शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

कातकरी घरकुलाच्या प्रतीक्षेत; सात वर्षांपासून संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:52 IST

जव्हार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा अनागोंदी कारभार

- रवींद्र साळवे मोखाडा : तालुक्यातील पळसुंडा ग्रामपंचायतीतील कातकरी कुटुंब सात वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. २०११-१२ मध्ये गोपाळ बाळू वळवी, जनाबाई अशोक मिसाळ, सोपान गंगा वळवी या लाभार्थ्यांना जव्हार प्रकल्प कार्यालयाकडून घरकूल मंजूर झाली होती. ही घरकुले शूर झलकारी एकता महासंघ ठाणे यांच्या माध्यमातून बांधून दिली जाणार होती.या घरकुलाबरोबरच १९३ मंजूर घरकुले बांधण्याचा ठेका देखील जव्हार एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने शूर झलकारीला दिला होता. मात्र, हे काम अर्धवट राहिले. आणि यात नाहक अनेक कातकरी कुटुंबांचा बळी गेला. अनेकांची घरे अर्धवट राहिली. अनेकांना तर या योजनेची दमडीही मिळाली नाही. यामुळे आजही हे कातकरी कुटुंब निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत.कुडामेडिच्या लहानशा झोपडीत वास्तव्य करणाºया या कुटुंबाची पावसाळ्यात मात्र अत्यंत बिकट परिस्थिती होते. झोपडीचं छत गळकं, कुड मोडलेत, जमीन ओली, यामुळे रहायचे कुठे, झोपायचे कुठे? अशा परिस्थितीत ऊन - पाऊस वारा थंडीमध्येही ही कुटुंबे जगत आहेत. या घरकुलांना प्रकल्प कार्यालयातून अनुदान दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. यानंतर अनेकवेळा या लाभार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयाचे उंबरठे झिजवले. परंतु प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने सात वर्षे होत आली तरी कुणी दखल घेत नाही.माझ्या वडिलांना झोपडी मिळाली होती. त्यांच्या हयातीत काही ती तयार झाली नाही. आता माझ्या मुलाला देखील झोपडी मिळाली नाही. आम्ही कुडामेडीच्या झोपडीत रहातो. आता मतदानाच्या वेळेस आमच्याकडे मत मागायला आल्यावर आम्ही मृत आहोत असंच सांगणार. कारण आम्ही जिवंत असूनही कुणी आमच्याकडे लक्षच देत नाहीत, असे गंगाराम वळवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गेली अनेक दशके दारिद्र्यात खितपत पडलेला हा कातकरी समाज विकासापासून कोसो मैल दूर आहे.मुंबईपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील कातकरी समाज मुलभूत सुविधांपासूनही वंचित आहे वर्षातील काही दिवस हातात काम असेल तेव्हा या वस्तीवर राहायचे. अन्यथा संसार पाठीवर घेऊन घरापासून काही किलोमीटर लांब वीटभट्टी किंवा शेतावर मजुरीचे काम करायचे. मिळेल ते खायचे, पुरेसे शिक्षण नाही, यामुळे आश्रमशाळा जवळ असलेल्या वस्त्यांवरील मुले कशीबशी पाचवीपर्यंत शिकू शकतात. आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या गावाबाहेर असलेल्या या पाड्यांना मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. मालकीची शेतजमीन नाही शिवाय उदरनिर्वाहचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने रोजगारासाठी कोसो दूर भटकंती करावी लागत आहे.कातकरी म्हटले की, उन्हातान्हात मेहनत करणारे, अंगावर वीतभर वस्त्र असलेले आणि रानावनात भटकणारे बांधव डोळ्यांसमोर येतात. स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटूनही कातकऱ्यांबाबत हे चित्र तसेच आहे. देशातील मूळनिवासी आदिम जमात असणारा कातकरी समाज हा कायमच गावकुसा बाहेर राहिला. त्यांच्याकडे मालकीची जमीन नाही, शिक्षणाचा गंध नाही, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक तोकडे प्रयत्न झाले. विविध योजना सुरू झाल्या खºया, मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. आता तरी आमच्यापर्यंत किमान मूलभूत सोयीसुविधा पोहोचवा, अशी मागणी या समाजाने केली आहे.यासंबंधातील माहिती तुम्हाला मोखाडा पंचायत समितीकडे मिळेल. ही माहिती त्यांच्याकडून घ्या.- सौरभ कटियार(प्रकल्प अधिकारी, जव्हार)आम्ही घरकुलांचे लाभार्थी ठरलो. त्या ठेकेदाराने पाया बांधून दिला. त्यानंतर तो परत आलाच नाही आणि प्रकल्प कार्यालयात आमची कुणी घेत दाद घेत नाही.- जनाबाई मिसाळ, वंचित लाभार्थी