शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वसई पश्चिम पट्ट्यातील पाण्याची तपासणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 02:58 IST

वसई : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात टँकरद्वारे होत असलेल्या प्रचंड पाणी उपशाने पाण्याची पातळी खालावून क्षाराचे प्रमाण वाढले आहे.

वसई : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात टँकरद्वारे होत असलेल्या प्रचंड पाणी उपशाने पाण्याची पातळी खालावून क्षाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावक-यांमध्ये घातक रोगांची लागण होऊ लागली आहे. ती रोखण्यासाठी येथील पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानंतर हे पाणी पिण्यालायक आहे की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.वसईच्या पश्चिम पट्ट्यात विहीरी आणि बोअरवेल हाच पेयजलाचा स्त्रोत आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरी भागात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरने पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे पाण्यात क्षार, क्लोराईडचे प्रमाण अधिक असून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष जल तज्ञांनी काढला आहे.नंदाखाल, निर्मळ, गास, भुईगाव या गावातील पाण्यात क्षाराचे प्रमाण ७०० पासून १५० ते २०० मिलिग्रॅम प्रतिलिटर आहे. यामुळे मूत्रपिंडासह शरीरातील विविध अवयवांवर, केसांवर दुष्परिणाम होतात. या पाण्याचा सामू (पीएच) ८ आहे. काही ठिकाणी पाण्याचा सामू ९ ते ९. पर्यंत आहे. याचा परिणाम शरीरातील पेशींवर होतो. त्याशिवाय कर्करोगही होऊ शकतो, असा तज्ञांचा दावा आहे. इतकेच नाही तर पाण्यात जंतू, माती व रसायनांचेही प्रमाण असून त्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.पश्चिम पट्ट्यातील अनेक गावातील पाण्यात क्लोराईडचेही प्रमाण जास्त आढळून आले आहे. सामान्य मानकाप्रमाणे त्याचे प्रमाण २५० मिलिग्रॅम प्रतिलिटर असणे आवश्यक आहे. मात्र, बोळींज, नंदाखाल, भुईगावया ठिकाणी क्लोराईडचे प्रमाण ३०० मिलिग्रॅम प्रतिलिटर आढळले आहे. अति उपशामुळे खारे पाणी स्वच्छ पाण्याची जागा घेत आहे. आगाशी, नंदाखाल, बोळींज या परिसरात नायट्रेटचे प्रमाण ४५ पासून १०० मिलिग्रॅमपर्यंत पोचले आहे. हा घटक जास्त असल्यास लहान मुले व गर्भवती महिलांना त्याची बाधा होऊ शकते. वसई तालुक्यात ३१ ग्रामपंचायती असून त्यापैकी पश्चिम पट्ट्यात ११ ग्रामपंचायती आहेत. याठिकाणी ५० सार्वजनिक विहीरी, चार नळ पाणी पुरवठा योजना व ५११ बोअरवेलद्वारे पाणी पुरवठा केला जातो. या सर्व जलस्त्रोताचे नमुने तपासले जाणार आहेत.>विधान परिषदेत उपस्थित झाला प्रश्नया गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आमदार आनंद ठाकूर व हेमंत टकले यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या उत्तरात या परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याची माहिती दिली आहे. तिचा अहवाल आल्यानंतर पाणी पुरवठा संबंधी ठोस कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.