शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

जिल्ह्यात पाण्याचे स्रोत, शेतकरी-ग्रामस्थांची मात्र वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:37 IST

राहुल वाडेकर  विक्रमगड : पूर्वीचा ठाणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने सहा वर्षांपूर्वी नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आला. या जिल्ह्यात ...

राहुल वाडेकर विक्रमगड : पूर्वीचा ठाणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने सहा वर्षांपूर्वी नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आला. या जिल्ह्यात शेतकऱ्यांचा उद्धार व्हावा व नागरिकांना पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाने आदिवासी उपयोजनेतून येथील पाणी स्रोतांच्या आधारावर मोठी धरणे प्रस्तावित केली व ती धरणे सिंचनासाठी अस्तित्वात आणली असली तरी आजही जिल्ह्यात धरणे असूनही जिल्हावासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, ही शोकांतिकाच आहे.

जिल्ह्यातील धरणांचे पाणी इतरत्र वळवून धरणांशेजारील गावे आजही पाण्यापासून उपेक्षितच आहेत. साधे पिण्याचे पाणीही या धरणांलगतच्या गावांना मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. डहाणू तालुक्यातील चंद्रनगर व हनुमाननगर ही पुनर्वसित गावे, पोफरण अक्करपटी याचे जिवंत उदाहरण म्हणता येईल.

याच बरोबरीने कवडास व धामणी धरण अंतर्गत असलेल्या सूर्या प्रकल्पातून जिल्ह्याच्या डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यात कृषी सिंचनाचे मूळ उद्दिष्ट समोर ठेवून शासनाने सूर्या प्रकल्प अस्तित्वात आणला असला तरी या प्रकल्पातील पाणी इतरत्र वळवून येथील शेतकऱ्यांची घोर निराशा सरकारने चालवली आहे. हजारो दशलक्ष घनलीटर पाणी दररोज वसई-विरार, मीरा-भाईंदर व मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाला देऊन येथील शेती सिंचनातून बाद केली असल्याचा आरोप केला जात आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार