शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

डहाणूतील सायवन भागात पाणीबाणी; विहिरी, नद्या आटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:36 IST

डहाणू तालुक्यातील सायवन भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा म्हणून हवालदिल झालेल्या जनतेने स्थानिक प्रशासनाला निवेदने देऊनही दुर्लक्ष होत आहे.

कासा : डहाणू तालुक्यातील सायवन भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा म्हणून हवालदिल झालेल्या जनतेने स्थानिक प्रशासनाला निवेदने देऊनही दुर्लक्ष होत आहे. पोकळ आश्वासनांची खैरात मांडणारे लोकप्रतिनिधी पाणीसमस्ये कडे लक्ष देत नाहीत. पाणीपुरवठा प्रश्न न सोडविणारे प्रशासन केवळ निवेदने फक्त स्विकारते का ? असा संतापजनक प्रश्न उपस्थित केला जात आहे.सायवन, दाभाडी किन्हवली, सुकटआंबा, दिवशी, शिसने, ओसरविरा, धानिवरी या आदिवासी भागातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक गावपाड्यांत यावर्षी जलसंकट उभे ठाकले आहे. सायवन ग्रामपंचायतिच्या आजूबाजूच्या सुमारे २० गावापड्यात हे संकट अधिकच तीव्र झाले आहे. त्याचा फटका सुमारे साडेपाच हजार लोकवस्तीला बसणार आहे. दाभाडीमधील भावरपडा, फणसोन पाडा, बोरीपाडा, धुळशेत पाडा येथे पाणीटंचाई आहे त्यापैकी भावरपाडा गावातील सुमारे ४५० लोकवस्ती असलेल्या पाड्यातील लोकांना नदीपात्रात खड्डे खोदून पाणी भरावे लागत आहे . सुकट आंबा गावातील बरडीपाडा, पाटीलपाडा, जुणूनपाडा, शिरशेनपाडा तर दिवशीगावातील चामलपाडा, गडदपाडा, चिंचपडा येथील पाड्यामधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पाणी पातळी दीड महिने अगोदरच खालावल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून नदी पात्रात लहानसा पोहरा खोदून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. दूरवरून पाणी आणताना माता भगिनींना दररोज बहुतेक वेळ पाण्यासाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे कित्येक महिलांना रोजगार बुडवून पाण्यासाठी भटकंती करण्याची कसरत करावी लागते.सायवन परिसरातील पाणीप्रश्नावर डहाणू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. भावरपाडा येथे पाण्याचा प्रश्न गंभीर असून टँकरने पाणीपुरवठा करावा. आमच्या गावापासून हाकेच्या अंतरावर धरणे असूनही आम्हाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, हे दुर्दैव आहे. शासनाने त्वरित टँकरने पाणीपुरवठा सुरु करु न लोकांची तहान भागवावी.- महेंद्र खांडवी, ग्रामपंचायत सदस्यआम्हाला मागील दीड महिन्यापासून पाणी मिळत नाही. नदी लवकर आटल्याने पोहरा खोदूनही जेमतेम पिण्याइतके पाणी मिळते. आमच्या गावासाठी सरकारने पाण्याची सोय करावी.- जया मेढा, महिला ग्रामस्थ, सायवन

टॅग्स :Waterपाणी