शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नसलेल्या अन्य आजारांच्या रुग्णांनी जायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 00:14 IST

कोरोनाचा व्याप, त्यात सारीचा ताप : ग्रामीण भाग तापाने फणफणला

हुसेन मेमनलोकमत न्यूज नेटवर्कजव्हार :  पालघर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात वसई-विरार महापालिका वगळता \ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घरटी थंडी, ताप, सर्दी आणि अंगदुखीचे रुग्ण आढळत आहेत. हे रुग्ण सारी, तसेच विषाणूजन्य आणि वातावरणातील तापाचे रुग्ण आहेत. ग्रामीण भाग तापाने फणफणला आहे.सारी ताप आणि कोरोनाची लक्षणे सारखीच आहेत. सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांमध्ये जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार तीनशे रुग्ण या तापाचे आढळून आले आहेत. खाजगी दवाखान्यातील वास्तव समोर आल्यास, जिल्ह्यातील भयावह विस्फोटक आकडेवारी समोर येईल. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा व्याप, त्यात सारीचा ताप, अशी स्थिती निर्माण झाली आहे.सध्या कोरोनाचे रुग्ण खेडोपाडी आढळून येत असून, गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी खेड्यापाड्यातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही सारी तापाने जिल्ह्याला विळखा घातला आहे. ग्रामीण भाग तापाने फणफणला आहे. थंडी, ताप, सर्दी आणि अंगदुखी ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. हीच लक्षणे सारी आणि विषाणूजन्य तापाची आहेत. ही लक्षणे असलेले रुग्ण ग्रामीण भागात प्रत्येक घरी आहेत. या रुग्णांनी सरकारी दवाखान्यात येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन यंत्रणांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे.रुग्णांची गैरसोयवाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे ठिकठिकाणी रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नातेवाईकही त्रस्त आहेत.

खाजगी रुग्णालयांतही कोविडचे उपचारखेड्यापाड्यातील रुग्ण सरकारी वैद्यकीय सेवेकडे पाठ फिरवून, कोरोनाच्या दहशतीने खाजगी दवाखान्यात उपचार करून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रुग्णांमधूनच मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असल्याचा सरकारी वैद्यकीय यंत्रणांचा आरोप आहे. खेडोपाडी आरोग्य कर्मचारी तपासणीसाठी जातात, मात्र, त्यांच्याकडे रुग्णांची माहिती लपवली जाते. काही वेळा या कर्मचाऱ्यांशी हुज्जतही घातल्याचे प्रकार घडत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.सारी आणि कोरोनाची लक्षणे सारखीच असल्याने त्याला अटकाव करण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात १०० अँटिजन चाचण्या करण्यात येणार आहेत. जव्हार तालुक्यात तशी सुरुवातही करण्यात आली आहे. खाजगी डॉक्टरांना लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना सरकारी दवाखान्यात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- संजय लोहार, तालुका वैद्यकीय अधिकारी, जव्हार

रोज अनेक रुग्णांना जावे लागते परतसध्या कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक रुग्णांवर वेळीच उपचार होत नसल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक त्रस्त आहेत. अनेक रुग्णांना योग्य उपचाराअभावी परत फिरावे लागत असल्याचेही दिसून येत आहे.