शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नायगावात पाणी झाले ‘कुलूप बंद, पाणीबाणीचा असाही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 23:43 IST

नायगाव पूर्व मधील गणेश नगर येथे सध्या पाणीबाणी सुरू आहे.

नालासोपारा : नायगाव पूर्व मधील गणेश नगर येथे सध्या पाणीबाणी सुरू आहे. पाणी जास्त मौल्यवान असून त्याच्या एका थेंबाचीही चोरी होवू नये याकरिता येथील रहिवासी पाण्याच्या पिंपांना कुलूप लावत असल्याचे आश्चर्यचकीत करणारे चित्र दिसून येत आहे. पाण्याची टंचाई आणि त्यात पाणी कमी पडू नये म्हणून ही उपाययोजना केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मौल्यवान वस्तू कोणी चोरून नेईल या भीतीने जशी कुलूपात सुरक्षित ठेवली जाते, बँकेच्या लॉकर्सचा आधारही घेतला जातो. त्याच रितीने आता नायगावमध्ये पाणी सांभाळण्यासाठी पिंपांना कुलूप लावले जात आहे.याठिकाणी वसई विरार महापालिकेचे पाणी अद्याप आले नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा होत असतो. चाळीत प्रवेश करताच याठिकाणी पाण्याची मोठमोठी कुलूपबंद पिंपे ठेवलेली दिसतात. रात्री साडेआठ वाजता टँकर येताच पाणी भरण्याची धावपळ सुरु होते ते भरले की त्याला बाहेरून कुलूप ठोकले जाते. याठिकाणी चाळीत राहणाऱ्या रहिवाशांची सुमारे २५० हून अधिक पिंपे बाहेर असतात. बैठ्या चाळीतील घरांचे क्षेत्रफळ कमी असल्याने घराच्या समोर हीे पिंपे ठेवली जातात.वसई विरार महापालिकेने या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु अनेक इमारती पाण्यावाचून आहेत. त्यामुळे टँकरचा पाणीपुरवठा या भागात होत असतो. एका टँकरसाठी १ हजार ते १५०० रुपये मोजावे लागतात. गणेश चाळीत देखील हीच परिस्थिती आहे.