शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जव्हारला पावसाची प्रतिक्षा

By admin | Updated: June 23, 2016 02:51 IST

तालुक्यात बहुतांश शेतकऱ्याना पाऊस नसल्यामुळे पेरण्या लांबवाव्या लागल्या आहेत. १०० % आदिवासी असलेल्या जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालन पोषण शेतीवर अवलंबून आहे

हुसेन मेमन,  जव्हारतालुक्यात बहुतांश शेतकऱ्याना पाऊस नसल्यामुळे पेरण्या लांबवाव्या लागल्या आहेत. १०० % आदिवासी असलेल्या जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालन पोषण शेतीवर अवलंबून आहे.दरवर्षा प्रमाणे जव्हार तालुक्यात ६ ते ७ जून च्या दरम्यान पावसाने आगमन होते. त्यामुळे शेतकरी यापूर्वीच जमीनीची नांगरणी, मशागत, खते, बी-बियाणे इत्यादीची खरेदी करून पूर्ण तयारीत असतो, मात्र निर्सगाच्या लहरीपणामुळे यंदा पाऊस जून संपत आला तरी पुरेसा पडलेला नाही त्यामुळे यंदा शेती होणार की नाही? असा प्रश्न पडला आहे. बहुतांश शेतकरी छोट्याखानी आपल्याला पुरेल इतकेच भात व नागली पिक घेत असतात आणि त्याच पिकात वर्षभर आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करीत असतात, परंतू पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारातून भाताचे बियाणे खरेदी करावे लागत आहे, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्हयातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांची पावसा अभावी चिंता वाढत चाललेली आहे. वेळीच पाऊस पडत पसल्यामुळे पेरण्या लाब्ांणीवर जाणार आणि याचा दुष्परीणाम पिक काढते वेळी पडणार आहे, म्हणून शेतीची लागवड करावयाची की नाही? असा गंभीर प्रश्न छोट्या शेतकऱ्यांना पडला आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी बि-बियाणे खरेदी करून ठेवलेले आहेत, परंतू पाऊस नसल्यामुळे बियाणे पडूनच आहे, महिन्या दोन महिन्यापूर्वीच भाव कमी असतांना खरेदी केलेले बियाणे इतक्या उशीरापर्यंत टिकेल की नाही अशीही शंका शेतकऱ्यांना सतावते आहे, त्यामुळे खरेदी केलेले बियाणे फुकट जाते की काय? आणि पुन्हा बियाणे खरेदी करतांना बाजारभाव चढलेला असेल तर तोही आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसणार आहे.