शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोळ्यांत आणि शेतात पाणी, मदत तरी कुणाची घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:32 IST

मदत तरी कुणाची घेणार : घरासाठी पौष्टिक धान्य मिळणार नाही

भातसानगर : हातचे भातपीक पावसाने नेले, आता मदत तरी कुणाची घेऊ, अशी अवस्था शहापूर तालुक्यातील कानवे येथील हुसेन आदम शेख या शेतकऱ्याची झाली आहे. या शेतकºयाची पूर्ण भातशेती आज पाण्यात गेली आहे. त्यामुळे आता वर्षभरासाठी ठेवले जाणारे घरचे पौष्टिक धान्य मिळणार नसल्याचे दु:ख त्यांच्या चेहºयावर दिसत आहे.

कानवे येथे राहणाºया या शेतकºयाच्या उभ्या आयुष्यात अशा प्रकारचे संकट कधीच आले नाही. केवळ, पावसाच्या पाण्यावर वर्षभरातून एकदाच भातपीक घेतले जाते. याच एकमेव पिकावर त्यांचे वर्ष अवलंबून असते. या दोन एकर चार गुंठे शेतीत ४० ते ५० पोती भात पिकेल. त्यापैकी निम्मा भात बाजारात विकायचा. या विकल्या गेलेल्या भातपिकातून मिळणारे पैसे आपल्या कुटुंबासाठी ठेवायचे. उर्वरित धान्य आपल्या कुटुंबाला वर्षभर पुरेल, या अंदाजाने ते घरात ठेवायचे, हा त्यांचा दरवर्षाचा नित्यक्र म आहे. या वर्षी मात्र हे सारे अंदाज पावसाने धुळीस मिळाल्याने वर्षभर त्यांना बाजारातून धान्य विकत घ्यावे लागणार तर आहेच, पण त्या धान्यामध्ये ती पौष्टिकता मिळणार नसल्याची खंत त्यांच्या जिव्हारी लागली आहे. दरवर्षी ते आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, त्यामुळे दर्जेदार तांदळाचे दाणे त्यांना खायला मिळत होते. मात्र, यावर्षी या तांदळाला त्यांना मुकावे लागणार आहे. कधी नव्हे ती स्थिती आज या कुटुंबाची झाली आहे. आज लावलेली भातशेती, बहरलेली भातपिके तुडुंब भरलेल्या शेतातील पाण्यात बुडाल्याची स्थिती उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.वर्षभर तांदळाची समस्या भेडसावणारचार मुले, पत्नी असा त्यांचा परिवार आहे. त्यांचा दुसरा व्यवसाय नसल्याने त्यांच्यासाठी पाण्यात गेलेले भातपीक हे फार मोठे संकट असल्याने त्यांच्यासाठी आता वर्षभर तांदळाची समस्या निर्माण होणार आहे. केवळ याच पिकावर त्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालत असल्याने आता पुढे कसे होणार, हा गंभीर प्रश्न या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी