शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
4
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूम शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
5
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
6
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
7
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
8
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
9
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
10
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
11
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
12
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
13
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
14
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
15
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
16
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
17
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
18
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
20
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित

पांढऱ्या कांद्याने आणले यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By admin | Updated: April 10, 2017 05:15 IST

रूचकर चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे नावारुपाला आलेला वाड्याचा पांढरा कांदा बाजारात येऊ लागला आहे

वसंत भोईर/वाडारूचकर चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे नावारुपाला आलेला वाड्याचा पांढरा कांदा बाजारात येऊ लागला आहे. मात्र यावर्षी त्याला योग्य भाव नसल्यामुळे नफा तर सोडाच पण झालेला खर्च वसूल होतो की नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत असून त्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधिले जाते. भातानंतर येथील शेतकरी कडधान्य, फळ, फुलांची शेती करीत आहेत. पूर्वी एकमेव भाताचे पिक घेतले जायचे. आता मात्र पांढ-या कांद्याला येथील हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी आता त्याची शेती करू लागले आहेत. चांबले, नेहरोली, बिलावली, डाकिवली, देवघर, कुडूस, गातेस, सांगे व नाणे या गावात पांढरा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भात शेती नंतर शेतीची नांगरणी करून ८.८ आकाराच्या कुंड्या तयार करून त्यावर कांद्याचे रोप लावले जाते. कांद्याला १० ते १२ दिवसातून पाणी दिले जाते. त्यामुळे कमी पाण्यात कांदा तयार होतो. त्यामुळे शेतक-यांनी त्याच्या लागवडीस पसंती दिली आहे. कांद्याला शेणखत, दाणेदार, १८:१८:१८ अशी खते दिली जातात. तर रोगाच्या संरक्षणासाठी किटक नाशके फवारली जातात. एका एकराला ६० हजारांचा खर्च येतो. यावर्षी थंडी पडल्यामुळे कांदा पिकावर परिणाम होऊन कांद्याची म्हणवी तशी वाढ झालेली नाही, अशी माहिती कुडूसचे शेतकरी शरद चौधरी यांनी दिली. मजुरीचे दर, औषधे, खते व यांत्रिक उपकरणे याचे दर वाढल्याने कांदा शेती परवडत नाही. असे शेतकरी सांगतात. पांढरा कांदा टिकावू असून साधारणपणे एक वर्षापर्यंत टिकतो त्यामुळे शेतकरी पांढ-या कांद्याची लागवड करत आहे. मात्र भाव नसल्यामुळे पांढरा कांद्याची शेती तोट्यात चालली आहे.