शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

विटीदांडू हा खेळ प्रत्येक शाळेत पोहचवायचा आहे - विवेक कुवरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 00:42 IST

पालघर जिल्ह्यात विटी दांडू या खेळाची मुहूर्तमेढ रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक विवेक कुवरा यांच्याशी केलेली बातचीत.

- खलील गिरकरविटीदांडू हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाची २०१६ मध्ये पालघर जिल्हा असोसिएशनची स्थापना झाली. २०१९ मध्ये काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाºया राष्ट्रीय संघात या असोसिएशनचे सात खेळाडू होते. जिल्ह्यात या खेळाची मुहूर्तमेढ रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक विवेक कुवरा यांच्याशी केलेली बातचीत.प्रश्न : विटीदांडू या खेळाची पालघर जिल्ह्यात मुहूर्तमेढ कशी रोवली गेली?ग्रामीण भागात गावागावात हा खेळ मनोरंजनाकरिता खेळला जातो. मात्र हा स्पर्धात्मक पातळीवरचा सांघिक खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. हे २०१६ मध्ये समजले. डहाणू तालुक्यातील विजय गुहे ही व्यक्ती जालना येथे गेली होती. त्यांना या खेळाविषयी माहिती झाल्यानंतर त्यांनी तालुक्यात येऊन प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या स्नेह्यांकडून मला या खेळाची माहिती मिळाल्यानंतर याबाबत मी अध्यापन करीत असलेल्या कोसाबड येथील नूतन बाल शिक्षण संघाच्या अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना याकरिता विश्वासात घेऊन माहिती दिली. या खेळाचे सखोल ज्ञान आणि नियम समजून घेण्याकरिता जालन्याला जाऊन प्रशिक्षण घेतले.प्रश्न: पहिल्यांदा खेळाडूंची प्रतिक्रि या कोणती होती?या खेळाकरिता संघ बांधणी करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा विद्यार्थ्यांसमोर ठेवल्यावर काही मिनिटे हशा पिकला. अशा पद्धतीचा सांघिक खेळ असतो, याबाबत त्यांना विश्वास बसला नाही. या कामी नूतन बाल संघाच्या अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक आणि पदाधिकारी यांना विश्वासात घेतले. त्यांच्याकडून प्रतिसाद आल्यानंतर सरावाला सुरूवात झाली. खºयाअर्थाने ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या कर्मभूमीत या खेळाची मुहूर्तमेढ रोवली गेली.प्रश्न: स्पर्धात्मक प्रवास कसा सुरू झाला?विद्यार्थी आणि पालकांना एकत्रित करून खेळाकरिता साहित्याची निर्मिती करून सरावही सुरू केला. मात्र प्रत्यक्षात सामान्यांचा अनुभव नसल्याने बहुचर्चित ‘लगान’ चित्रपटातील भुवन आणि खेळाडूंची जी मानसिक अवस्था दाखवली होती नेमका तोच अनुभव आम्ही घेतला. पहिल्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला आणि मुलींच्या संघाने प्रथम तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. जानेवारीत काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघाने सुवर्णपदक मिळविले.जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत हा खेळ पोहचवायचा आहे. शिवाय खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय संघाच्या निवडीकरिता तयार करताना प्रत्यक्ष सामन्यांचा अनुभव द्यायचा आहे. याकरिता योजना आखली आहे, परंतु निधीचा तुटवडा भासत आहे.

टॅग्स :palgharपालघर