शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विरारच्या काही भागांत पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:26 IST

चार दिवसाआड पाणी येत असल्याने महिलांमध्ये तीव्र संताप

विरार : मनवेलपाडा, कारगिल नगर, नाना-नानी पार्क आदी भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून, चार दिवसाआड येणाऱ्या पाण्यामुळे महिला हैराण झाल्या आहेत. मात्र, महापालिकेकडून यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. मनवेलपाडा, कारगिल नगर, नाना-नानी पार्क आदी भागात मोठ्या प्रमाणात लोडबेअरिंग इमारती आणि चाळी आहेत. लाखो वस्तीच्या या भागात प्रत्येक चाळ किंवा इमारतीनुसार नळजोडण्या आहेत. काही चाळी किंवा इमारतींना तर अद्यापही नळजोडण्या मिळालेले नाहीत.  परिणामी १०-१० रुम एका नळजोडणीवर अवलंबून असतात. यात एक तास पाणी येणार असेल तर या १० रुमना तितकी मिनिटे विभागून पाणी भरावे लागते. यामुळे महिलांचा बहुतांश वेळ हा पाणी भरण्यात जातो. कित्येक वेळा तर रात्री-अपरात्री पाणी सोडण्यात येत असल्याने महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो.त्यातच आता गेला महिनाभर चार दिवसाआड पाणी येत असल्याने महिला प्रचंड त्रासल्या आहेत. यासंदर्भात येथील महिलांनी स्थानिक नगरसेवक व पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असली, तरी त्याबाबतचे योग्य उत्तर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.  दरम्यान, नालासोपारा-मोरेगाव येथील जलकुंभ व या जलकुंभापासून विविध ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांचे काम सुरू असून सर्व कामे पूर्ण होणार असल्याची माहिती दिली होती.  केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान योजनेंतर्गत वसई तालुक्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणारे जलकुंभ व या जलकुंभांपासून टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांच्या कामाचा आढावा वसई-विरार शहर महापालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, अमृत अभियान योजनेच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी घेण्यात आला होता. तर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत १४ पैकी ८ जलकुंभांचे काम करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त गंगाथरन डी. यांनी  दिली होती. ...तर पालिकेवर हंडा-कळशी मोर्चाविरार परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पाणीटंचाई-विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. येत्या आठ दिवसांत परिसरात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महानगरपालिकेवर हंडा-कळशी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई