शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

या ग्रामसेवकांचे करायचे काय?

By admin | Updated: May 19, 2017 04:06 IST

या तालुक्यात ४८ ग्रामपंचायती असून २ ग्रामदान मंडळे आहेत. पालघर जिल्ह्यातील पेसा अंतर्गत सर्वात जास्त निधी या तालुक्यात येतो मात्र तरीही विविध योजनांपासून

- हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : या तालुक्यात ४८ ग्रामपंचायती असून २ ग्रामदान मंडळे आहेत. पालघर जिल्ह्यातील पेसा अंतर्गत सर्वात जास्त निधी या तालुक्यात येतो मात्र तरीही विविध योजनांपासून येथील ग्रामस्थ वंचित आहेत, विकासाचा दुवा समजला जाणारे या तालुक्यातील ग्रामसेवक हे मुजोर आणि हलगर्जी झाल्याने जनतेवरही पाळी ओढावली आहे. ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या पाणी, आरोग्य, रस्ते, घरकुल योजनांची जबाबदारी ज्या ग्रामसेवकांवर आह तेच सध्या अत्यंत मुजोर झाले आहेत. जव्हार तालुक्यातील ग्रामसेवकांच्या विरूद्ध रोजच काही न काही तक्रारी प्राप्त होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने गैरहजेरीच्या तक्रारी जास्त आहेत, तसेच ग्रामसेवकाने सरपंचाला हाताशी धरून निघालेली कामे स्वत: घ्यायची व ती थातूरमातूर पद्धतींनी पूर्ण करून शासनाचा पैसे गिळंकृत करायचा, रोजगार सेवकांच्या मानधनाची रक्कम त्याच्या खात्यात जमा न करता परस्पर काढून तिचा अपहार करायचा असा भ्रष्टाचार सुरू आहे त्याबाबतच्या तक्रारी आदिवासी बांधव नेहमीच गटविकास अधिकाऱ्यांकडे करतात, परंतु त्यांची टक्केवारी त्यात असल्याने त्यांना तेथे दाद मिळत नाही, याला कारणीभूत म्हणजे ग्रामसेवकांची मनमानी व वरिष्ठांचे वरदहस्त आणि अर्थकारण, त्यामुळे कोणी कितीही बोंबा बोंब करा आमचे कोणी वाकडे करू शकत नाही .या मस्तीत येथील ग्रामसेवक आहेत. जव्हारला लागून दोन ग्रामपंचायती आहेत तेथे मोठ्याप्रमाणात बांधकाम परवानग्या घेतल्या जातात त्यामध्ये ही मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार असून मोठया इमारतीसाठी वेगळा रेट, छोटया इमारतीसाठी वेगळा रेट आहे परवानगी घ्या. रीतसर पावती दिली जाते. मात्र ती ही डुप्लिकेट असल्याच्या तक्र ारी ही झालेल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीत नियुक्त होण्यासाठी वरीष्ठ कार्यालयात बोलीही लागते, त्यामुळे येथील ग्रामसेवकांच्या मुजोरी मुळे कामे निकृष्ट होत असून विकास पूर्णपणे खुंटलेला दिसत आहेत. काही ग्रामसेवक कार्यालयात हजरही राहत नाहीत त्यामुळे आदिवासी बांधवांची कामे राखडून त्यांना नाहक आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो, तसेच ग्रामस्थांच्या समस्यांची सोडवणूक होत नसल्याने राजकीय पक्ष व संघटनांना आंदोलनेही करावी लागतात. ग्रामसेवकांवर नियंत्रण अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी व तहसीलदार मुख्य भूमिका बजावतात मात्र अर्थकारणामुळे आजतागायत अशा एकही ग्रामसेवकांवर कारवाई न झाल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.नांदगाव येथे निकृष्ट नळपाणी व योजनेत झालेल्या भ्रष्टचारात तेथील ग्रामसेवक पाटील हेच जबाबदार असल्याचे ग्रामस्थांनी मोरच्यांच्यावेळी सांगितले मात्र आजतागायत या ग्रामसेवकांवर का कारवाई करण्यात आलेली नाही.ुग्रामसेवकच झालेत ठेकेदार, त्यातून झाले मालामाल- ग्रामसेवाकांची मुजोरी आणि मनमानी इतकी वाढली आहे की अनेकांनी ठेकेदारी स्वत: किंवा बगलबच्यांच्या नावे सुरू केली आहे. एकच काम अनेकदा केल्याचे दाखवून किंवा कागदोपत्री करून त्याची रक्कम हडप केली जाते आहे. - नियुक्तीच्या ठिकाणी न जाता अन्यत्र राहणे, हा तर नित्याचा परिपाठ आहे. काहींनी आपल्या कामाचे रेटकार्ड ठरवले आहे. त्यानुसार मलिदा चारणाऱ्यांची कामे बिनबोभाट होत आहेत. हाल गरिबांचे आहेत.