शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

वसईत वीकेंड लाॅकडाऊनची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 23:31 IST

नागरिकांची ओसरली गर्दी : निर्बंधांबरोबरच उन्हाच्या प्रभावाने रस्ते सामसूम

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : मागील आठवड्यात घेतलेल्या 'वीकेंड' लॉकडाऊनसारखेच चित्र शनिवारीही वसई-विरारमधील रस्त्यांवर होते; मात्र या शांततेसाठी निर्बंधांपेक्षा उन्हाचा 'प्रभाव' कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच वसई-विरार शहरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मात्र, मागील आठवड्यापासून उन्हाची काहिली थोडी जास्तच वाढली आहे. परिणामी वसई-विरारवासीय सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेर पडणे टाळत आहेत.

एकीकडे सरकारने १४ एप्रिलपासून कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन संचारबंदीसारखे कडक निर्बंध लादले आहेत, तर मागील आठवड्यात 'वीकेंड लॉकडाऊन' घेतला होता. सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून वसई-विरारकरांनी 'वीकेंड लॉकडाऊन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यानंतर सोमवारी मात्र वसई-विरार शहरात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रातच कोरोना रुग्ण वाढल्याने १४ एप्रिलपासून पुन्हा १५ दिवसांची संचारबंदी करण्यात आली आहे; मात्र सरकारचा हा निर्णय जनतेच्या पचनी पडलेला नसल्याने या आदेशानंतरही वसई-विरारमध्ये नियमांची पायमल्ली होताना दिसली. या दिवसांच्या तुलनेत शनिवारी मात्र मागील 'वीकेंड'सारखेच चित्र होते. मात्र, या शांततेसाठी 'निर्बंधां'पेक्षा उन्हाचा 'प्रभाव' कारणीभूत मानला जात आहे. 

वसई-विरार पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्वेला मोठ्या प्रमाणात दाटीवाटीचा परिसर आहे. संपूर्ण दिवसभरातील गर्मी, सततचा खंडित वीजपुरवठा आणि वाढत्या गर्मीसोबतच वाढणारी पाणीटंचाई, त्यात लागलेली संचारबंदी यामुळे आलेला उबग झटकण्यासाठी वसई-विरार-नालासोपारा परिसरातील नागरिक संध्याकाळी मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर पडताना दिसतात. विशेष म्हणजे मागील वर्षीदेखील मार्च-एप्रिल व मे महिन्यात शहरात असेच चित्र आणि परिस्थिती होती.

लोकांचे समुपदेशन होणे गरजेचे nबऱ्याच वेळा कोवीड-१९ चा रुग्ण स्वॅब दिल्यानंतर रिपोर्ट यायचा आहे म्हणून गावभर फिरत असतो. त्याच्यापासून अनेकांना लागण होत असते. ज्यांना कोविडची लक्षणे आहेत, अशा लोकांनी विलगीकरणात राहणे गरजेचे आहे. तर, एकाच कुटुंबात सर्व सदस्य बाधित निघाल्यावर त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी एकतरी सदस्य बाहेर पडतो. अशा वेळी गृह विलगीकरणात असलेली व्यक्ती बाहेर फिरू नये यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे हाच सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. nही साखळी तोडण्याची जबाबदारी असलेली आरोग्य यंत्रणा कार्यालयातून बाहेर पडताना दिसत नाही. कोरोना रुग्णांच्या घरापर्यंत फक्त आशा वर्कर जाऊन माहिती भरत आहे. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग तर होतानाच दिसत नाही. प्रत्येक कोरोना रुग्णांची हिस्ट्री तयार होऊन कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांच्या मनात कोरोनाबाबत प्रचंड भीती असून लोकांनी कोरोना चाचणीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. यासाठी लोकांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस