शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

डहाणूतील सायवन भागात पाणीबाणी; विहिरी, नद्या आटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:36 IST

डहाणू तालुक्यातील सायवन भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा म्हणून हवालदिल झालेल्या जनतेने स्थानिक प्रशासनाला निवेदने देऊनही दुर्लक्ष होत आहे.

कासा : डहाणू तालुक्यातील सायवन भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा म्हणून हवालदिल झालेल्या जनतेने स्थानिक प्रशासनाला निवेदने देऊनही दुर्लक्ष होत आहे. पोकळ आश्वासनांची खैरात मांडणारे लोकप्रतिनिधी पाणीसमस्ये कडे लक्ष देत नाहीत. पाणीपुरवठा प्रश्न न सोडविणारे प्रशासन केवळ निवेदने फक्त स्विकारते का ? असा संतापजनक प्रश्न उपस्थित केला जात आहे.सायवन, दाभाडी किन्हवली, सुकटआंबा, दिवशी, शिसने, ओसरविरा, धानिवरी या आदिवासी भागातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक गावपाड्यांत यावर्षी जलसंकट उभे ठाकले आहे. सायवन ग्रामपंचायतिच्या आजूबाजूच्या सुमारे २० गावापड्यात हे संकट अधिकच तीव्र झाले आहे. त्याचा फटका सुमारे साडेपाच हजार लोकवस्तीला बसणार आहे. दाभाडीमधील भावरपडा, फणसोन पाडा, बोरीपाडा, धुळशेत पाडा येथे पाणीटंचाई आहे त्यापैकी भावरपाडा गावातील सुमारे ४५० लोकवस्ती असलेल्या पाड्यातील लोकांना नदीपात्रात खड्डे खोदून पाणी भरावे लागत आहे . सुकट आंबा गावातील बरडीपाडा, पाटीलपाडा, जुणूनपाडा, शिरशेनपाडा तर दिवशीगावातील चामलपाडा, गडदपाडा, चिंचपडा येथील पाड्यामधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पाणी पातळी दीड महिने अगोदरच खालावल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून नदी पात्रात लहानसा पोहरा खोदून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. दूरवरून पाणी आणताना माता भगिनींना दररोज बहुतेक वेळ पाण्यासाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे कित्येक महिलांना रोजगार बुडवून पाण्यासाठी भटकंती करण्याची कसरत करावी लागते.सायवन परिसरातील पाणीप्रश्नावर डहाणू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. भावरपाडा येथे पाण्याचा प्रश्न गंभीर असून टँकरने पाणीपुरवठा करावा. आमच्या गावापासून हाकेच्या अंतरावर धरणे असूनही आम्हाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, हे दुर्दैव आहे. शासनाने त्वरित टँकरने पाणीपुरवठा सुरु करु न लोकांची तहान भागवावी.- महेंद्र खांडवी, ग्रामपंचायत सदस्यआम्हाला मागील दीड महिन्यापासून पाणी मिळत नाही. नदी लवकर आटल्याने पोहरा खोदूनही जेमतेम पिण्याइतके पाणी मिळते. आमच्या गावासाठी सरकारने पाण्याची सोय करावी.- जया मेढा, महिला ग्रामस्थ, सायवन

टॅग्स :Waterपाणी