शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

वाडा नगरपंचायतीचा प्रचार शिगेला, अधिवेशन सोडून पालकमंत्र्यांचा ठिय्या, अन्य पक्षांचे मातब्बर नेतेही बसले तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 03:24 IST

नगरपंचायतीची निवडणूक येत्या १३ तारखेला होत असून येथील प्रचार शिगेला पोहोचला आहे. मंगळवार दि, १२) रात्री १० वाजेपर्यंत प्रचार संपणार असल्याने आज सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारावर भर दिला.

वाडा : नगरपंचायतीची निवडणूक येत्या १३ तारखेला होत असून येथील प्रचार शिगेला पोहोचला आहे. मंगळवार दि, १२) रात्री १० वाजेपर्यंत प्रचार संपणार असल्याने आज सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारावर भर दिला. दरम्यान, आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असतांनाही आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा मात्र वाडा येथेच ठाण मांडून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.येत्या बुधवारी (दि, १३) वाडा नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक पक्ष जोरदारपणे प्रचार करीत आहेत. शिवसेनेने बैलगाडी , वासुदेव व शाहीर अशा ग्रामीण व पारंपारिक पद्धतीने प्रचार सुरू ठेवला आहे. तर भाजपने हायटेक पध्दतीने प्रचार यंत्रणा राबवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सायकलवर बॅनरबाजी करून संपूर्ण शहरात प्रचार सुरू ठेवला आहे. काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, मनसे हे पक्ष सुद्धा प्रचार रॅली शिवाय प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आपआपल्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचला असून उद्या रात्री १० वाजता प्रचार संपणार आहे. दरम्यान, मंत्रीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा हे गैरहजेरी लावून वाड्यातच ठाण मांडून बसलेले आहेत. कार्यकत्यांच्या सभा, मतदारांची प्रत्यक्ष भेटींवर त्यांनी भर दिला असून यातच ते मश्गुल आहेत. राज्यात कुपोषण, आश्रमशाळांचा प्रश्न असे अनेक प्रश्न असतांना त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मुलीच्या राजकीय भवितव्यासाठी ते वाड्यातच ठाण मांडून आहेत.सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी अनेक अर्ज दाखलतलासरी : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या जाहीर झालेल्या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी कंबर कसली असून तालुक्यातील कवाडा, उपलाट, कुर्झे, गिरगाव, घीमणीया, उधवा करजगाव या ग्रामपंचयतीच्या निवडणूक होणार असून आज शेवटच्या दिवस अखेर एकूण ३२३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.यामध्ये ७ सरपंच पदासाठी एकूण ३१ उमेदवार तर ९७ सदस्य पदासाठी २९२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. हे अर्ज आॅनलाईन भरण्यात येत असल्याने इंटरनेटचे कनेक्शन, वीज बेपत्ता होणे इत्यादी कारणांनी हे अर्ज भरतांना राजकीय पक्षांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यावर कुणाला काही इलाज करता येत नव्हता.आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छूकांनी सायबर कॅफे आणि कार्यालयातील संगणक इत्यादींवर एकूण सरपंचपदासाठी ३१ तर सदस्य पदासाठी २९२ अर्ज आॅनलाईन दाखल केलेआहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार