शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

डहाणूतील सायवन भागात पाणीबाणी; विहिरी, नद्या आटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:36 IST

डहाणू तालुक्यातील सायवन भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा म्हणून हवालदिल झालेल्या जनतेने स्थानिक प्रशासनाला निवेदने देऊनही दुर्लक्ष होत आहे.

कासा : डहाणू तालुक्यातील सायवन भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा म्हणून हवालदिल झालेल्या जनतेने स्थानिक प्रशासनाला निवेदने देऊनही दुर्लक्ष होत आहे. पोकळ आश्वासनांची खैरात मांडणारे लोकप्रतिनिधी पाणीसमस्ये कडे लक्ष देत नाहीत. पाणीपुरवठा प्रश्न न सोडविणारे प्रशासन केवळ निवेदने फक्त स्विकारते का ? असा संतापजनक प्रश्न उपस्थित केला जात आहे.सायवन, दाभाडी किन्हवली, सुकटआंबा, दिवशी, शिसने, ओसरविरा, धानिवरी या आदिवासी भागातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक गावपाड्यांत यावर्षी जलसंकट उभे ठाकले आहे. सायवन ग्रामपंचायतिच्या आजूबाजूच्या सुमारे २० गावापड्यात हे संकट अधिकच तीव्र झाले आहे. त्याचा फटका सुमारे साडेपाच हजार लोकवस्तीला बसणार आहे. दाभाडीमधील भावरपडा, फणसोन पाडा, बोरीपाडा, धुळशेत पाडा येथे पाणीटंचाई आहे त्यापैकी भावरपाडा गावातील सुमारे ४५० लोकवस्ती असलेल्या पाड्यातील लोकांना नदीपात्रात खड्डे खोदून पाणी भरावे लागत आहे . सुकट आंबा गावातील बरडीपाडा, पाटीलपाडा, जुणूनपाडा, शिरशेनपाडा तर दिवशीगावातील चामलपाडा, गडदपाडा, चिंचपडा येथील पाड्यामधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पाणी पातळी दीड महिने अगोदरच खालावल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून नदी पात्रात लहानसा पोहरा खोदून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. दूरवरून पाणी आणताना माता भगिनींना दररोज बहुतेक वेळ पाण्यासाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे कित्येक महिलांना रोजगार बुडवून पाण्यासाठी भटकंती करण्याची कसरत करावी लागते.सायवन परिसरातील पाणीप्रश्नावर डहाणू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. भावरपाडा येथे पाण्याचा प्रश्न गंभीर असून टँकरने पाणीपुरवठा करावा. आमच्या गावापासून हाकेच्या अंतरावर धरणे असूनही आम्हाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, हे दुर्दैव आहे. शासनाने त्वरित टँकरने पाणीपुरवठा सुरु करु न लोकांची तहान भागवावी.- महेंद्र खांडवी, ग्रामपंचायत सदस्यआम्हाला मागील दीड महिन्यापासून पाणी मिळत नाही. नदी लवकर आटल्याने पोहरा खोदूनही जेमतेम पिण्याइतके पाणी मिळते. आमच्या गावासाठी सरकारने पाण्याची सोय करावी.- जया मेढा, महिला ग्रामस्थ, सायवन

टॅग्स :Waterपाणी