शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

पांढऱ्या कांद्याने आणले यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By admin | Updated: April 10, 2017 05:15 IST

रूचकर चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे नावारुपाला आलेला वाड्याचा पांढरा कांदा बाजारात येऊ लागला आहे

वसंत भोईर/वाडारूचकर चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे नावारुपाला आलेला वाड्याचा पांढरा कांदा बाजारात येऊ लागला आहे. मात्र यावर्षी त्याला योग्य भाव नसल्यामुळे नफा तर सोडाच पण झालेला खर्च वसूल होतो की नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत असून त्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधिले जाते. भातानंतर येथील शेतकरी कडधान्य, फळ, फुलांची शेती करीत आहेत. पूर्वी एकमेव भाताचे पिक घेतले जायचे. आता मात्र पांढ-या कांद्याला येथील हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी आता त्याची शेती करू लागले आहेत. चांबले, नेहरोली, बिलावली, डाकिवली, देवघर, कुडूस, गातेस, सांगे व नाणे या गावात पांढरा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भात शेती नंतर शेतीची नांगरणी करून ८.८ आकाराच्या कुंड्या तयार करून त्यावर कांद्याचे रोप लावले जाते. कांद्याला १० ते १२ दिवसातून पाणी दिले जाते. त्यामुळे कमी पाण्यात कांदा तयार होतो. त्यामुळे शेतक-यांनी त्याच्या लागवडीस पसंती दिली आहे. कांद्याला शेणखत, दाणेदार, १८:१८:१८ अशी खते दिली जातात. तर रोगाच्या संरक्षणासाठी किटक नाशके फवारली जातात. एका एकराला ६० हजारांचा खर्च येतो. यावर्षी थंडी पडल्यामुळे कांदा पिकावर परिणाम होऊन कांद्याची म्हणवी तशी वाढ झालेली नाही, अशी माहिती कुडूसचे शेतकरी शरद चौधरी यांनी दिली. मजुरीचे दर, औषधे, खते व यांत्रिक उपकरणे याचे दर वाढल्याने कांदा शेती परवडत नाही. असे शेतकरी सांगतात. पांढरा कांदा टिकावू असून साधारणपणे एक वर्षापर्यंत टिकतो त्यामुळे शेतकरी पांढ-या कांद्याची लागवड करत आहे. मात्र भाव नसल्यामुळे पांढरा कांद्याची शेती तोट्यात चालली आहे.