शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाडा तालुक्यातील गॅसवाहिन्यांमुळे शेतकरी झाला उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 02:41 IST

पालघर जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र, या जिल्ह्यात अनेक प्रकल्पाने सुपीक भातशेतीची अक्षरश: वाट लावली आहे.

वाडा : पालघर जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र, या जिल्ह्यात अनेक प्रकल्पाने सुपीक भातशेतीची अक्षरश: वाट लावली आहे. उच्च दाबाची विद्यूत वाहिनी गेल इंडिया कंपनी व रिलायन्स कंपनीच्या दोन गॅस वाहिन्या सुपीक जमिनीतून गेल्या गेल्या आहेत. यामुळे शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.वाड्यात औद्यागिकरण झाल्याने जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत असा लाख मोलाचा भाव असलेली जमीन या वाहिन्यांसाठी कवडीमोल भावाने जात असल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. मात्र सरकार इतर राजकीय पक्ष सामाजिक संघटना लक्ष देत नसल्याने न्याय कुणाकडे मागायचा असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.वाडा तालुका म्हटले की, भाताचे कोठार समोर उभे राहते. वाडा कोलम हेभाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे याचबरोबर वाड्यात वीस ते बावीस वर्षांपूर्वी राज्य शासनानेक्व डीप्लसक्व झोन ही योजना जाहीर केली. अशातच २००५ मध्ये गेल इंडिया कंपनीची गॅस वाहिनी सर्वप्रथम या जिल्ह्यातून गेली. त्यानंतर २००७ मध्ये रिलायन्स कंपनीची पहिली तर २०१६ मध्ये याच कंपनीची दुसरी गॅस वाहिनी देहेज -नागोठणे इथेन पाईपलाईन या तालुक्यातून जात असून तिचे काम अंतिम टप्प्यात आहे.या ग्यास वाहिनीत सुमारे पन्नास गावे बाधित झाले पूर्वीच्याच वाहिन्यां शेजारून ही वाहीनी गेली आहे. गेल इंडिया कंपनीची गॅस वाहिनी हा भारत सरकारचा उपक्रम असल्याने शेतकºयांना दोन चार हजारात झालेल्या नुसकानीचा मोबदला मिळाला त्यानंतर रिलायन्स कंपनीची पहिली वाहिनी गेली. त्यावेळी काही हजार देऊन शेतकºयाच्या तोंडाला पाने पुसण्यात आली होती. मात्र, आता गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या दुस-या वाहिनीत शेतकºयांना पूर्वीपेक्षा चांगल्याप्रकारे मोबदला दिला गेल्याने शेतकरी काहीअंशी समाधानी असल्याचे दिसून येत आहेगुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यातून गॅस वाहिनी गेल्या असून गुजरात मधील भरूच ६५ किमी सुरत ४५ किमी नवसारी ४१ किमी वलसाड ६३ किमी तर महाराष्ट्रातील पालघर ७९ ठाणे चोपण रायगड ८७ अशा एकूण आठ चाळीसी किलोमीटर अंतरावर या वाहिन्या गेले आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी पालघर विक्रमगड वाडा तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण या तालुक्यातून या लाईन गेल्या आहेत. २००५ मध्ये गेल इंडिया कंपनीची तर २००७ मध्ये रिलायन्स कंपनीची वाहिनी गेली आता २०१६ पासून दुसºया वाहिनीचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे.यावेळी शेतकºयांना प्रति गुंठा ६० ते ८० हजार रुपये नुसकान भरपाई देण्यात आले आहेत. येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना नाममात्र नुसकान भरपाई देऊन शेतकºयांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. ज्या जमिनीतून वाहिनी गेली आहे त्या जमिनीच्या सातबारा उताºयावर कंपनीची व इतर हक्कात नोंद होते त्या भागात काहीही बांधकाम करता येत नाही किंवा कूपनलिका मारता येत नाही, झाडे लावता येत नाहीत, गॅस वाहिनी ही जमिनीखालून जात असल्याने तिचा नागरिकांना कोणताही त्रास होत नाही किंवा त्याचे घातक परिणाम होणार नाहीत मात्र या वाहिन्यांमुळे लाख मोलाचा भाव असलेल्या जमिनीची किंमत काडीमोड होते. ही जमीन बाजारात सुद्धा विकत घेतली जात नाही. सुपीक जमिनीतून कोणत्याही प्रकल्प उभारला जाऊ नये असा नियम असतानाही या नियमाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.पालघर व ठाणे जिल्ह्यातील सुपीक जमिनीतून हिंदीतून अनेक प्रकल्प गेले आहेत तसेच जात आहेत त्यात हजारो शेतकरी बाधित झाले आहेत सरकारने पालघर व ठाणे जिल्ह्यातील जमीन आंदण म्हणून घेतले आहे.- कृष्णा भोईर,शेतकरी नेतेत्या जमिनीतून प्रकल्प जात असेल अशा शेतकºयांना सरकारने प्रकल्पग्रस्त म्हणून घोषीत करावे जेणेकरून त्याचा फायदा शेतकºयांना होईल.-गोविंद पाटील, शिवसेना कार्यकर्तेशेतकºयांच्या गॅस वाहिनी नेता आणि त्यांच्या सातबारा उताºयावर इतर हक्कात कंपनीचे नाव टाकता हा कुठला न्याय शेतकºयांची सगळी जमीन तुम्ही विकत घेतले आहे का?- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Farmerशेतकरीnewsबातम्या