शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

वनविभागाची रोपे वाचविण्यासाठी पाण्याच्या बाटलीने ठिबक सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:52 IST

टाकाऊतून असेही टिकाऊ : लोकसहभागातून वृक्षांना थेंब थेंब पाणी

- रविंद्र साळवे।लोकमत न्यूज नेटवर्कमोखाडा : यंदा पावसाने लवकर पाठ फिरवल्याने तालुक्यात पाणी टंचाई ची दाहकता डिसेंबर महिन्या अखेरीस निर्माण झालेली असून माणसान प्रमाणे रोपवनातील झाडांना देखील पाणी टंचाई ची झळ बसणार हे मात्र नक्की आहे.

फेब्रुवारी ते मे महिन्यातील सूर्याच्या अति उष्णतेने वन विभागातील नवीन लागवड केलेली झाडांची रोपे नष्ट होण्याची भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे या झाडांना वाचविण्यासाठी मोखाडा वनविभागातील पोशेरा परिमंडळचे वनपाल कर्डीले जी.एस यांच्या संकल्पनेतून या रोप वनातील झाडांना वाचविण्यासाठी नामी शक्कल लढविण्यात आली. यासाठी खोच ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्यांनी त्यांना पुरेपूर सहकार्य केले. वतवड्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खोच या गावा नजीक मोखाडा वन विभागाचे कंपाऊंड मधील दहा हेक्टर क्षेत्रावर दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे.

यंदाच्या वर्षी पाऊस लवकर गायब झाल्याने ही रोपे मुबलक पाण्याअभावी नष्ट होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे वनपाल कर्डीले यांच्या संकल्पनेतून या वृक्षाना जीवदान देण्यासाठी रिकाम्या बिस्लरी बॉटल जमा करु न या बाटलीच्या झाकणास छिद्र पाडण्यात आले व बाटलीच्या तळापासून ते झाकणाच्या छिद्रातून सुतळी दोरा टाकण्यात आला व बाटली पाण्याने पुर्ण भरली त्यानंतर या सर्व बिस्लरी बाटल्या प्रत्येक रोपांच्या खोडा जवळ आडवी ठेवून त्या बाटली तील पाणी थेंब थेंब भर तीन ते चार दिवस झाडांच्या खोडावर पडुन त्या ठिकाणी ओलावा निर्माण करून झाडाला संजीवनी दिली गेली.