शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जिल्ह्यातील चिकू मजुरांचा प्रश्न कधी सुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 23:37 IST

बागायतदार, मजूर समस्यांनी त्रस्त : पालघर जिल्ह्यात सात ते आठ हजार हेक्टर क्षेत्रावर चिकू बागायती

डहाणू/बोर्डी : चहामळे आणि ऊसतोड मजुरांप्रमाणे चिकू फळांची तोडणी करणाऱ्या मजुरांचा प्रश्नही आता संवेदनशील झाला आहे. या जिल्ह्यातील हे प्रमुख फळ पीक असून यात डहाणू तालुका अग्रेसर आहे. मात्र चिकूवाडीत राबणाºया हजारो आदिवासी मजुरांची झोळी अद्याप रितीच आहे. जोपर्यंत चिकू फळाला हमी भाव, प्रक्रिया उद्योगाला चालना तसेच फळे साठवणुकीची व्यवस्था आदी प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत बागायतदार आणि मजुरांच्या समस्या सुटणार नाहीत. येत्या निवडणुकीतील विजयी उमेदवार तरी आपल्याला न्याय मिळवून देईन का, याच्याच प्रतीक्षेत हे मजूर आहेत.

चिकू फलोत्पादक म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यात सुमारे सात ते आठ हजार हेक्टर क्षेत्र चिकू बागायतीने व्यापले असून त्यापैकी चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्र एकट्या डहाणू तालुक्यात आहे. दिवसेंदिवस या फळझाडाच्या लागवडीचे क्षेत्र विस्तारत आहे. येथे आंतर मशागत, फळांची तोडणी, वर्गवारी, पॅकेजिंग आदी काम केवळ मनुष्यबळावरच अवलंबून आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला देखील पस्तीस - चाळीस फूट उंचीच्या झाडांवर चढून बेडणीच्या सहाय्याने फळ तोडणीची कामे करतात. त्या मानाने मजुरी अल्प आहे. यामध्ये बागायतदारांना दोष देता येणार नाही. कारण, चिकू फळाला आजही हमी भाव जाहीर झालेला नाही.

वर्र्षभरात चिकूचे दर पाहता साधारणत: पहिल्या प्रतीच्या फळाला प्रतिकिलो सरासरी २५ ते ३० रूपये, दुसºया नंबरला १५ ते १७ रूपये आणि तिसºया वर्गातील फळांना ५ ते ६ रूपये मिळतात तर प्रतिकिलोनुसार अनुक्रमे फळ तोडणीचा खर्च ३ रुपये, वाहतूक खर्च १ रूपया आणि पॅकिंग खर्च आदींचा सरासरी खर्च प्रती किलोला ५ ते ६ रुपये येतो. तर बागांची देखभाल दुरुस्ती यांचा विचार केल्यास उत्पादन खर्च वजा जाता उत्पादकांच्या हाती अल्प मिळकत शिल्लक राहते. त्यामुळे प्रमुख व्यवसाय असलेल्या या व्यवसायाशी निगडित बागायतदार किंवा मजूर वर्ग यांना उदरनिर्वाह करणेही कठीण बनले आहे. त्यातच विम्याचे ट्रिगर ठरवताना सलग २० मि.मी. पावसाची अट नव्याने समाविष्ट केल्याने ती अन्यायकारक ठरते आहे. त्यामुळे चिकू फळाला हमी भाव मिळावा, अशी बागायतदारांची मागणी आहे. वर्षभरात पावसाळा आणि उन्हाळ्यातील वातावरणामुळे चिकू फळांना नुकसानीचा सामना करावा लागतो. शिवाय बाजारातील दरांमधील चढ-उताराची व्यवसायाला झळ बसते.

निवडणुकीनंतर फरक पडणार?फळ नाशवंत असल्याने जिल्ह्यात या फळांच्या स्टोरेज सिस्टिमची आवश्यकता असताना ते अस्तित्वात नाही. प्रक्रि या उद्योगालाही शासनाचे पाठबळ नाही. त्यामुळेच जिल्ह्यात आतापर्यंत एकमेव वायनरीची निर्मिती होऊ शकलेली आहे.