शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

विक्रमगड तालुक्यातील पाणीटंचाई समस्या झाली गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:50 IST

कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

राहुल वाडेकर

विक्रमगड : तालुक्यामधील अनेक गावपाड्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. काही भागांत मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून पाण्याची समस्या जाणवू लागली असल्याने या भागात टँकरचे प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहेत. दरवर्षी तालुक्यातील हजारो नागरिकांना पाणीटंचाईशी दोन हात करावे लागत असल्याने शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

विक्रमगड तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ असल्याने फेब्रुवारीनंतर तालुक्यातील काही गावपाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही पाणीटंचाई मार्चपासून ते पाऊस पडेपर्यंत कायम राहते. हक्काच्या पाण्यासाठी या भागात महिला संघर्ष करीत आहेत. विक्रमगड तालुक्यात सुमारे २८ गावपाड्यांना पाणीटंचाईचा दरवर्षी सामना करावा लागतो. या २८ गावपाड्यांमधून सुमारे ४० ते ५० हजार नागरिकांना दिवसाला जवळपास २५ टँकर लागत आहेत.  तालुक्याचे प्रशासन या गावांमध्ये नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असले तरी यावर कायमचा तोडगा अजूनही निघालेला नाही. वास्तविक, तालुक्यामध्ये पाण्याचे मोठे स्रोत आहेत. सूर्या ही मोठा धरण प्रकल्प आहे. खांड लघुपाटबंधारा, मुहू खुर्द लघुपाटबंधारा, चार मोठ्या नद्या उपलब्ध असताना येथील गावांना पाणीटंचाई उद्भवत आहे, ही शोकांतिका असल्याचे सांगितले जाते. शासनामार्फत अनेक वेळा येथील पाणीटंचाईचा निपटारा करण्यासाठी मोठमोठ्या योजना प्रस्तावित केल्या होत्या, मात्र या योजना अजूनही कागदावरच लालफितीत अडकल्या आहेत. ज्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो अशी गावे डोंगराळ भागात असल्याने तेथे नळपाणीपुरवठा करणे सोपे नसले तरी या तालुक्यांमध्ये जलस्रोत टिकवून ठेवण्यासाठी छोटे-मोठे बंधारे बांधणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते.

तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीमुळे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असली तरी यावर शासनाने कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. तालुक्यात पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. नदी-नाले यांच्यावर बंधारे बांधायला हवेत.- डॉ. सिद्धार्थ सांबरे, सामाजिक कार्यकर्ते

तालुक्यात अनेक पाणीपुरवठा योजना गेल्या ७-८ वर्षांपासून अपूर्ण आहेत. या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून चालू करायला हव्यात. तसेच तालुक्यातील अनेक गावांची वाढती लोकसंख्या बघता नवीन पाणीपुरवठा योजना राबवायला हव्यात.- प्रमोद विश्वनाथ पाटील, सदस्य - युवा प्रहार ग्रुप

टॅग्स :Vasai Virarवसई विरार