शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाडा शहराला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:39 IST

कचऱ्याचे पाणी मुरते बंधाºयात। भूजलही झाले प्रदूषित, प्रशासन कधी कारवाई करणार?

- वसंत भोईर

वाडा : शहराला पाणी पुरवठा वैतरणा नदीवर असलेल्या सिद्धेश्वर बंधाऱ्यांतून होते. या बंधाºयांच्या लगत अवघ्या १०० फूट अंतरावर वाडा नगरपंचायतीची कचराभूमी (डंपिंग ग्राऊंड ) आहे. पावसाळ्यात या डंपिंगमधून निचरा होणारे घाण पाणी वाहून या जलाशयात जात आहे.

वाडा शहरात गेल्या वर्षभरापासून कचरा भूमीचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. वाडा नगरपंचायतकडे स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने अन्य ठिकाणी जागा भाड्याने घेऊन शहरातील कचरा टाकला जातो. या पूर्वी शहरातील कचरा वाडा- भिवंडी या राज्य महामार्गालगत गांध्रे गावानजिक जागा भाड्याने घेऊन टाकला जात होता. मात्र रस्त्यालगत टाकल्या जाणाºया कचºयावर मोकाट जनावरे येऊन या महामार्गावर अपघात वाढल्याने तसेच या कचरा भूमीमुळे परिसरात दुर्गंधी वाढल्याने ही कचराभूमी बंद करण्यात आली.

वाडा शहरात कचराभूमीसाठी कुठेच जागा उपलब्ध न झाल्याने वाडा शहराला पाणी पुरवठा करणाºया सिद्धेश्वर बंधाºयालगतच्या मोकळ्या जागेत गेल्या दोन महिन्यांपासून नगरपंचायतीने वाडा शहरातील कचरा टाकण्यास सुरुवात केली. उन्हाळ्यात या कचराभूमीचा फारसा त्रास कुणाला झाला नाही. मात्र पावसाळा सुरु झाल्यापासून या कचराभूमीतील घाण पाणी थेट वाडा शहराला पाणी पुरवठा करणाºया जलाशयात जात आहे.

आधीच वाडा शहराला अत्यंत गढूळ, अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. आता त्यात आणखीन भर दूषित पाण्याची पडू लागल्याने वाड्यातील ३५ हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान या कचराभूमीतून निघणारे घाण पाणी नदीपात्रात जात आहे. नदी प्रवाहीत असल्याने या नदीकडील ऐनशेत, गांध्रे, तुसे या गावातील ग्रामस्थांनी ही कचराभुमी बंद करण्याची मागणी केली आहे.वाडा शहरवासीयांचे आरोग्य धोक्यातवाडा शहराला पाणी पुरवठा करणाºया जलाशयालगत टाकल्या जाणाºया कचºयांमध्ये हॉटेलमधील शिळे, खरकटे अन्न, खाटकांकडून कापण्यात येणाºया शेळ्या, मेंढी, कोंबड्या यांची आतडी, गावातील मृत जनावरे, कुत्री, डुकरे यांचे अवशेष अशा प्रकारची घाण येथील कचराभूमीवर टाकली जात आहे.येथील कचºयापासून व अन्य घाणीपासून तयार होणारे जीवजंतू पाण्याच्या प्रवाहातून नदीपात्रात (जलाशयात) जात आहे. यामुळे जलाशयातील पाणी दूषित होऊन मानवी जीवनास अतिशय धोकादायक व अपायकारक आहे. 

नदीपात्रालगतची कचराभूमी तातडीने अन्यत्र हलविण्यात यावी, अन्यथा नगरपंचायत प्रशासन विरोधात आंदोलन केले जाईल.- विजय दुरगुडे, ग्रामस्थवाडा शहरालगत मोठ्या प्रमाणात शासकीय जागा उपलब्ध असतांनाही त्या नगरपंचायतीकडे वर्ग करण्यास येथील लोकप्रतिनिधींना अपयश आल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. हे येथील लोकप्रतिनिधींच्या असाह्यतेचे द्योतक आहे.- किरण थोरात, सामाजिक कार्यकर्ता