शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

वाडा तालुक्यात पाणीटंचाई?, नद्या आॅक्टोबरमध्येच कोरड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 00:06 IST

पावसाने यावर्षी लवकरच दडी मारल्याने तालुक्यातील भातशेती मोठ्या संकटात आली आहे.

- वसंत भोईरवाडा : पावसाने यावर्षी लवकरच दडी मारल्याने तालुक्यातील भातशेती मोठ्या संकटात आली आहे. यासाठीच तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी वाडा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. यादरम्यान तालुक्यातील नद्यांवर जे बंधारे आहेत ते तात्काळ बंद करा अशी मागणी करण्यात आल्यानंतर प्रशासन कामाला लागले असून तात्काळ बंधारे बंद करून पाणी अडवायला सुरु वात केली आहे.किमान नद्यांमध्ये असलेला पाणीसाठा शाबूत राहावा यासाठी नद्यांवर असलेले बंधारे बंद करा. अशी मागणी शेतकºयांनी केल्यानंतर प्रशासनाने आब्जे, पाली अशा विविध ठिकाणी असलेले बंधारे बंद करायला सुरुवात केली आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने नद्यांमधून वाहणारे पाणी कमी झाले होते. मात्र, असे असूनही जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने आणि लघु पाठबंधारे विभागाने वेळीच लक्ष न दिल्यामुळे आज बंधारे पूर्ण भरतात की नाही हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे यावर्षी बंधाºयांमधील पाण्याची पातळी अतिशय कमी आहे. पिंजाळ व वैतरणा नदीत तर काही दिवसात खडखडाट होईल अशी चिंता काही शेतकºयांनी व्यक्त केली असून पिकांच्या विनाशानंतर आता पाणीबाणी हे नवे आव्हान लोकांना सोसावे लागणार असेच दिसत आहे.>प्रशासनाला गांभीर्यच नाहीवाडा तालुक्यातून वैतरणा, पिंजाळ, तानसा व देहर्जे या चार नद्या वाहत असून त्यावर जागोजागी लहानमोठे बंधारे आहेत. खर तर हे बंधारे नीट व वेळेत बंद केले तर तालुक्यातील निम्म्याहून अधिक पाणीसंकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही मात्र दुर्दैवाने प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याने नद्यांचे पाणी वाहून जाते.पावसाने गेल्या अडीच महिन्यांपासून पाठ फिरवल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच मात्र परतीच्या पावसानेही दगा दिल्याने तालुक्यातील नद्यांमधील पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात कमी झाला असून सात महिने टिकेल इतका पाणीसाठा नद्यांमध्ये उरलेला नाही.