शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

विरारच्या काही भागांत पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:26 IST

चार दिवसाआड पाणी येत असल्याने महिलांमध्ये तीव्र संताप

विरार : मनवेलपाडा, कारगिल नगर, नाना-नानी पार्क आदी भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, चार दिवसाआड येणाऱ्या पाण्यामुळे महिला हैराण झाल्या आहेत. मात्र, महापालिकेकडून यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. मनवेलपाडा, कारगिल नगर, नाना-नानी पार्क आदी भागात मोठ्या प्रमाणात लोडबेअरिंग इमारती आणि चाळी आहेत. लाखो वस्तीच्या या भागात प्रत्येक चाळ किंवा इमारतीनुसार नळजोडण्या आहेत. काही चाळी किंवा इमारतींना तर अद्यापही नळजोडण्या मिळालेले नाहीत.  परिणामी १०-१० रुम एका नळजोडणीवर अवलंबून असतात. यात एक तास पाणी येणार असेल तर या १० रुमना तितकी मिनिटे विभागून पाणी भरावे लागते. यामुळे महिलांचा बहुतांश वेळ हा पाणी भरण्यात जातो. कित्येक वेळा तर रात्री-अपरात्री पाणी सोडण्यात येत असल्याने महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो.त्यातच आता गेला महिनाभर चार दिवसाआड पाणी येत असल्याने महिला प्रचंड त्रासल्या आहेत. यासंदर्भात येथील महिलांनी स्थानिक नगरसेवक व पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असली, तरी त्याबाबतचे योग्य उत्तर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.  दरम्यान, नालासोपारा-मोरेगाव येथील जलकुंभ व या जलकुंभापासून विविध ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांचे काम सुरू असून सर्व कामे पूर्ण होणार असल्याची माहिती दिली होती.  केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान योजनेंतर्गत वसई तालुक्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणारे जलकुंभ व या जलकुंभांपासून टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांच्या कामाचा आढावा वसई-विरार शहर महापालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, अमृत अभियान योजनेच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी घेण्यात आला होता. तर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत १४ पैकी ८ जलकुंभांचे काम करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त गंगाथरन डी. यांनी  दिली होती. ...तर पालिकेवर हंडा-कळशी मोर्चाविरार परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पाणीटंचाई-विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. येत्या आठ दिवसांत परिसरात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महानगरपालिकेवर हंडा-कळशी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई