शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

वसईत वीकेंड लाॅकडाऊनची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 23:31 IST

नागरिकांची ओसरली गर्दी : निर्बंधांबरोबरच उन्हाच्या प्रभावाने रस्ते सामसूम

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : मागील आठवड्यात घेतलेल्या 'वीकेंड' लॉकडाऊनसारखेच चित्र शनिवारीही वसई-विरारमधील रस्त्यांवर होते; मात्र या शांततेसाठी निर्बंधांपेक्षा उन्हाचा 'प्रभाव' कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच वसई-विरार शहरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मात्र, मागील आठवड्यापासून उन्हाची काहिली थोडी जास्तच वाढली आहे. परिणामी वसई-विरारवासीय सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेर पडणे टाळत आहेत.

एकीकडे सरकारने १४ एप्रिलपासून कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन संचारबंदीसारखे कडक निर्बंध लादले आहेत, तर मागील आठवड्यात 'वीकेंड लॉकडाऊन' घेतला होता. सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून वसई-विरारकरांनी 'वीकेंड लॉकडाऊन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यानंतर सोमवारी मात्र वसई-विरार शहरात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रातच कोरोना रुग्ण वाढल्याने १४ एप्रिलपासून पुन्हा १५ दिवसांची संचारबंदी करण्यात आली आहे; मात्र सरकारचा हा निर्णय जनतेच्या पचनी पडलेला नसल्याने या आदेशानंतरही वसई-विरारमध्ये नियमांची पायमल्ली होताना दिसली. या दिवसांच्या तुलनेत शनिवारी मात्र मागील 'वीकेंड'सारखेच चित्र होते. मात्र, या शांततेसाठी 'निर्बंधां'पेक्षा उन्हाचा 'प्रभाव' कारणीभूत मानला जात आहे. 

वसई-विरार पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्वेला मोठ्या प्रमाणात दाटीवाटीचा परिसर आहे. संपूर्ण दिवसभरातील गर्मी, सततचा खंडित वीजपुरवठा आणि वाढत्या गर्मीसोबतच वाढणारी पाणीटंचाई, त्यात लागलेली संचारबंदी यामुळे आलेला उबग झटकण्यासाठी वसई-विरार-नालासोपारा परिसरातील नागरिक संध्याकाळी मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर पडताना दिसतात. विशेष म्हणजे मागील वर्षीदेखील मार्च-एप्रिल व मे महिन्यात शहरात असेच चित्र आणि परिस्थिती होती.

लोकांचे समुपदेशन होणे गरजेचे nबऱ्याच वेळा कोवीड-१९ चा रुग्ण स्वॅब दिल्यानंतर रिपोर्ट यायचा आहे म्हणून गावभर फिरत असतो. त्याच्यापासून अनेकांना लागण होत असते. ज्यांना कोविडची लक्षणे आहेत, अशा लोकांनी विलगीकरणात राहणे गरजेचे आहे. तर, एकाच कुटुंबात सर्व सदस्य बाधित निघाल्यावर त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी एकतरी सदस्य बाहेर पडतो. अशा वेळी गृह विलगीकरणात असलेली व्यक्ती बाहेर फिरू नये यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे हाच सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. nही साखळी तोडण्याची जबाबदारी असलेली आरोग्य यंत्रणा कार्यालयातून बाहेर पडताना दिसत नाही. कोरोना रुग्णांच्या घरापर्यंत फक्त आशा वर्कर जाऊन माहिती भरत आहे. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग तर होतानाच दिसत नाही. प्रत्येक कोरोना रुग्णांची हिस्ट्री तयार होऊन कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांच्या मनात कोरोनाबाबत प्रचंड भीती असून लोकांनी कोरोना चाचणीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. यासाठी लोकांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस