शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

मतदानापेक्षा पाणी महत्त्वाचं... दादारकोपरा गावात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 21:09 IST

पालघर जिल्ह्यातील दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या मृत्यूमुळे लागलेली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झालेली असताना जव्हार तालुक्यात दारकोपरा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असून तीन दिवसांनी टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

- हुसेन मेमन

जव्हार-  पालघर जिल्ह्यातील दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या मृत्यूमुळे लागलेली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झालेली असताना जव्हार तालुक्यात दारकोपरा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असून तीन दिवसांनी टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्यायला नाही पाणी, तर मतदान कशाला? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. पाण्याचा टँकर आल्यावर तर विहिरीवर महिलांची झुंबडच होते पूर्ण गावच्या गाव पाणी भरण्यासाठी विहिरीवर तुटून पडतात आणि काही मिनिटातच पाणी संपते अशा परिस्थिती मतदार मतदान द्यायचे की पाणी भरायचे, मतदान देऊनही निवडून आलेले खासदार आजतागायत आमची पण्यायाची समस्या सोडवू शकला नाही तर मतदानच का करायचे असा संतप्त सवाल येथील आदिवासी बांधव करीत आहेत. दादरकोपरा गावात ११८ कुटुंब राहत असून मागील वर्षापेक्षा या वर्षी पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावात दोन दिवसाआड टँकरने पाणी पुरवठा केला जात  असल्याने मे महिना कसा घालवायचा आणि जून महिन्याच्या सुरवातीला तर मोठी पाणी टंचाई होईल असाही प्रश्न महिलावर्ग व ग्रामस्थांना पडला आहे. त्यामुळे आम्हला मतदानापेक्षा पाणी महत्वाचं असल्याचे महिलांनी सांगितले.दादरकोपरा गावाजवळील विहिरींनी तळ गाठला असून, एक हाफसा बोअरिंग आहे. मात्र या हाफसा बोअरिंगवर पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र करून नंबर लावावे लागत आहेत. तर याच गावातील दुस-या विहिरीवरील झिरपणारे पाणी खरतडून भरावे लागत आहे. तसेच या भीषण पाणीटंचाईमुळे गाई, गुरांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल झाले आहेत. म्हणून येथील शेतकऱ्यांनी गाई, गुरे, म्हशी अशी जनावरे नदीकाठी जंगलात हाकलून दिले आहेत. त्यामुळे येथील गुरा ढोरांचे करायचे काय असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यातच कधीकाळी टँकरचा पंचर किव्हा बिघाड झाल्यास चार दिवसाआड टँकर येत असल्याने पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. या गावातील ज्या विहिरीवर टँकर पाणी टाकते. त्या विहिरीवर महिला उभ्या राहून पाणी भरतात ती विहीर पूर्णपणे कोरडी आहे. पाणी भरण्यासाठी महिला, पुरुष, आणि मुलांनाही पाणी भरण्यासाठी झुंबड करावी लागत आहे. त्यामुळे  हंडाभर पाण्यासाठी वाद देखील निर्माण होत आहेत. तसेच एखादी महिला विहिरीच्या पाळीवरून कोरड्या विहीरीत पडण्याची भीती महिलांना आहे. धोका पत्करून महिलांना पाणी भरावे लागत आहे.  आमच्या गावातील ही दरवर्षीची पाणी टंचाई आहे. मात्र या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच टँकरही तीन दिवसांनी येत असल्याने पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. म्हणून आम्हला त्या मतदानापेक्षा पाणी महत्वाचं आहे. तसेच आम्ही अनेक वेळा निवेदने देवनही पाणी मिळत नाही.