शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

विरारमधील जलस्रोत संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 05:09 IST

पन्नास वर्ष जुना बावखल बाधीत : सांडपाण्यामुळे परिसरात रोगराई

विरार : येथील एका अनधिकृत इमारतीच्या विकासकाने सांडपाणी दोन फुटावर असलेल्या मुख्य नाल्यात न सोडता शेजारी असलेल्या जवळपास ५० वर्ष जुन्या बावखलात सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिणामी येथील रहिवाशाना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.

एकीकडे वसई विरार शहरात पाण्याचा तुटवडा असतानाच नैसर्गिक गोड्या पाण्याचे स्रोत नष्ट करण्याचे प्रयत्न अनधिकृत विकासकांकडून सुरु आहे. झपाट्याने वाढत चाललेली बांधकामे व त्याकडे महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे हे प्रकार वाढत चालले आहे. विरार पूर्व येथील फुलपाडा स्थित गांधी चौक येथे झा निवास ही इमारत आहे. तिचे बांधकाम मुख्य नाल्याच्या कठड्यावर केले आहे. ती इमारत दहा वर्ष जुनी असून तेथे जवळपास शंभरहुन अधिक कुटुंब येथे राहत आहेत. या प्रकरणाबाबत महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ लक्ष देत सबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.याबाबत विकासक पवन तिवारी म्हणाले की, या इमारतीचे बांधकाम हे दहा वर्ष जुने आहे. इमारत बांधली होती तेव्हा आम्ही त्याची ड्रेनेज लाईन चेंबर बनवून मुख्य नाल्यात सोडली होती. त्यानंतर या इमारतीचा ताबा सोसायटी स्थापन झाल्यानंतर रहिवाशांना देण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून चेंबर तुटलेल्या अवस्थेत असल्याने बिल्डिंगचे सांडपाणी बावखलात जात आहे.दहा वर्षांपूर्वी इमारत बांधली होती तेव्हा आम्ही त्याची ड्रेनेज लाईन चेंबर बनवून मुख्य नाल्यात सोडली होती. गेल्या दोन वर्षांपासून चेंबर तुटलेल्या सांडपाणी बावखलात जात आहे. चेंबर दुरु स्त करण्याचे काम सोसायटीचे आहे.- पवन तिवारी (विकासक)या परिसरात आम्ही पिढ्या-न-पिढ्या राहत असून पूर्वी या बावखलाच्या पाण्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी वापर केला जात होता. मात्र हे बावखल आता सांडपाण्याच्या विळख्यात अडकले आहे.- अक्षय पाटील, स्थानिक 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी