शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

विटीदांडू हा खेळ प्रत्येक शाळेत पोहचवायचा आहे - विवेक कुवरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 00:42 IST

पालघर जिल्ह्यात विटी दांडू या खेळाची मुहूर्तमेढ रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक विवेक कुवरा यांच्याशी केलेली बातचीत.

- खलील गिरकरविटीदांडू हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळाची २०१६ मध्ये पालघर जिल्हा असोसिएशनची स्थापना झाली. २०१९ मध्ये काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाºया राष्ट्रीय संघात या असोसिएशनचे सात खेळाडू होते. जिल्ह्यात या खेळाची मुहूर्तमेढ रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक विवेक कुवरा यांच्याशी केलेली बातचीत.प्रश्न : विटीदांडू या खेळाची पालघर जिल्ह्यात मुहूर्तमेढ कशी रोवली गेली?ग्रामीण भागात गावागावात हा खेळ मनोरंजनाकरिता खेळला जातो. मात्र हा स्पर्धात्मक पातळीवरचा सांघिक खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. हे २०१६ मध्ये समजले. डहाणू तालुक्यातील विजय गुहे ही व्यक्ती जालना येथे गेली होती. त्यांना या खेळाविषयी माहिती झाल्यानंतर त्यांनी तालुक्यात येऊन प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या स्नेह्यांकडून मला या खेळाची माहिती मिळाल्यानंतर याबाबत मी अध्यापन करीत असलेल्या कोसाबड येथील नूतन बाल शिक्षण संघाच्या अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना याकरिता विश्वासात घेऊन माहिती दिली. या खेळाचे सखोल ज्ञान आणि नियम समजून घेण्याकरिता जालन्याला जाऊन प्रशिक्षण घेतले.प्रश्न: पहिल्यांदा खेळाडूंची प्रतिक्रि या कोणती होती?या खेळाकरिता संघ बांधणी करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा विद्यार्थ्यांसमोर ठेवल्यावर काही मिनिटे हशा पिकला. अशा पद्धतीचा सांघिक खेळ असतो, याबाबत त्यांना विश्वास बसला नाही. या कामी नूतन बाल संघाच्या अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक आणि पदाधिकारी यांना विश्वासात घेतले. त्यांच्याकडून प्रतिसाद आल्यानंतर सरावाला सुरूवात झाली. खºयाअर्थाने ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या कर्मभूमीत या खेळाची मुहूर्तमेढ रोवली गेली.प्रश्न: स्पर्धात्मक प्रवास कसा सुरू झाला?विद्यार्थी आणि पालकांना एकत्रित करून खेळाकरिता साहित्याची निर्मिती करून सरावही सुरू केला. मात्र प्रत्यक्षात सामान्यांचा अनुभव नसल्याने बहुचर्चित ‘लगान’ चित्रपटातील भुवन आणि खेळाडूंची जी मानसिक अवस्था दाखवली होती नेमका तोच अनुभव आम्ही घेतला. पहिल्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला आणि मुलींच्या संघाने प्रथम तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. जानेवारीत काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघाने सुवर्णपदक मिळविले.जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत हा खेळ पोहचवायचा आहे. शिवाय खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय संघाच्या निवडीकरिता तयार करताना प्रत्यक्ष सामन्यांचा अनुभव द्यायचा आहे. याकरिता योजना आखली आहे, परंतु निधीचा तुटवडा भासत आहे.

टॅग्स :palgharपालघर