शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मतदानापेक्षा पाणी महत्त्वाचं... दादारकोपरा गावात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 21:09 IST

पालघर जिल्ह्यातील दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या मृत्यूमुळे लागलेली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झालेली असताना जव्हार तालुक्यात दारकोपरा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असून तीन दिवसांनी टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

- हुसेन मेमन

जव्हार-  पालघर जिल्ह्यातील दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या मृत्यूमुळे लागलेली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झालेली असताना जव्हार तालुक्यात दारकोपरा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असून तीन दिवसांनी टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्यायला नाही पाणी, तर मतदान कशाला? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. पाण्याचा टँकर आल्यावर तर विहिरीवर महिलांची झुंबडच होते पूर्ण गावच्या गाव पाणी भरण्यासाठी विहिरीवर तुटून पडतात आणि काही मिनिटातच पाणी संपते अशा परिस्थिती मतदार मतदान द्यायचे की पाणी भरायचे, मतदान देऊनही निवडून आलेले खासदार आजतागायत आमची पण्यायाची समस्या सोडवू शकला नाही तर मतदानच का करायचे असा संतप्त सवाल येथील आदिवासी बांधव करीत आहेत. दादरकोपरा गावात ११८ कुटुंब राहत असून मागील वर्षापेक्षा या वर्षी पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावात दोन दिवसाआड टँकरने पाणी पुरवठा केला जात  असल्याने मे महिना कसा घालवायचा आणि जून महिन्याच्या सुरवातीला तर मोठी पाणी टंचाई होईल असाही प्रश्न महिलावर्ग व ग्रामस्थांना पडला आहे. त्यामुळे आम्हला मतदानापेक्षा पाणी महत्वाचं असल्याचे महिलांनी सांगितले.दादरकोपरा गावाजवळील विहिरींनी तळ गाठला असून, एक हाफसा बोअरिंग आहे. मात्र या हाफसा बोअरिंगवर पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र करून नंबर लावावे लागत आहेत. तर याच गावातील दुस-या विहिरीवरील झिरपणारे पाणी खरतडून भरावे लागत आहे. तसेच या भीषण पाणीटंचाईमुळे गाई, गुरांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल झाले आहेत. म्हणून येथील शेतकऱ्यांनी गाई, गुरे, म्हशी अशी जनावरे नदीकाठी जंगलात हाकलून दिले आहेत. त्यामुळे येथील गुरा ढोरांचे करायचे काय असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यातच कधीकाळी टँकरचा पंचर किव्हा बिघाड झाल्यास चार दिवसाआड टँकर येत असल्याने पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. या गावातील ज्या विहिरीवर टँकर पाणी टाकते. त्या विहिरीवर महिला उभ्या राहून पाणी भरतात ती विहीर पूर्णपणे कोरडी आहे. पाणी भरण्यासाठी महिला, पुरुष, आणि मुलांनाही पाणी भरण्यासाठी झुंबड करावी लागत आहे. त्यामुळे  हंडाभर पाण्यासाठी वाद देखील निर्माण होत आहेत. तसेच एखादी महिला विहिरीच्या पाळीवरून कोरड्या विहीरीत पडण्याची भीती महिलांना आहे. धोका पत्करून महिलांना पाणी भरावे लागत आहे.  आमच्या गावातील ही दरवर्षीची पाणी टंचाई आहे. मात्र या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच टँकरही तीन दिवसांनी येत असल्याने पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. म्हणून आम्हला त्या मतदानापेक्षा पाणी महत्वाचं आहे. तसेच आम्ही अनेक वेळा निवेदने देवनही पाणी मिळत नाही.