शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

वाडा तालुक्यात पाणीटंचाई?, नद्या आॅक्टोबरमध्येच कोरड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 00:06 IST

पावसाने यावर्षी लवकरच दडी मारल्याने तालुक्यातील भातशेती मोठ्या संकटात आली आहे.

- वसंत भोईरवाडा : पावसाने यावर्षी लवकरच दडी मारल्याने तालुक्यातील भातशेती मोठ्या संकटात आली आहे. यासाठीच तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी वाडा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. यादरम्यान तालुक्यातील नद्यांवर जे बंधारे आहेत ते तात्काळ बंद करा अशी मागणी करण्यात आल्यानंतर प्रशासन कामाला लागले असून तात्काळ बंधारे बंद करून पाणी अडवायला सुरु वात केली आहे.किमान नद्यांमध्ये असलेला पाणीसाठा शाबूत राहावा यासाठी नद्यांवर असलेले बंधारे बंद करा. अशी मागणी शेतकºयांनी केल्यानंतर प्रशासनाने आब्जे, पाली अशा विविध ठिकाणी असलेले बंधारे बंद करायला सुरुवात केली आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने नद्यांमधून वाहणारे पाणी कमी झाले होते. मात्र, असे असूनही जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने आणि लघु पाठबंधारे विभागाने वेळीच लक्ष न दिल्यामुळे आज बंधारे पूर्ण भरतात की नाही हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे यावर्षी बंधाºयांमधील पाण्याची पातळी अतिशय कमी आहे. पिंजाळ व वैतरणा नदीत तर काही दिवसात खडखडाट होईल अशी चिंता काही शेतकºयांनी व्यक्त केली असून पिकांच्या विनाशानंतर आता पाणीबाणी हे नवे आव्हान लोकांना सोसावे लागणार असेच दिसत आहे.>प्रशासनाला गांभीर्यच नाहीवाडा तालुक्यातून वैतरणा, पिंजाळ, तानसा व देहर्जे या चार नद्या वाहत असून त्यावर जागोजागी लहानमोठे बंधारे आहेत. खर तर हे बंधारे नीट व वेळेत बंद केले तर तालुक्यातील निम्म्याहून अधिक पाणीसंकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही मात्र दुर्दैवाने प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याने नद्यांचे पाणी वाहून जाते.पावसाने गेल्या अडीच महिन्यांपासून पाठ फिरवल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच मात्र परतीच्या पावसानेही दगा दिल्याने तालुक्यातील नद्यांमधील पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात कमी झाला असून सात महिने टिकेल इतका पाणीसाठा नद्यांमध्ये उरलेला नाही.