शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

पाणीटंचाई आमच्या पाचवीलाच पुजलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 02:35 IST

या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २७७२ इतकी आहे. शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली ही ग्रामपंचायत आहे.

वसंत भोईर ।वाडा : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आदिवासी भागात रस्ते, पाणी व वीज या मुलभूत सुविधा सरकार देऊ शकलेले नाही. गाव- पाड्यात जायला धड रस्ता नाही, वीज काही भागांत पोहचली असली तरी रात्री मिणमिणत्या उजेडात महिलांना स्वयंपाक व विद्यार्थांना अभ्यास करावा लागतो. तर पाणी टंचाई ही दरवर्षी प्रमाणे आताही आहे. पाणी टंचाई ही आमच्या पाचवीलाच पुजलेली असल्याच्या भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या.तालुक्यातील पूर्व पट्टयातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली ओगदा ही ग्रामपंचायत असून तिच्या अखत्यारित ओगदा, फणसपाडा, पाचघर, खोडदा व तिळमाळ ही पाच महसुली गावे असून चौदा पाडे आहेत. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २७७२ इतकी आहे. शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली ही ग्रामपंचायत आहे. हा भाग अतिदुर्गम असल्याने प्रशासनाचे फारसे लक्ष येथे नाही असा आरोप आदिवासी नागरिक करीत आहेत. त्यामुळे मुलभूत सुविधांपासून ही ग्रामपंचायत वंचित आहे. ताडमाळ आणि मुहमाळ या पाड्यात जायला आजही रस्ता नाही. पायवाट व डोंगर चढून या पाड्यात जावे लागते. या पाड्याची १५० ते १७५ लोकसंख्या असून त्यांना जिकीरीचे जीवन जगावे लागत आहे. या गावातील नागरिक आजही खड्ड्यातील पाणी पित आहेत. येथे टंचाई जाणवत आहे. मात्र, टॅकरला जायला रस्ता नसल्याने प्रशासन येथे काहीच करू शकत नाही. बैलगाडीने येथे पाणी पुरवठा केला जातो.या ग्रामपंचायतीच्या पूर्वेकडील टोकरेपाडा, दिवेपाडा, सागमाळ व जांभुळपाडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात असलेल्या विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दरवर्षी मार्च महिन्यापासूनच येथे टंचाई जाणवायला सुरु वात होते असे येथील महिला माया दोडे यांनी सांगितले. सकाळ संध्याकाळ येथील नागरिक अंघोळ व महिला कपडे धुण्यासाठी एक किमी अंतरावर असलेल्या नदीवर जातात अशी माहिती ग्रामस्थ बबन दोडे यांनी दिली. पाणी टंचाईची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासनाने एक टॅकर दोन ते तीन दिवसाआड चालू केले. एक दिवशी सागमाळ, टोकरेपाडा तर दुसऱ्या जांभुळपाडा असे टॅकर टाकले जाते. असे दोडे यांनी सांगितले. ओगदातील गावे ही वैतरणा जलप्रकल्प क्षेत्रात येत असून या गावाशेजारीच वैतरणा धरण होणार आहे. त्याचे सर्वेक्षण झाले असून ही गावे विस्थापित होणार आहेत. त्यामुळे त्यांना एखादी योजना घ्यायची असल्यास या धरणाची बाब पुढे येते व त्यांच्या योजना बारगळतात असे ग्रामस्थांनी सांगितले. 

टॅग्स :Waterपाणी