शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

वाडा शहराला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:39 IST

कचऱ्याचे पाणी मुरते बंधाºयात। भूजलही झाले प्रदूषित, प्रशासन कधी कारवाई करणार?

- वसंत भोईर

वाडा : शहराला पाणी पुरवठा वैतरणा नदीवर असलेल्या सिद्धेश्वर बंधाऱ्यांतून होते. या बंधाºयांच्या लगत अवघ्या १०० फूट अंतरावर वाडा नगरपंचायतीची कचराभूमी (डंपिंग ग्राऊंड ) आहे. पावसाळ्यात या डंपिंगमधून निचरा होणारे घाण पाणी वाहून या जलाशयात जात आहे.

वाडा शहरात गेल्या वर्षभरापासून कचरा भूमीचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. वाडा नगरपंचायतकडे स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने अन्य ठिकाणी जागा भाड्याने घेऊन शहरातील कचरा टाकला जातो. या पूर्वी शहरातील कचरा वाडा- भिवंडी या राज्य महामार्गालगत गांध्रे गावानजिक जागा भाड्याने घेऊन टाकला जात होता. मात्र रस्त्यालगत टाकल्या जाणाºया कचºयावर मोकाट जनावरे येऊन या महामार्गावर अपघात वाढल्याने तसेच या कचरा भूमीमुळे परिसरात दुर्गंधी वाढल्याने ही कचराभूमी बंद करण्यात आली.

वाडा शहरात कचराभूमीसाठी कुठेच जागा उपलब्ध न झाल्याने वाडा शहराला पाणी पुरवठा करणाºया सिद्धेश्वर बंधाºयालगतच्या मोकळ्या जागेत गेल्या दोन महिन्यांपासून नगरपंचायतीने वाडा शहरातील कचरा टाकण्यास सुरुवात केली. उन्हाळ्यात या कचराभूमीचा फारसा त्रास कुणाला झाला नाही. मात्र पावसाळा सुरु झाल्यापासून या कचराभूमीतील घाण पाणी थेट वाडा शहराला पाणी पुरवठा करणाºया जलाशयात जात आहे.

आधीच वाडा शहराला अत्यंत गढूळ, अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. आता त्यात आणखीन भर दूषित पाण्याची पडू लागल्याने वाड्यातील ३५ हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान या कचराभूमीतून निघणारे घाण पाणी नदीपात्रात जात आहे. नदी प्रवाहीत असल्याने या नदीकडील ऐनशेत, गांध्रे, तुसे या गावातील ग्रामस्थांनी ही कचराभुमी बंद करण्याची मागणी केली आहे.वाडा शहरवासीयांचे आरोग्य धोक्यातवाडा शहराला पाणी पुरवठा करणाºया जलाशयालगत टाकल्या जाणाºया कचºयांमध्ये हॉटेलमधील शिळे, खरकटे अन्न, खाटकांकडून कापण्यात येणाºया शेळ्या, मेंढी, कोंबड्या यांची आतडी, गावातील मृत जनावरे, कुत्री, डुकरे यांचे अवशेष अशा प्रकारची घाण येथील कचराभूमीवर टाकली जात आहे.येथील कचºयापासून व अन्य घाणीपासून तयार होणारे जीवजंतू पाण्याच्या प्रवाहातून नदीपात्रात (जलाशयात) जात आहे. यामुळे जलाशयातील पाणी दूषित होऊन मानवी जीवनास अतिशय धोकादायक व अपायकारक आहे. 

नदीपात्रालगतची कचराभूमी तातडीने अन्यत्र हलविण्यात यावी, अन्यथा नगरपंचायत प्रशासन विरोधात आंदोलन केले जाईल.- विजय दुरगुडे, ग्रामस्थवाडा शहरालगत मोठ्या प्रमाणात शासकीय जागा उपलब्ध असतांनाही त्या नगरपंचायतीकडे वर्ग करण्यास येथील लोकप्रतिनिधींना अपयश आल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. हे येथील लोकप्रतिनिधींच्या असाह्यतेचे द्योतक आहे.- किरण थोरात, सामाजिक कार्यकर्ता