शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

वाडा नगरपंचायत निवडणूक अखेर घोषित; आजवर सत्ताधारी असलेली युती संपली; शिवसेना, भाजपा स्वबळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 04:12 IST

नव्याने झालेल्या वाडा नगरपंचायतीचा निवडणूक निर्णय कार्यक्रम जाहीर झाला असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र १८ ते २४ नोव्हेंबर या काळात संकेतस्थळावर ११ ते ३ या वेळेत भरावयाचे आहे.

वाडा : नव्याने झालेल्या वाडा नगरपंचायतीचा निवडणूक निर्णय कार्यक्रम जाहीर झाला असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र १८ ते २४ नोव्हेंबर या काळात संकेतस्थळावर ११ ते ३ या वेळेत भरावयाचे आहे. भरलेले आवेदनपत्र १८ ते २४ नोव्हेंबर पर्यंत निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयात स्वीकारले जातील, २५ नोव्हेंबरला छाननी होईल. ३० नोव्हेंबरही अर्ज मागे घेता येतील तर १३ डिसेंबरला मतदान होऊन १४ डिसेंबरला निकाल जाहीर होतील.वाडा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष हे पद हे महिला अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने या पदावर याआधी अनुसूचित जमाती वगळून सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होता. मात्र ते राखीव झाल्याने त्यांची घोर निराशा झाली आहे. नगरपंचायत निवडणुकीत जागांमध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण कमी झाल्याने इतर मागासवर्ग व खुल्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे अन्य समाजातील कार्यकर्त्यांना संधी वाढल्याने सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांच्या आकांक्षा वाढल्या आहेत.ग्रामपंचायतकाळात सत्तेवर असलेल्या शिवसेना - भाजप दोन्ही पक्ष आत्ता मात्र स्वबळाचीच भाषा बोलत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्यावेळी भारतीय जनता पक्षाला कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागत असे. त्यांना उमेदवारही मिळत नव्हते. परंतु आता परिस्थिती बदलली असून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाले आहे. तसेच पंचायत समितीपासून केंद्रसरकारपर्यंत भाजपचीच सत्ता असल्याने आता भाजपकडे कार्यकर्त्यांचा भरणा वाढला आहे. त्यामुळे इच्छूकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. एकंदर या बदलत्या राजकीय परिस्थितीत उमेदवारी वरून भाजपची डोकेदुखीही वाढली आहे.शिवसेनेचे वाडा शहरावर आजवर कायम वर्चस्व सिध्द झाले आहे. वाडे शहरामध्ये शिवसेनेला मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी जागानिहाय मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून कॉँग्रेस पुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे.आरक्षण बदलल्याने अन्य समाजाचे प्रतिनिधित्व वाढले आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे इच्छूक वाढले आहेत. या दोन्ही पक्षात जागा वाटपावरून बिनसण्याची चिन्हे आहेत. ग्रामपंचायतीत महत्वाची भूमिका बजावणाºया बहुजन विकास आघाडीनेही काही जागावर आपले उमेदवार जाहीर करून रणशिंग फुंकले आहे. तर मनसेही मोर्चेबांधणीला लागली आहे. सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी गणेशोत्सवातच निवडक मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिला होता.

टॅग्स :Electionनिवडणूक