शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

जिल्ह्यात पाण्याचे स्रोत, शेतकरी-ग्रामस्थांची मात्र वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:37 IST

राहुल वाडेकर  विक्रमगड : पूर्वीचा ठाणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने सहा वर्षांपूर्वी नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आला. या जिल्ह्यात ...

राहुल वाडेकर विक्रमगड : पूर्वीचा ठाणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने सहा वर्षांपूर्वी नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आला. या जिल्ह्यात शेतकऱ्यांचा उद्धार व्हावा व नागरिकांना पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाने आदिवासी उपयोजनेतून येथील पाणी स्रोतांच्या आधारावर मोठी धरणे प्रस्तावित केली व ती धरणे सिंचनासाठी अस्तित्वात आणली असली तरी आजही जिल्ह्यात धरणे असूनही जिल्हावासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, ही शोकांतिकाच आहे.

जिल्ह्यातील धरणांचे पाणी इतरत्र वळवून धरणांशेजारील गावे आजही पाण्यापासून उपेक्षितच आहेत. साधे पिण्याचे पाणीही या धरणांलगतच्या गावांना मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. डहाणू तालुक्यातील चंद्रनगर व हनुमाननगर ही पुनर्वसित गावे, पोफरण अक्करपटी याचे जिवंत उदाहरण म्हणता येईल.

याच बरोबरीने कवडास व धामणी धरण अंतर्गत असलेल्या सूर्या प्रकल्पातून जिल्ह्याच्या डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यात कृषी सिंचनाचे मूळ उद्दिष्ट समोर ठेवून शासनाने सूर्या प्रकल्प अस्तित्वात आणला असला तरी या प्रकल्पातील पाणी इतरत्र वळवून येथील शेतकऱ्यांची घोर निराशा सरकारने चालवली आहे. हजारो दशलक्ष घनलीटर पाणी दररोज वसई-विरार, मीरा-भाईंदर व मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाला देऊन येथील शेती सिंचनातून बाद केली असल्याचा आरोप केला जात आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार