या. 

या प्रकरणी दोन महिन्यांत तिसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली आहे. महापालिकेचे नगर रचना अभियंते, वास्तुविशारद आणि विकासकांवर यापूर्वी छापेमारी करण्यात आली आहे. हा घोटाळा उजेडात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवले होते. त्यानंतर फेब्रुवारीत या ४१ इमारती पाडण्यात आल्या होत्या.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnalasopara-acनालासोपारा