शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई आमच्या पाचवीलाच पुजलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 02:35 IST

या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २७७२ इतकी आहे. शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली ही ग्रामपंचायत आहे.

वसंत भोईर ।वाडा : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आदिवासी भागात रस्ते, पाणी व वीज या मुलभूत सुविधा सरकार देऊ शकलेले नाही. गाव- पाड्यात जायला धड रस्ता नाही, वीज काही भागांत पोहचली असली तरी रात्री मिणमिणत्या उजेडात महिलांना स्वयंपाक व विद्यार्थांना अभ्यास करावा लागतो. तर पाणी टंचाई ही दरवर्षी प्रमाणे आताही आहे. पाणी टंचाई ही आमच्या पाचवीलाच पुजलेली असल्याच्या भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या.तालुक्यातील पूर्व पट्टयातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली ओगदा ही ग्रामपंचायत असून तिच्या अखत्यारित ओगदा, फणसपाडा, पाचघर, खोडदा व तिळमाळ ही पाच महसुली गावे असून चौदा पाडे आहेत. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २७७२ इतकी आहे. शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली ही ग्रामपंचायत आहे. हा भाग अतिदुर्गम असल्याने प्रशासनाचे फारसे लक्ष येथे नाही असा आरोप आदिवासी नागरिक करीत आहेत. त्यामुळे मुलभूत सुविधांपासून ही ग्रामपंचायत वंचित आहे. ताडमाळ आणि मुहमाळ या पाड्यात जायला आजही रस्ता नाही. पायवाट व डोंगर चढून या पाड्यात जावे लागते. या पाड्याची १५० ते १७५ लोकसंख्या असून त्यांना जिकीरीचे जीवन जगावे लागत आहे. या गावातील नागरिक आजही खड्ड्यातील पाणी पित आहेत. येथे टंचाई जाणवत आहे. मात्र, टॅकरला जायला रस्ता नसल्याने प्रशासन येथे काहीच करू शकत नाही. बैलगाडीने येथे पाणी पुरवठा केला जातो.या ग्रामपंचायतीच्या पूर्वेकडील टोकरेपाडा, दिवेपाडा, सागमाळ व जांभुळपाडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात असलेल्या विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दरवर्षी मार्च महिन्यापासूनच येथे टंचाई जाणवायला सुरु वात होते असे येथील महिला माया दोडे यांनी सांगितले. सकाळ संध्याकाळ येथील नागरिक अंघोळ व महिला कपडे धुण्यासाठी एक किमी अंतरावर असलेल्या नदीवर जातात अशी माहिती ग्रामस्थ बबन दोडे यांनी दिली. पाणी टंचाईची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासनाने एक टॅकर दोन ते तीन दिवसाआड चालू केले. एक दिवशी सागमाळ, टोकरेपाडा तर दुसऱ्या जांभुळपाडा असे टॅकर टाकले जाते. असे दोडे यांनी सांगितले. ओगदातील गावे ही वैतरणा जलप्रकल्प क्षेत्रात येत असून या गावाशेजारीच वैतरणा धरण होणार आहे. त्याचे सर्वेक्षण झाले असून ही गावे विस्थापित होणार आहेत. त्यामुळे त्यांना एखादी योजना घ्यायची असल्यास या धरणाची बाब पुढे येते व त्यांच्या योजना बारगळतात असे ग्रामस्थांनी सांगितले. 

टॅग्स :Waterपाणी