शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

वाडा नगरपंचायत निवडणूक अखेर घोषित; आजवर सत्ताधारी असलेली युती संपली; शिवसेना, भाजपा स्वबळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 04:12 IST

नव्याने झालेल्या वाडा नगरपंचायतीचा निवडणूक निर्णय कार्यक्रम जाहीर झाला असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र १८ ते २४ नोव्हेंबर या काळात संकेतस्थळावर ११ ते ३ या वेळेत भरावयाचे आहे.

वाडा : नव्याने झालेल्या वाडा नगरपंचायतीचा निवडणूक निर्णय कार्यक्रम जाहीर झाला असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र १८ ते २४ नोव्हेंबर या काळात संकेतस्थळावर ११ ते ३ या वेळेत भरावयाचे आहे. भरलेले आवेदनपत्र १८ ते २४ नोव्हेंबर पर्यंत निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयात स्वीकारले जातील, २५ नोव्हेंबरला छाननी होईल. ३० नोव्हेंबरही अर्ज मागे घेता येतील तर १३ डिसेंबरला मतदान होऊन १४ डिसेंबरला निकाल जाहीर होतील.वाडा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष हे पद हे महिला अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने या पदावर याआधी अनुसूचित जमाती वगळून सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होता. मात्र ते राखीव झाल्याने त्यांची घोर निराशा झाली आहे. नगरपंचायत निवडणुकीत जागांमध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण कमी झाल्याने इतर मागासवर्ग व खुल्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे अन्य समाजातील कार्यकर्त्यांना संधी वाढल्याने सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांच्या आकांक्षा वाढल्या आहेत.ग्रामपंचायतकाळात सत्तेवर असलेल्या शिवसेना - भाजप दोन्ही पक्ष आत्ता मात्र स्वबळाचीच भाषा बोलत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्यावेळी भारतीय जनता पक्षाला कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागत असे. त्यांना उमेदवारही मिळत नव्हते. परंतु आता परिस्थिती बदलली असून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाले आहे. तसेच पंचायत समितीपासून केंद्रसरकारपर्यंत भाजपचीच सत्ता असल्याने आता भाजपकडे कार्यकर्त्यांचा भरणा वाढला आहे. त्यामुळे इच्छूकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. एकंदर या बदलत्या राजकीय परिस्थितीत उमेदवारी वरून भाजपची डोकेदुखीही वाढली आहे.शिवसेनेचे वाडा शहरावर आजवर कायम वर्चस्व सिध्द झाले आहे. वाडे शहरामध्ये शिवसेनेला मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी जागानिहाय मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून कॉँग्रेस पुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे.आरक्षण बदलल्याने अन्य समाजाचे प्रतिनिधित्व वाढले आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे इच्छूक वाढले आहेत. या दोन्ही पक्षात जागा वाटपावरून बिनसण्याची चिन्हे आहेत. ग्रामपंचायतीत महत्वाची भूमिका बजावणाºया बहुजन विकास आघाडीनेही काही जागावर आपले उमेदवार जाहीर करून रणशिंग फुंकले आहे. तर मनसेही मोर्चेबांधणीला लागली आहे. सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी गणेशोत्सवातच निवडक मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिला होता.

टॅग्स :Electionनिवडणूक