शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

आदिवासींसाठी जलमित्रांनी खोदले नदीत खड्डे

By admin | Updated: June 5, 2016 02:56 IST

या शहराच्या एका टोकाला असलेले दहा-बारा हजार लोकवस्तीचे कामण गाव सध्या पाणी टंचाईने त्रस्त झाले आहे. पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने गावकरी विहीरी आणि बोअरवेलच्या पाण्यावर

वसई : या शहराच्या एका टोकाला असलेले दहा-बारा हजार लोकवस्तीचे कामण गाव सध्या पाणी टंचाईने त्रस्त झाले आहे. पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने गावकरी विहीरी आणि बोअरवेलच्या पाण्यावर विसंबून आहेत. पण, कडक उन्हाने पाणी टंचाईने उग्र स्वरुप धारण केले आहे. त्याचा फटका गावाशेजारील किमान १५ आदिवासी पाड्यांना बसला आहे. त्यांची तहान भागवण्यासाठी शिवसेना नगरसेविकेने कामण नदीच्या कोरड्यापात्रात तीन ठिकाणी खोल खड्डे खोदून त्यातील पाणी आदीवासींना उपलब्ध करून दिले आहे. मुंबई-अहमदाबाद हायवे पलिकडे दहा-बारा हजार लोकवस्तीचे कामण गाव वसले आहे. गावात १० सरकारी, २५ खाजगी विहीरी आहेत. तर २० सरकारी आणि किमान शंभरच्या घरात बोअरवेल आहेत. त्यात बाराही महिने पाणी असलेल्या कामण नदीमुळे गावाला पाणी टंचाई अशी कधी जाणवलीच नाही. पण, गेल्या पंचवीस वर्षांत या परिसरात शेकडो तबेले झाले. नदी जवळ असल्याने जमिनीत मुबलक पाणीसाठा. त्यामुळे एकेका तबेला मालकांनी चार-पाच बोअरवेल मारून जमिनीतील पाण्याचा बेसुमार उपसा केला. पंचवीस वर्षांनंतर आता कामण गावाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. कामण नदी असल्याने गावात विहीरी आणि बोअरवेल असल्याने मुबलक पाणी मिळत होते. तरीही १९८४ साली जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने विहीरी खोदून नळाद्वारे पाणी पुरवठा योजना राबवली होती. पण, देखभाल-दुरुस्ती अभावी ही योजना पाच वर्षांपासून बंद पडली आहे. कामण परिसरात डोंगरदऱ्या आहेत. त्यामुळे १९७२ साली ११ हेक्टर परिसराच्या पाझर तलावाचे भूमीपूजनही करण्यात आले. पण, वनखात्याने आडकाठी आणल्याने पाझर तलाव प्रकल्पाचे काम सुरु होऊ शकले नाही. आता कामण गावात पाणी टंचाईने उग्र स्वरुप धारण केले आहे. तबेल्यांकडून बेसुमार उपसा झाल्याने जमिनीतील पाण्याचा साठा संपुष्टात आला आहे. तबेल्याधारकांनी दीड हजार फूटापर्यंतच्या बोअरिंग मारून ठेवल्या आहेत. आता गावकरी पाचशे फूटाहून खोल जात असूनही पाणी लागत नाही, अशी व्यथा माजी सरपंच दिनेश म्हात्रे बोलून दाखवतात. म्हात्रे यांच्या पत्नी प्रीती म्हात्रे सध्या नगरसेविका आहेत. त्यांच्या माध्यमातून कामण परिसरात पालिकेकडून टँकरने पाणीपुरवठा सुुरु करण्यात आला होता. तो ही अपुरा होता. (वार्ताहर)कामण परिसरात पाण्याची तीव्र टंचाई आहे. मागणी करुनही पालिका बोअर खोदून देत नाही. मोजक्या टँकरवर तहान भागत नाही. त्यामुळे कामणची पाणी टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी ठोस कार्यवाही झाली पाहिजे. त्यासाठी सोमवारपासून आंदोलन छेडणार आहोत.- प्रीती दिनेश म्हात्रे, शिवसेना नगरसेविकाअखेर भागली आदिवासींची तहान- प्रीती म्हात्रे यांनी पालिकेकडे २० बोअरची मागणी केली होती. पण, पालिकेने त्या ऐवजी टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. पण, तोही अपुरा पडत असल्याने लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामध्ये आदिवासींचे होणारे हाल पाहून प्रीती आणि दिनेश म्हात्रे यांनी एक नामी शक्कल लढवली. कामण नदीच्या पात्रात खोल खड्डे खोदण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पालिकेने मदत नाकारल्यानंतर म्हात्रे दाम्पत्याने स्वत: जेसीबी मागवून १२ फूट रुंद आणि १० फूट खोल असे नदीत तीन खड्डे खोदले. विशेष म्हणजे या तीनही खड्ड्यांमध्ये पाण्याचा साठा मिळाला. त्यामुळे आता येथील आदिवासींना किमान पिण्यासाठी पाणी मिळू लागले आहे.