शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

तिवरे धरणासारखे खडखड धरणही फुटणार काय?, गळतीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 23:24 IST

जव्हार तालुक्यातील खडखड या गावात डोमिहीरा नावाने नदीवर आदिवासी उपाय योजने अंतर्गत सन २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने आदिवासी समाजाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी डोमिहीरा धरण बांधले.

- हुसेन मेमनजव्हार : गळतीमुळे चर्चेत असलेले पूर्वी ठाणे जिल्ह्यात असलेले आणि आता पालघर जिल्ह्याचा भाग असलेला जव्हार तालुक्यातील खडखड धरण हे बांधल्यापासून गळत असल्यामुळे सतत चर्चेत आहे. नुकतेच रत्नागिरी येथील तिवरे धरण निकृष्टकामामुळे फुटलेव त्यात कित्येक निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तसेच खडखड येथील डोमीहीरा हे धरणही फुटते की काय? असा प्रश्न निर्माण झाला असून परिसरातील नागरीक भयभीत झालेले आहेत.संपूर्ण महाराष्ट्रात विक्रमी असा पाऊस पडतो, मात्र आज ही जव्हार तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना पिण्याचे पाणी दूरवरून नेण्याची कसरत करावी लागते. येथे नेहमी पाणी टंचाई भासत असते. यामुळे शासन दरवर्षी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून विहीर, बंधारे, नळ-पाणी योजना तयार करून देत आहे.जव्हार तालुक्यातील खडखड या गावात डोमिहीरा नावाने नदीवर आदिवासी उपाय योजने अंतर्गत सन २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने आदिवासी समाजाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी डोमिहीरा धरण बांधले. धरण २०१२ मध्ये ९५ टक्केपूर्ण झाले. मात्र धरणाची भिंत ठिकाणी लीक असल्याचे त्यात पाणी भरताच समजले, यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले. याला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगमताने झालेले निकृष्ट काम जबाबदार असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला होता. या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.आम्ही इतकी वर्षे जीव मुठीत धरूनच जगतो आहोत- याबाबत कित्येकवेळा तक्र ारी झाल्यावर ठेकेदाराला पुन्हा दुरूस्ती करावी लागली. मात्र गळती अद्याप थांबलेली नाही, निकृष्ट मालाचा वापर करून बांधलेल्या बंधारा कसा टिकेल? त्यामुळे कितीही वेळा गळती काढली तरी गळती थांबणार का? स्थानिक रहिवासी आपले जीव मुठीत घेऊनच इतके वर्ष वास्तव करीत आहेत.- डॅम बांधल्यापासून आम्ही भयभीतच आहोत, निकृष्ट बांधण्यात आलेल्या डॅमला पहिल्या वर्षापासून लागलेली गळती आहे, त्यामुळे आम्ही नेहमी डॅम फुटून एखादी दुर्देवी घटना घडेल की काय या दहशतीखाली जगतो आहोत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार